शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

...म्हणून शून्य टक्के व्याजदाराची सवलत बंद करावी लागली : संजय पवार

By सुनील पाटील | Updated: September 25, 2023 15:38 IST

जिल्हा बँकेच्या एनपीएत ५.७३ टक्के वाढ

जळगाव : चालू खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड निर्धारित वेळेत केल्यास तीन लाखापर्यंत केंद्र शासन ३ टक्के तर डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. केंद्राचा परतावा हा थेट थेतकऱ्यांच्या बचत खात्यात (डीटीबी) जमा होणार असल्याने बँकेला नाईलाजास्तव शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करावी लागल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सर्वसाधारण बैठकित स्पष्ट केले.जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी बँकेच्या आवारात झाली. यावेळी अजेंड्यावरील दहा विषय अवघ्या ३० मिनिटात मंजूर करण्यात आले. या वर्षी बॅंक प्रथम व्याजासहित कर्ज वसूल करेल व नंतर शेतकऱ्यांना शासनाकडून व्याज परत मिळणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

शेती, बिगरशेती संस्था व व्यक्तीगत कर्जासाठी एक रकमी परतफेड योजना बँकेने राबविलेली आहे. या योजनेपोटी बँकेचे १.३२ कोटी व्याजाचे नुकसान झाले आहे. २१ डिसेंबरपर्यंत या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. अनिष्ठ तफावत वाढल्यामुळे मागील वर्षाच्या शेती कर्ज एनपीएमध्ये ५.७३ टक्के वाढ झाली असून आता ४१.१४ टक्के एनपीए झालेला आहे. अशाही परिस्थितीत बँकेने आतापर्यंत १ लाख ७९ हजार ७८२ शेतकऱ्यांना ८८० कोटी रुपयांचे पीक कर्ज स्वभांडवलातून वाटप केल्याचे संजय पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ५५१ विकासो अनिष्ठ तफावतीत असल्याचेही ते म्हणाले.

बँकेला १०७ वर्ष पूर्ण

जिल्हा बँकेच्या स्थापनेला १०७ वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत बँकेच्या ठेवी ३ हजार ४९५ कोटी होत्या, त्यात वाढ होऊन आज अखेर ३ हजार ७४६ कोटी इतक्या झालेल्या आहेत. बँकीग रेग्युलेशन ॲक्टच्या कलम १८ व २४ नुसार आवश्यक असणारी रोखता व तरलता बँकेने वर्षभर नियमाप्रमाणे ठेवली आहे. बँकेची एकूण गुंतवणूक २ हजार ३१२ कोटी रुपये इतकी असल्याचे पवार यांनी सभेत स्पष्ट केले. ३१ मार्च अखेर १०७ कोटी ९१ लाख रुपये नफा झाला. सतत वाढत जाणारी अनिष्ठ तफावत लक्षात घेता मोठ्या प्रमाणात एनपीए कर्जाची तरतूद करावी लागली आहे. १०३ कोटी ८९ लाखाची तरतूद केल्याने बँकेला बँकेला ४ कोटी २ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.