शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

बहिणाबार्इंच्या कवितेतील आखजी (आखाजी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 5:49 PM

भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध भूमिका, वेशभूषा साकारलेल्या प्रा.कमल पाटील यांनी बहिणाबार्इंच्या कवितेतील आखाजी वर्णन केली आहे. वाचा ती त्यांच्याच शब्दात...

आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखाजी निंबावरी निंबावरी बांधलाय छान झोका जी ।असं म्हणून आमच्या बहिणाई या मोलाच्या सणाचे मौलिकत्व अतिशय मार्मिक, चपखल आणि गोड शब्दात गुंफत जातात. खरंच आमचे सण, उत्सव मानवी जीवन सर्वार्थाने सुखी करणारे आहेत. फक्त आम्ही त्यामागची वैचारिक, तात्त्विक बैठक समजून घेणे आवश्यक आहे. संसार तापाने तापलेल्या, त्रासलेल्या जीवाला सुखाची, आनंदाची, चैतन्याची नवसंजीवनी देणारे हे सण आहेत. बरेच सण स्त्रियांना आगळ्या वेगळ्या सुखाची अनुभूती देणारे आहेत. आमचा आखजीचा सण सासुरवाशीणीला कशी सुखाची अनुभूती देतो याचे सुंदर वर्णन आमच्या बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या ‘आखजी’ कवितेत केले आहे. बहिणाबार्इंनी गुढीपाडवा, आखजी, पोळा या खान्देशातील कृषी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या सणांचे सुंदर चित्रण केले आहे.खान्देशात साजरा होणारा ‘आखजी’ हा सण, या सणाचे त्या काळातील स्वरूप, महत्त्व कवयित्री बहिणाबाई चौधरी अतिशय रसाळ शब्दात सांगतात. बहिणाबार्इंच्या काळात १०, १२ वर्षाच्या मुलींचे विवाह होऊन त्या एकत्र कुटुंबात नांदायला जात. या एकत्र कुटुंबात काम आणि सासुरवास हेच या मुलींच्या वाट्याला यायचे. या त्रासात त्यांना माहेरची आस लागायची. या मुलींना सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळायचे ते सणाला माहेरपणासाठी गेल्यावर. त्यातही आखजीचा आनंद काय सांगावा -माझा झोका माझा झोकाचालला भिरीभिरी जी ।माझा झोका माझा झोकाखेयतो वाऱ्यावरी जी ।असा झोका, गाणे यांचा अपूर्व आनंद त्या लुटतात. या झोक्याच्या वर्णनाच्या ओघात सासुरवाशीणीच्या मनाची आंदोलनेही आमच्या बहिणाई अगदी हळूवारपणे टिपतात.गेला झोका गेला झोकाचालला माहेराले जी ।आला झोेका आला झोकापलट सासरले जी ।असे स्त्री मनाचे हेलकावे त्या सहज टिपतात. ‘आखजीला’ झोक्याच्या आनंदाबरोबर अनेक गोष्टींचा आनंद त्या घेतात. त्यात गवराईचे खेळही महत्त्वाचे आहेत.आमच्या खान्देशात आखजीची चाहुल चैत्राच्या सुरुवातीपासूनच लागते. लहान मुली चैत्र महिन्यात गवराई बसवतात. त्या सुंदर सजवतात म्हणूनच - गवराई गवराईसजव सजवल्या जीअशा सुंदर सजवलेल्या गवराईजवळ गाणे खेळ यासाठी ‘संगावीनी’ बोलवतात. गाण्यांबरोबर पिंगा, फुगडी, टिपºया अशा कितीतरी खेळांचा ‘धांगडधिंगा’ चालतो, एक वेगळा आनंदोत्सव या गवराईचे ‘आखजीला थाटात विसर्जन होते.किती खेय, किती खेय,सांगू मी काय काय जीखेयीसनी खेयीसनीआंबले हातपायजीअशा खेळून थकलेल्या या मुली दोन दिवस विसावा घेतात आणि ‘सन सरे आस उरे’ असे म्हणून आता परत आखजी केव्हा येणार, असे ‘सईला’ विचारुन संसाराला लागतात, असे सुंदर वर्णन आखजीचे माझ्या बहिणाई करतात. लेवागण बोलीमुळे काव्य अधिकच रसाळ होते. याशिवाय या सणाला अनेक पैलू आहेत. पौराणिक महत्त्व या सणाचे आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण खरंच मोलाचा नाही का?-प्रा.कमल पाटील, भुसावळ

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ