शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी नगर पुलाच्या कामाच्या संथ गतीवरून मक्तेदाराला खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST

शिवाजी नगर उड्डाणपुलाची केली पहाणी : नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी : पादचाऱ्यांसाठी ...

शिवाजी नगर उड्डाणपुलाची केली पहाणी : नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या सूचना

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी : पादचाऱ्यांसाठी रस्ता तयार करण्याची सुचना

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दोन वर्षांची मुदत संपूनही शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण न केलेल्या मक्तेदाराला शुक्रवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलेच खडसावले. कामाला इतका विलंब का, काम कधी पूर्ण होणार,कामात प्रगती का नाही, पुलाचे काम विलंबाने होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याचे काय? यासह अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मक्तेदाराच्या अभियंत्यांना धारेवर धरून संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्यामुळे उड्डाणपूलाच्या जागेमध्येच पादचारी व दुचाकी वाहन धारकांसाठी तात्पुरता रस्ता तयार करण्याचीही सूचना मक्तेदाराला केली. शहरातील जीर्ण झालेल्या शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे पुलाचे काम बंद असल्याने, पुलाच्या कामासाठी गेल्या एक वर्षापासून बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा उघडण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली होती. यावेळी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुलाचे सुरू असलेले विलंबाने काम व यामुळे नागरिकांना शिवाजी नगरात जाण्यासाठी कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे, या बाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.या प्रकारावरून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्रसिंग राजपूत व सहाय्यक अभियंता सुभाष राऊत यानी शुक्रवारी दुपारी बारा वाजता अचानक शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता व सबंधित मक्तेदाराचे अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते.

इन्फो :

कामाची पाहणीकरून मक्तेदारावर नाराजी

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास कामाची पाहणी करून, सध्या स्थितीला सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना दोन वर्षात उड्डाण पुलाचे पाहिजे तसे काम झालेले दिसून आले नाही. यावेळी उड्डाण पुलाचे काम करणारे मक्तेदार आदित्य खटोड कामाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सबंधित मक्तेदाराचे अभियंते व तेथील सुपरवायझर यांच्याकडून पुलाच्या कामाची माहिती जाणून घेतली. मात्र, पुलाच्या कामाच्या पाहणीच्या वेळी अतिशय संथ गतीने काम सुरू असल्याचे दिसून आल्यावर गजेंद्र राजपूत यांनी मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जानेवारी पासून एकच गर्डरचे काम सुरू असून, तेदेखील पूर्ण झालेले दिसून येत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

इन्फो :

दोन दिवसांत पादचाऱ्यांसाठी रस्ता तयार करण्याचे आदेश

पुलाच्या कामामुळे शिवाजी नगरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यात पुलाच्या कामासाठी वर्षभरापासून बंद करण्यात आलेले रस्ते सुरू करण्याची मागणी गुप्ता यांनी यावेळी केली. यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी पादचारी नागरिक व दुचाकी वाहने जातील,अशा प्रकारचा रस्ता सुरु करून, तो दोन दिवसात सुरू करण्याची सूचना सबंधित मक्तेदाराला केली.

इन्फो :

शुक्रवारी दुपारी शिवाजी नगर उड्डाणपुलाची पाहणी केली. पुलाच्या काम दिरंगाईने होत असल्याबाबत मक्तेदाराशी बोललो, तसेच त्यांना वेगाने काम करण्याचेही सांगितले. तसेच शिवाजी नगरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पुलाच्या ठिकाणी एक लहान रस्ता तयार करण्याचेही मक्तेदाराला सांगितले आहे.

गजेंद्रसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग