शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:45 IST

जळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला

विकास पाटीलजळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्या जागी नवीन पूल उभारणे आवश्यक असताना शासन चालढकल करीत आहे. पूल कोसळणार तेव्हा शासनाला जाग येईल की काय? असा सवाल जळगावकरांकडूनउपस्थित होत आहे.जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरासह जळगाव, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वपूर्ण पूल असल्याने त्यावरुन रात्रंदिवस वाहतूक सुरु असते. १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने हा पूल जीर्ण झाला असून धोकादायक बनला आहे. त्यावरुन अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरु राहिल्यास तो कोसळू शकतो व मोठी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे सुमारे दीड वर्षांपासून या पुलावर क्रॉसबार बसवून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो वाहनधारकांना ८ किलो मीटरच्या फेऱ्याने दुसºया मार्गाने प्रवास करावा लागत आहे. सुरक्षेसाठी नागरिक हात्रास सहन करीत आहे मात्र कधीपर्यंत?या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याची जबाबदारी ज्या शासन व प्रशासनावर आहे त्यांच्याकडून चालढकल होत आहे. ही चालढकल जीवावर बेतू शकते. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व प्रशासन जागे होत असते. हे आपण नेहमीच अनुभवतो. मुंबईतील एल्फीन्स्टन पुलाचे उदाहरण बोलके आहे. निष्पाप, निरपराध जीव जाण्यापूर्वी शासन व प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला. रेल्वे प्रशासन त्यांचे काम करण्यात तयार आहे. मात्र राज्य शासनाचा सार्वजनिक विभाग निर्णय घेण्यास तयार नाही.या पुलाच्या टी आकाराच्या आराखड्यास शिवाजीनगरवासीयांचा विरोध आहे. त्यांचा विरोध न जुमानता टी आकारातच उड्डाणपूल उभारण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव दौºयात जाहीर केले आहे. लोकभावनांचा शासन व प्रशासनाने आदर करणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हे योग्य नाही. पूल उभारण्यापूर्वी शिवाजीनगरवासीयांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही त्यांची भूमिका समजून घेण्यात आलेली नाही. त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढून पुलाचे काम लवकरमार्गी लावणे आवश्यक आहे. कारण चार तालुक्यातील रहिवाशांना दैना झालेल्या पर्यायी रस्त्यावरुन दररोज ये-जा करावी लागत आहे. पूल उभारण्यात आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाईल. तोपर्यंत हालअपेष्टा नागरिकांना सहन कराव्या लागतील.जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. पाटील यांची ओळख कार्यतत्पर मंत्री म्हणून आहे. त्यांनी जळगावकरांच्या सोयीसाठी तत्परतेने निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा विषय त्यांच्याच विभागाशी संबधित असल्याने त्यांना हा प्रश्न मार्गी लावण्यात अडचण नसावी. बघूया चंद्रकांत पाटील हे या पुलाचा विषय कधी मार्गी लावतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव