शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:45 IST

जळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला

विकास पाटीलजळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्या जागी नवीन पूल उभारणे आवश्यक असताना शासन चालढकल करीत आहे. पूल कोसळणार तेव्हा शासनाला जाग येईल की काय? असा सवाल जळगावकरांकडूनउपस्थित होत आहे.जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरासह जळगाव, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वपूर्ण पूल असल्याने त्यावरुन रात्रंदिवस वाहतूक सुरु असते. १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने हा पूल जीर्ण झाला असून धोकादायक बनला आहे. त्यावरुन अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरु राहिल्यास तो कोसळू शकतो व मोठी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे सुमारे दीड वर्षांपासून या पुलावर क्रॉसबार बसवून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो वाहनधारकांना ८ किलो मीटरच्या फेऱ्याने दुसºया मार्गाने प्रवास करावा लागत आहे. सुरक्षेसाठी नागरिक हात्रास सहन करीत आहे मात्र कधीपर्यंत?या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याची जबाबदारी ज्या शासन व प्रशासनावर आहे त्यांच्याकडून चालढकल होत आहे. ही चालढकल जीवावर बेतू शकते. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व प्रशासन जागे होत असते. हे आपण नेहमीच अनुभवतो. मुंबईतील एल्फीन्स्टन पुलाचे उदाहरण बोलके आहे. निष्पाप, निरपराध जीव जाण्यापूर्वी शासन व प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला. रेल्वे प्रशासन त्यांचे काम करण्यात तयार आहे. मात्र राज्य शासनाचा सार्वजनिक विभाग निर्णय घेण्यास तयार नाही.या पुलाच्या टी आकाराच्या आराखड्यास शिवाजीनगरवासीयांचा विरोध आहे. त्यांचा विरोध न जुमानता टी आकारातच उड्डाणपूल उभारण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव दौºयात जाहीर केले आहे. लोकभावनांचा शासन व प्रशासनाने आदर करणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हे योग्य नाही. पूल उभारण्यापूर्वी शिवाजीनगरवासीयांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही त्यांची भूमिका समजून घेण्यात आलेली नाही. त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढून पुलाचे काम लवकरमार्गी लावणे आवश्यक आहे. कारण चार तालुक्यातील रहिवाशांना दैना झालेल्या पर्यायी रस्त्यावरुन दररोज ये-जा करावी लागत आहे. पूल उभारण्यात आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाईल. तोपर्यंत हालअपेष्टा नागरिकांना सहन कराव्या लागतील.जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. पाटील यांची ओळख कार्यतत्पर मंत्री म्हणून आहे. त्यांनी जळगावकरांच्या सोयीसाठी तत्परतेने निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा विषय त्यांच्याच विभागाशी संबधित असल्याने त्यांना हा प्रश्न मार्गी लावण्यात अडचण नसावी. बघूया चंद्रकांत पाटील हे या पुलाचा विषय कधी मार्गी लावतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव