शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

विद्युत खांब हटविण्याच्या निधीच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांची स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

पुढील आठवड्यापासून कामाला सुरुवात ? : पालकमंत्र्यांची माहिती ; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर ...

पुढील आठवड्यापासून कामाला सुरुवात ? : पालकमंत्र्यांची माहिती ; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला प्रमुख अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीच्या मनपाच्या प्रस्तावावर अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. बुधवारी रात्री उशिरा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्र्यांची भेट घेट घेऊन मनपाने २५ कोटीमधील शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. आता याबाबत सोमवारी मंजुरीचे पत्र देऊन पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम विद्युत खांबांमुळे थांबले आहे. हे विद्युत खांब काढले जात नाहीत तोपर्यंत या पुलाचे पुढील काम होणे शक्य नाही. अनेक महिन्यांपासून मनपा प्रशासन, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची या कामाबाबत टोलवा - टोलवी संपल्यानंतर आता मनपाने दिलेल्या दीड कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे विद्युत खांब हटविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

‘लोकमत’ने ५ लाख नागरिकांचा प्रश्न लावून धरला

शहरातील १ लाख नागरिकांसह चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांमधील ४ लाख असे एकूण ५ लाख नागरिकांच्या दृष्टीने शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. विद्युत खांब हटविले जात नसल्याने ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित करून, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. ‘लोकमत’कडून सुरु असलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन अखेर विद्युत खांब हटविण्याच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांनी स्वाक्षरी करून, प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक पाऊल पडले आहे.

पुढील आठवड्यापर्यंत होऊ शकते कामाला सुरुवात

महावितरणच्या माध्यमातून विद्युत खांब हटविण्याचे काम पूर्ण होणार असून, महावितरणने याबाबतचे अंदाजपत्रक तयार करून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाकडून दोन दिवसात याबाबत अधिकृत मंजुरी जाहीर केली जाणार असून, निधी वर्ग झाल्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

कोट..

शिवाजीनगर उड्डाणपूल हा केवळ जळगाव शहरातील नागरिकांसाठीच नाही तर जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. काही कारणास्तव या पुलाचे काम रखडले होते. विद्युत खांब हटविण्याचे काम या पुलात मुख्य अडथळा बनले होते. मात्र, नगरविकास मंत्र्यांनी याबाबत मनपाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून, मुख्य अडथळा दूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल.

-गुलाबराव पाटील, पालकमंत्री