शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

...म्हणून शून्य टक्के व्याजदाराची सवलत बंद करावी लागली : संजय पवार

By सुनील पाटील | Updated: September 25, 2023 15:38 IST

जिल्हा बँकेच्या एनपीएत ५.७३ टक्के वाढ

जळगाव : चालू खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड निर्धारित वेळेत केल्यास तीन लाखापर्यंत केंद्र शासन ३ टक्के तर डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. केंद्राचा परतावा हा थेट थेतकऱ्यांच्या बचत खात्यात (डीटीबी) जमा होणार असल्याने बँकेला नाईलाजास्तव शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करावी लागल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सर्वसाधारण बैठकित स्पष्ट केले.जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी बँकेच्या आवारात झाली. यावेळी अजेंड्यावरील दहा विषय अवघ्या ३० मिनिटात मंजूर करण्यात आले. या वर्षी बॅंक प्रथम व्याजासहित कर्ज वसूल करेल व नंतर शेतकऱ्यांना शासनाकडून व्याज परत मिळणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

शेती, बिगरशेती संस्था व व्यक्तीगत कर्जासाठी एक रकमी परतफेड योजना बँकेने राबविलेली आहे. या योजनेपोटी बँकेचे १.३२ कोटी व्याजाचे नुकसान झाले आहे. २१ डिसेंबरपर्यंत या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. अनिष्ठ तफावत वाढल्यामुळे मागील वर्षाच्या शेती कर्ज एनपीएमध्ये ५.७३ टक्के वाढ झाली असून आता ४१.१४ टक्के एनपीए झालेला आहे. अशाही परिस्थितीत बँकेने आतापर्यंत १ लाख ७९ हजार ७८२ शेतकऱ्यांना ८८० कोटी रुपयांचे पीक कर्ज स्वभांडवलातून वाटप केल्याचे संजय पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ५५१ विकासो अनिष्ठ तफावतीत असल्याचेही ते म्हणाले.

बँकेला १०७ वर्ष पूर्ण

जिल्हा बँकेच्या स्थापनेला १०७ वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत बँकेच्या ठेवी ३ हजार ४९५ कोटी होत्या, त्यात वाढ होऊन आज अखेर ३ हजार ७४६ कोटी इतक्या झालेल्या आहेत. बँकीग रेग्युलेशन ॲक्टच्या कलम १८ व २४ नुसार आवश्यक असणारी रोखता व तरलता बँकेने वर्षभर नियमाप्रमाणे ठेवली आहे. बँकेची एकूण गुंतवणूक २ हजार ३१२ कोटी रुपये इतकी असल्याचे पवार यांनी सभेत स्पष्ट केले. ३१ मार्च अखेर १०७ कोटी ९१ लाख रुपये नफा झाला. सतत वाढत जाणारी अनिष्ठ तफावत लक्षात घेता मोठ्या प्रमाणात एनपीए कर्जाची तरतूद करावी लागली आहे. १०३ कोटी ८९ लाखाची तरतूद केल्याने बँकेला बँकेला ४ कोटी २ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.