शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

स्मशानभूमीत लावली जांभळाची ३०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:46 IST

जळगाव : आपल्या कामाची दिशा योग्य असल्यास अनेक लोक जोडले जाऊन आपल्यावर विश्वास ठेवतात असे सांगून स्वच्छ पाणी, स्वच्छ ...

जळगाव : आपल्या कामाची दिशा योग्य असल्यास अनेक लोक जोडले जाऊन आपल्यावर विश्वास ठेवतात असे सांगून स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, वृक्षसंवर्धन व मुलांचे शिक्षण या चार गोष्टींचे योग्य नियोजन केले तर देश नक्की महासत्ता होईल, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. स्मशानभूमीत जांभळाची ३०० झाडे लावून वेगळा उपक्रम सुरु केल्याचे ते म्हणाले.बुधवारी केसीई सोसायटीच्या आयएमआरमध्ये ‘ग्रामीण व्यवस्थापन व अर्थकारण’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, धनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, रस्ते सुविधा, बायोगॅस नियोजन आदी ग्राविकासाच्या सुविधांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर केसीईचे कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, ममुराबादच्या सरपंच व आयएमआरच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री मोरे, संचालक प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. प्रास्ताविकात प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ.शमा सराफ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रणिल चौधरी याने करून दिला. अनेक गावांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच जिल्हा परीषदेचे अधिकारी उपस्थित होते. भाग्यश्री मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.‘...तर जलप्रदूषण टळेल’वृक्षारोपणासंबंधी पेरे म्हणाले की, नव्या नवरीला गावात आल्यावर एक फळ झाड लावायची प्रथा आपण सुरू केली असून गावातली सगळी मुले आज ताजे फळे तोडून खातात. तसेच स्मशानात ३०० जांभळाची झाडे लावली आहेत. तिथे मुले खेळायला जातात. मृत व्यक्तीची राख नदीत टाकू नका, तर झाडे लावा व ही राख तिथे टाका, त्यामुळे जलप्रदूषण टळेल, असा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव