शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

स्मशानभूमीत लावली जांभळाची ३०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:46 IST

जळगाव : आपल्या कामाची दिशा योग्य असल्यास अनेक लोक जोडले जाऊन आपल्यावर विश्वास ठेवतात असे सांगून स्वच्छ पाणी, स्वच्छ ...

जळगाव : आपल्या कामाची दिशा योग्य असल्यास अनेक लोक जोडले जाऊन आपल्यावर विश्वास ठेवतात असे सांगून स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, वृक्षसंवर्धन व मुलांचे शिक्षण या चार गोष्टींचे योग्य नियोजन केले तर देश नक्की महासत्ता होईल, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. स्मशानभूमीत जांभळाची ३०० झाडे लावून वेगळा उपक्रम सुरु केल्याचे ते म्हणाले.बुधवारी केसीई सोसायटीच्या आयएमआरमध्ये ‘ग्रामीण व्यवस्थापन व अर्थकारण’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, धनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, रस्ते सुविधा, बायोगॅस नियोजन आदी ग्राविकासाच्या सुविधांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर केसीईचे कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, ममुराबादच्या सरपंच व आयएमआरच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री मोरे, संचालक प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. प्रास्ताविकात प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ.शमा सराफ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रणिल चौधरी याने करून दिला. अनेक गावांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच जिल्हा परीषदेचे अधिकारी उपस्थित होते. भाग्यश्री मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.‘...तर जलप्रदूषण टळेल’वृक्षारोपणासंबंधी पेरे म्हणाले की, नव्या नवरीला गावात आल्यावर एक फळ झाड लावायची प्रथा आपण सुरू केली असून गावातली सगळी मुले आज ताजे फळे तोडून खातात. तसेच स्मशानात ३०० जांभळाची झाडे लावली आहेत. तिथे मुले खेळायला जातात. मृत व्यक्तीची राख नदीत टाकू नका, तर झाडे लावा व ही राख तिथे टाका, त्यामुळे जलप्रदूषण टळेल, असा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव