शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खान्देशकन्येच्या प्रतिभेला मानाचा सालाम, चाळीसगावच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रात आनंदी सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:46 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २३ - ‘अरे संसार संसार...जसा तवा चुल्यावर...’ मानवी जीवनाची अशी साधी परंतु तितकीच लोभस, तरल व्याख्या कवितेतून अजरामर करणा-या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देऊन शासनाने खान्देश कन्येला मानाचा सलाम केला असल्याचा आनंदी सूर येथील सामाजिक व साहित्य क्षेत्रात उमटला.अहिराणीचा सन्मानउमविला खान्देश कन्या कवयत्रि बहिणाबाई चौधरींचे नाव देणे म्हणजे अहिराणीचा बोली भाषेचा सन्मानच आहे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आहिराणी बोलणा-या भोळ्या-भाबड्या जनतेला विद्यापिठ आपले आहे. ही भावना निर्माण होईल. योग्य निर्णय.- प्रा.डॉ. मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य चाळीसगाव महाविद्यालय.महिलांच्या कर्तृत्वाला न्यायबहिणाबाईंनी निसर्गाची गुंफण मानवी जीवनाशी केली. लोककवी म्हणून त्यांचे स्थान आहे. महिला म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात ठसा उमटविला आहे. त्यांचे नाव उमविला दिल्याने महिलांच्या कर्तृत्वचं अधोरेखित झाले आहे.- प्रा.डॉ. एस.आर. जाधव, प्राचार्य य.ना.चव्हाण महाविद्यालय, चाळीसगावखान्देशाच्या लेकीचा गौरव'बहिणाबाईंची काव्यप्रतिभा म्हणजे साहित्याचे बावनकशी सोनं' असा गौरव भाषाप्रभू प्र.के. अत्रे यांनी केला होता. शासनाने उमविला बहिणाबाईंचे नाव देऊन लेकीच्या प्रतिभेला सलाम केला आहे. निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- प्राचार्य तानसेन जगताप, विभागीय कार्यवाह, मसाप, चाळीसगावविद्यापीठाचा लौकीक उंचावेलबहिणाबाई चौधरी यांचा साहित्य प्रवास हेच एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. ग्रामीण जनतेला व्यवहारीक शहाणपणाचा अजरामर संस्कार त्यांनी दिलायं. बहिणाबाईंच्या नाव वलयाने उमविला वेगाळी उंची मिळालीयं.- डॉ. मुकूंद करंबेळकर, अध्यक्ष रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव.मानाचा तुराबहिणाबाई चौधरी हे खान्देशाचं अभिजात वैभव आहे. पेढे वाटूनच शासनाच्या निर्णयाचे स्वागत झाले पाहिजे. उमविला त्यांचे नाव मिळणे म्हणजे विद्यापिठाच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला गेला आहे.- डॉ. हेमांगी पुर्णपात्रे, अध्यक्षा शिशूविहार शिक्षण संस्था, चाळीसगाव.आजि सोनियाचा दिनुउमविला खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देणे हा स्वागतार्ह निर्णय आहे. यानिमित्ताने त्यांच्या सृजनशील साहित्याचा मोठा सन्मानच झाला आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांच्या साहित्याचे मनोज्ञ दर्शनही होईल. कवयित्री म्हणून आनंद झाला आहे.- लिलाताई यशवंत पाटील, कवयित्री, मा. सभापती, पं.स.चाळीसगावखान्देशाला न्याय आणि सन्मानमराठी ही मनाला निर्सर्गाशी जोडणारी भाषा असल्याचे बहिणाबाई चौधरी यांनी सिद्ध केले. कमी शिक्षण असूनही आपल्या अलौकीक प्रज्ञेतून त्यांनी साहित्याची उंची वाढवली. शासनाने त्यांचे नाव उमविला देऊन खान्देशला न्याय देऊन सन्मानही केला आहे.- वसंतराव चंद्रात्रे, साहित्यिक, मा. सिनेट सदस्य, उमवि, चाळीसगावप्रेरणादायी निर्णयबहिणाबाई चौधरी यांची प्रतिभा उपजत होती. त्यांच्या साहित्यातून समाज घडविण्याची प्रक्रिया खंडीत होऊ शकत नाही. प्रेरणास्त्रोत म्हणूनही त्या अविस्मरणीय आहेत. शासनाने त्यांचे नाव उमविला देऊन खान्देशाचा लौकीक वाढवला आहे.- संपदा पाटील, अध्यक्षा, उमंग समाजशिल्पी महिला परिवार, चाळीसगाव.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ