शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठेवी परत मिळत नसल्याने जळगाव जिल्हा उपनिबंधकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:54 IST

ठेवीदार संतप्त : ठेवी का मिळत नाही?

जळगाव - जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी दहा-बारा वर्षे होऊनही परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात गाठून घेराव घातला. तसेच ठेवी का मिळत नाही? असा सवाल उपस्थित करून ठेवीदारांनी उपनिबंधकांना धारेवर धरले.जिल्ह्यातील ठेवीदारांना गेल्या दहा-बारा वर्षापासून त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याचे चित्र असून सहकार विभागाकडून ठेवीदारांची घोर निराशा झाली आहे. अनेक ठेवीदार तर मयत झाले तरीदेखील त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळाला नाही. यासंदर्भात जळगाव जिल्हा महिला ठेवीदार समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यातील ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा संध्या चित्ते, प्रवीणसिंग पाटील यांनी ठेवीदारांच्या ठेवींसंदर्भात उपनिबंधकांना धारेवर धरले.अ?क्शन प्लॅनची अंमलबजावणी नाहीतत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आलेल्या अ‍ॅक्शन प्लॅनवर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? ठेवीदारांना निव्वळ आश्वासने देऊन वेळ का मारून नेली जात आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती ठेवीदारांकडून करण्यात आली.सहकार आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर उपनिबंधकांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. ते का पाळले जात नाही? असा सवालही ठेवीदारांना उपनिबंधकांना केला.यावेळी लक्ष्मण कोल्हे, ताराबाई माळी, मीराबाई नारखेडे, कल्पना बढे, शारदा चौधरी, मधुकर बढे, नारायण चौधरी, चित्रकला फेगडे, योगीता घोराडे, स्वाती फेगडे, वैशाली नेहते, निलीमा पाटील, लता लोखंडे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव