शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

विद्युत खांब हटविण्याच्या निधीच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांची स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

पुढील आठवड्यापासून कामाला सुरुवात ? : पालकमंत्र्यांची माहिती ; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर ...

पुढील आठवड्यापासून कामाला सुरुवात ? : पालकमंत्र्यांची माहिती ; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला प्रमुख अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीच्या मनपाच्या प्रस्तावावर अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. बुधवारी रात्री उशिरा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्र्यांची भेट घेट घेऊन मनपाने २५ कोटीमधील शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. आता याबाबत सोमवारी मंजुरीचे पत्र देऊन पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम विद्युत खांबांमुळे थांबले आहे. हे विद्युत खांब काढले जात नाहीत तोपर्यंत या पुलाचे पुढील काम होणे शक्य नाही. अनेक महिन्यांपासून मनपा प्रशासन, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची या कामाबाबत टोलवा - टोलवी संपल्यानंतर आता मनपाने दिलेल्या दीड कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे विद्युत खांब हटविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

‘लोकमत’ने ५ लाख नागरिकांचा प्रश्न लावून धरला

शहरातील १ लाख नागरिकांसह चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांमधील ४ लाख असे एकूण ५ लाख नागरिकांच्या दृष्टीने शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. विद्युत खांब हटविले जात नसल्याने ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित करून, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. ‘लोकमत’कडून सुरु असलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन अखेर विद्युत खांब हटविण्याच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांनी स्वाक्षरी करून, प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक पाऊल पडले आहे.

पुढील आठवड्यापर्यंत होऊ शकते कामाला सुरुवात

महावितरणच्या माध्यमातून विद्युत खांब हटविण्याचे काम पूर्ण होणार असून, महावितरणने याबाबतचे अंदाजपत्रक तयार करून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाकडून दोन दिवसात याबाबत अधिकृत मंजुरी जाहीर केली जाणार असून, निधी वर्ग झाल्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

कोट..

शिवाजीनगर उड्डाणपूल हा केवळ जळगाव शहरातील नागरिकांसाठीच नाही तर जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. काही कारणास्तव या पुलाचे काम रखडले होते. विद्युत खांब हटविण्याचे काम या पुलात मुख्य अडथळा बनले होते. मात्र, नगरविकास मंत्र्यांनी याबाबत मनपाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून, मुख्य अडथळा दूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल.

-गुलाबराव पाटील, पालकमंत्री