शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

समाजाने ठरवलं अन् कुटुंब पुन्हा उभं राहिलं! दिव्यांग मुलांना मिळाला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:29 IST

कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही.

- जिजाबराव वाघलोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव ( जळगाव) : समाजाने दातृत्वाची ओंजळ धरली तर कोरोना महामारीतही कुटुंब पुन्हा उभे राहू शकते, याचा प्रत्यय चाळीसगावपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असणाऱ्या पातोंडा या गावातील कुटुंबाला आला. अनेकांच्या दातृत्वामुळे येथील गोकुळ भिल व कदमबाई भिल या दांपत्यासह तीन दिव्यांग मुलांचेही पुनर्वसन करण्यात यश आले आहे. पिचलेल्या या कुटुंबाला हक्काचा निवारा तर मिळालाच, सोबत रोजगारही उपलब्ध झाला आहे. सोमवारी भिल दांपत्याला दहा शेळ्या सुपुर्द करण्यात आल्या.

 कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही. ही स्थिती कळताच या कुटुंबासाठी स्वयंदीप दिव्यांग भगिनी मंडळाच्या प्रमुख मीनाक्षी निकम यांनी सोशल माध्यमावर मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी भिल कुटुंबाचे पुनर्वसन करत त्यांना दत्तक घेतले.  वाळेकर यांनी या कुटुंबाला शासनाच्या मदतीची गरज पडू नये असा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजही पुढे आला. सैनिकांच्या ग्रुपने भिल कुटुंबाचे पडके घर उभारून दिले, तर दीपक निकम या वीज कर्मचाऱ्याने थकीत वीजबिल भरून घरात विजेचा प्रकाश पसरवला. काहींनी धान्य व किराणा भरून दिला. वर्षभर पुरेल इतके किराणा सामानही मिळाले आहे.

‘लोकमत’चाही खारीचा वाटागोकुळ भिल यांच्या दयनीय परिस्थितीचा आढावा ‘लोकमत’नेही मांडला होता. त्यामुळे समाजमनाच्या संवेदना पाझरल्या. कुटुंबाच्या पुनर्वसनात ‘लोकमत’चाही खारीचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार वाळेकर व मीनाक्षी निकम यांनी व्यक्त केली.मी माणसांच्या रूपात आज देव पाहत आहे. कोरोनात रोजगार बुडाल्यानंतर निराश झालो होतो. तीन दिव्यांग मुलांसह पत्नीचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न डोंगराएवढा झाला होता. घर पडून गेले होते. वीज नव्हती. आज देवरूपी माणसांनी आम्हाला नव्याने जगण्याची ऊर्जा दिली आहे.    - गोकुळ भील, पातोंडा, ता. चाळीसगाव.