शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

स्वाक्षरी अस्पष्ट असल्याने जळगावात महावितरणच्या ११ परीक्षार्थींना प्रवेश नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:33 IST

महावितरणच्या ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअरपदाच्या परीक्षेत गोंधळ

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा संतापअन् परीक्षार्र्थींना अश्रू अनावर

जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअरपदासाठी शनिवारी आयबीपीएसच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान शहरातील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला़ केंद्र प्रमुखाकडील परीक्षार्थींच्या यादीत सही अस्पष्ट असल्याच्या कारणावरून पर्यवेक्षकाने ११ परीक्षार्थींना हॉलबाहेर काढले. ओळखीचा पुरावा असतानासुद्धा परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे परीक्षार्र्थींनी तीव्र संताप व्यक्त केला.गुलाबराव देवकर अभियांत्रिकीच्या केंद्रावरील घटनामहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत ट्रेनी इंजिनिअरपदाच्या ६३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान १५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी आयबीपीएसतर्फे एका खासगी कंपनीला देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी सकाळी ८़३० वाजेपासून परीक्षार्थी जमले होते. महिला परीक्षा केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकाकडून परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रासह अन्य कागदपत्रांची तपासणी करून त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र, काही परीक्षार्थींची केंद्र प्रमुखाकडे असलेल्या यादीत सही अस्पष्ट होती़ त्यांना सही अस्पष्ट असल्याने ११ परीक्षार्र्थींना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश का नाकारला याची विचारणा त्या ११ परीक्षार्थींनी केली असता परीक्षा केंद्राप्रमुखाकडून कोणतेही उत्तर त्यांना मिळाले नाही़ फक्त या संकेतस्थळावर तक्रार करा एवढेच सांगून त्या निघून गेल्या़ तसेच परीक्षार्थींनी विनंती करूनही त्यांचे म्हणणे ऐकून न घेता परीक्षा हॉलचा दरवाजा बंद केला़ त्यानंतर आपले कुणीही ऐकून घेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलच्या बाहेरच ठिय्या मांडला़अन् परीक्षार्र्थींना अश्रू अनावरस्वत:ची चूक नसताना फक्त आॅनलाइन घोळामुळे सही अस्पष्ट आल्याच्या कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे ११ परीक्षार्थींपैकी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे परीक्षार्थींची समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केंद्र गाठले़ परीक्षार्र्थींचे म्हणणे समजून घेतले. त्यामुळे ते शांत झाले़सन २०१५ पासून परीक्षेसाठी तयारी करीत होतो. सही अस्पष्ट असल्याच्या कारणावरून परीक्षा हॉलच्या बाहेर काढण्यात आले़ कुणीही आमचे ऐकून घेतले नाही़-संदेश पाटील, परीक्षार्थी

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव