शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चांदीला चंदेरी धार! दिवसात १४०० ने वाढ, भाव ८७ हजार चारशे पार

By विजय.सैतवाल | Updated: May 17, 2024 17:18 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढली मागणी : सोने ७३,८०० रुपयांवर स्थिर.

विजयकुमार सैतवाल, जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून भाववाढ सुरू असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवार, १७ मे रोजी तर एकाच दिवसात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी भावावर पोहचली आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.

मार्च महिन्यात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना चांदीच्या भावात फारसी वाढ नव्हती. एप्रिल महिन्यात चांदीच्याही भावात वाढ सुरू झाली. नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव कमी झाले. पुन्हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते वाढू लागले. त्यात १३ मेपासून तर सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये ८४ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ मे रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. दुसऱ्या दिवशी १४ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८५ हजार रुपयांवर पोहचली.

१५ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १६ रोजी एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ८६ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकी भावावर पोहचली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात १७ मे रोजी हा उच्चांक मागे टाकत थेट एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८७ हजार ४०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. दोन दिवसात चांदीत दोन हजार ४०० रुपयांची वाढ नोंदली गेली आहे.

एकीकडे चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना १६ मे रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. १७ रोजी मात्र ते याच भावावर स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक चांदीची मागणी वाढवण्यात आल्याने ही भाववाढ होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSilverचांदी