शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्मशानभूमीत लावली जांभळाची ३०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:46 IST

जळगाव : आपल्या कामाची दिशा योग्य असल्यास अनेक लोक जोडले जाऊन आपल्यावर विश्वास ठेवतात असे सांगून स्वच्छ पाणी, स्वच्छ ...

जळगाव : आपल्या कामाची दिशा योग्य असल्यास अनेक लोक जोडले जाऊन आपल्यावर विश्वास ठेवतात असे सांगून स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, वृक्षसंवर्धन व मुलांचे शिक्षण या चार गोष्टींचे योग्य नियोजन केले तर देश नक्की महासत्ता होईल, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. स्मशानभूमीत जांभळाची ३०० झाडे लावून वेगळा उपक्रम सुरु केल्याचे ते म्हणाले.बुधवारी केसीई सोसायटीच्या आयएमआरमध्ये ‘ग्रामीण व्यवस्थापन व अर्थकारण’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, धनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, रस्ते सुविधा, बायोगॅस नियोजन आदी ग्राविकासाच्या सुविधांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर केसीईचे कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, ममुराबादच्या सरपंच व आयएमआरच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री मोरे, संचालक प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. प्रास्ताविकात प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ.शमा सराफ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रणिल चौधरी याने करून दिला. अनेक गावांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच जिल्हा परीषदेचे अधिकारी उपस्थित होते. भाग्यश्री मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.‘...तर जलप्रदूषण टळेल’वृक्षारोपणासंबंधी पेरे म्हणाले की, नव्या नवरीला गावात आल्यावर एक फळ झाड लावायची प्रथा आपण सुरू केली असून गावातली सगळी मुले आज ताजे फळे तोडून खातात. तसेच स्मशानात ३०० जांभळाची झाडे लावली आहेत. तिथे मुले खेळायला जातात. मृत व्यक्तीची राख नदीत टाकू नका, तर झाडे लावा व ही राख तिथे टाका, त्यामुळे जलप्रदूषण टळेल, असा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव