शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने ठरवलं अन् कुटुंब पुन्हा उभं राहिलं! दिव्यांग मुलांना मिळाला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:29 IST

कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही.

- जिजाबराव वाघलोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव ( जळगाव) : समाजाने दातृत्वाची ओंजळ धरली तर कोरोना महामारीतही कुटुंब पुन्हा उभे राहू शकते, याचा प्रत्यय चाळीसगावपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असणाऱ्या पातोंडा या गावातील कुटुंबाला आला. अनेकांच्या दातृत्वामुळे येथील गोकुळ भिल व कदमबाई भिल या दांपत्यासह तीन दिव्यांग मुलांचेही पुनर्वसन करण्यात यश आले आहे. पिचलेल्या या कुटुंबाला हक्काचा निवारा तर मिळालाच, सोबत रोजगारही उपलब्ध झाला आहे. सोमवारी भिल दांपत्याला दहा शेळ्या सुपुर्द करण्यात आल्या.

 कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही. ही स्थिती कळताच या कुटुंबासाठी स्वयंदीप दिव्यांग भगिनी मंडळाच्या प्रमुख मीनाक्षी निकम यांनी सोशल माध्यमावर मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी भिल कुटुंबाचे पुनर्वसन करत त्यांना दत्तक घेतले.  वाळेकर यांनी या कुटुंबाला शासनाच्या मदतीची गरज पडू नये असा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजही पुढे आला. सैनिकांच्या ग्रुपने भिल कुटुंबाचे पडके घर उभारून दिले, तर दीपक निकम या वीज कर्मचाऱ्याने थकीत वीजबिल भरून घरात विजेचा प्रकाश पसरवला. काहींनी धान्य व किराणा भरून दिला. वर्षभर पुरेल इतके किराणा सामानही मिळाले आहे.

‘लोकमत’चाही खारीचा वाटागोकुळ भिल यांच्या दयनीय परिस्थितीचा आढावा ‘लोकमत’नेही मांडला होता. त्यामुळे समाजमनाच्या संवेदना पाझरल्या. कुटुंबाच्या पुनर्वसनात ‘लोकमत’चाही खारीचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार वाळेकर व मीनाक्षी निकम यांनी व्यक्त केली.मी माणसांच्या रूपात आज देव पाहत आहे. कोरोनात रोजगार बुडाल्यानंतर निराश झालो होतो. तीन दिव्यांग मुलांसह पत्नीचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न डोंगराएवढा झाला होता. घर पडून गेले होते. वीज नव्हती. आज देवरूपी माणसांनी आम्हाला नव्याने जगण्याची ऊर्जा दिली आहे.    - गोकुळ भील, पातोंडा, ता. चाळीसगाव.