शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

सिंहगड : एक रोमांचक अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:30 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘पर्यटन’ या सदरात जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील प्रा.जयंत इंगळे यांनी सिंहगडाचे सांगितलेले अनुभव.

पावसाळ्यातील ते दिवस होते. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सिंहगड सफर करण्याचे ठरविले. त्यावेळी मी एम.ए.च्या शेवटच्या वर्षाला होतो. शिक्षणानिमित्त पुण्यालाच रहायला होतो. त्यामुळे सिंहगडला जाणे सोयीचे होते. पुण्यावरून सिंहगड २५ कि.मी. व दळणवळणाची साधेनही भरपूर. आम्ही सुट्टीचा दिवस निवडून सिंहगडकडे आगेकूच केली. पुण्याहून बसने सुरू केलेल्या या प्रवासात आम्ही स्वारगेट-खडकवासला मार्गे सिंहगडच्या पायथ्याशी येऊन पोहचलो. सिंहगड किल्ला हा सह्याद्री पर्वताच्या भक्कम अशा शिखरावर सुमारे ४४०० फुटांवर स्थित आहे. आम्ही सिंहगड ट्रेकिंग करीत सर करण्याचे ठरविले. सकाळी १० वाजता आम्ही सिंहगडच्या पायथ्यापासून आमचा कठीण प्रवास सुरू केला.सुरुवातीला सहज पाऊल टाकत आम्ही सह्याद्रीची उंची हळूहळू चढत होतो. १०० मीटर उंचीवर गेल्यावर झपझप चालणारी आमची पाऊले मंदावत गेली. सह्याद्रीचा चढ हा तीव्र आहे. अशा तीव्र चढावर आपल्या शरीरातील ऊर्जा ही चढताना प्रचंड प्रमाणात खर्च होते. आमच्या पायांना पेटके आलेले होते. तेव्हा आम्ही थोड्या-थोड्या अंतराने विश्राम करीत चढायचे ठरविले, मध्ये-मध्ये उतारावर छोट्याशा जागेवर मांडलेल्या ताकाच्या स्टॉलने आम्हाला दिलासा दिला. पेलाभर ताक पिऊन आम्ही पुन्हा चढाईला लागायचो.या प्रवासात अनेक रंगीत रानफुले, वेगवेगळ्या आकारांची व रंगांची फुलपाखरे, दऱ्या-खोºया दृष्टीस पडत होते. यामुळे मनाला, शरीराला आलेला थकवा कमी होण्यास सहाय्य मिळे. सलग दोन-अडीच तास सततची चढ करीत आम्ही अवघड अशा सिंहगडला गवसणी घातली. एवढ्या उंचीचा चढ चढून गेल्याबद्दल आम्हाला विलक्षण आनंद झाला व स्वत:चा अभिमानही वाटला. महाराष्ट्राचा अभिमान व अस्मिता, इतिहासाची पाने सुवर्ण व समृद्ध करणाºया माझ्या छत्रपती शिवरायांची आठवण मनात तरळून गेली. उंच, कपाºयात व प्रतिकूल शिखरावर असलेल्या अशा किल्ल्याहून राजांनी मावळ्यांना घेऊन किती कठीण युद्धे जिंकलेली आहेत. या विचाराने अंगावर काटा येतो.चढल्याबरोबर आम्हाला दृष्टीस पडला तो पुणे दरवाजा. या दरवाजातून आत प्रवेश करून आम्ही सिंहगडची खरी सफर सुरू केली. या किल्ल्याचे दुसरे नाव ‘कोंढाणा’ असेही आहे. सिंहगड किल्ला म्हटला म्हणजे तानाजी मालुसरे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे’ अशी शाश्वती देऊन, मोजक्या, मावळ्यांना सोबत घेऊन अखेरपर्यंत झुंज देत सिंहगड सर करणाºया या वीरांचे स्मारक या ठिकाणी बांधलेले आहे.ज्या उदेभान या मोगलांच्या अधिकाºयाला संपवून तानाजीने सिंहगड जिंकवून दिला, त्यातही स्मारक कल्याण दरवाजामागे स्थित आहे. उदेभानच्या स्मारकापुढून समोरच्या टेकडीवरून उतरून आपण ‘झुंजार बुरुजावर’ पोहचतो. किल्ला परिसराच्या दक्षिण टोकाला ‘झुंझार बुरुज’ आहे. हा बुरुज अनेक वर्षांनंतरही भक्कम उभा आहे. या बुरुजाच्या मार्गानेच तानाजी आपल्या मावळ्यांसह चढले. या कडेला ‘तानाजी कडा’ असेही म्हणतात. या ठिकाणाहून राजगड, तोरणा व दूरवर पुरंदर किल्ला दिसतो.तानाजी मालुसरे स्मारकाच्या डाव्या बाजूला छोटा तलाव आहे. या तलावाचे पाणी खूप गार व नितळ आहे. या तलावाच्या डाव्या हाताला ‘देवटाके’ आहे. ह्यात असलेल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात राजाराम यांचे स्मारक आहे.या स्मारकाचे वैशिष्ट्य असे की, याचा घुमट रंगीत देवळासारखा आहे. तो दिसण्यास सुंदर आहे. पूर्वीच्या काळी बांधलेले अमृतेश्वर भैरव मंदिर व कोंढाणेश्वर मंदिर आपल्याला सिंहगडावर अजूनही चांगल्या स्थितीत दिसतात.