शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा 'दे धक्का'

By admin | Updated: October 20, 2014 10:09 IST

तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे.

 

धरणगाव : तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे. दोन गुलाबरावांच्या अस्तित्वाच्या या लढाईत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रभुत्व असताना २00९ च्या निवडणुकीत जळगाव निवासी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा विजय झाला होता. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गुलाबराव पाटील यांचा झालेला पराभव शिवसैनिकांना जबर धक्का देऊन गेला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिकांनी चंग बांधला होता. तर पराभव पत्करून घरी न बसता गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघाशी नाळ जोडत त्यांच्या सुखदु:खात हिरिरीने भाग घेऊन सर्वांना आपलेसे केले होते. नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतेक ग्रामपंचायती या पाच वर्षात शिवसेनेच्या ताब्यात होत्या. फक्त आमदारकी मिळावी यासाठी शिवसेनेने 'अब की बार, भाऊ आमदार' हे मिशन राबविले व ते यशस्वीही झाले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यात व शहरात सुरुवातीला सर्वांना विश्‍वासात घेऊन कामे केली. मात्र धरणगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत देवकारांनी ज्ञानेश्‍वर महाजन यांच्याविरोधात घेतलेला निर्णय व त्यांच्या विरुद्ध दाखल केलेले अपात्रता प्रकरण याचाही फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसते. माळी समाजाने महाजन यांच्यावर झालेला अन्याय मतदान रूपाने व्यक्त केल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टी शिवसेनेला बळकटी देणार्‍या ठरल्या व देवकरांना त्याचा फटका बसला. त्यात धरणगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम न झाल्याने नाराजीचा सूर होता. भाजपाचे उमेदवार म्हणून जि.प.चे माजी शिक्षण सभापती पी.सी. पाटील यांनी फक्त १५ दिवसात मिळविलेली मतेही कौतुकास्पद आहेत. त्यांना ४४ हजार मते मिळून ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यांना माजी मंत्री देवकर यांच्यापेक्षा फक्त ८ हजार ६४२ मते कमी पडली. त्यांनी आता घेतलेली आघाडी भविष्यात त्यांना फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डी.जी. पाटील व मनसेचे उमेदवार मुकुंदा रोटे यांच्यावर अनामत जप्त होण्याची नामुष्की आली. काँग्रेसने डी.जी. पाटील यांच्या प्रचारार्थ एकही सभा दिली नाही. त्यांना वार्‍यावर सोडले होते. तर मनसेचे उमेदवार यांनी साधी प्रचारपत्रिकाही करण्याची तसदी घेतली नाही. या मतदारसंघाने पूर्वी दोनदा व आता असे तीनदा आमदारकीची संधी दिली आहे. त्यामुळे साहजिकच विकासकामांची अपेक्षा गुलाबराव पाटील यांच्याकडून मतदारांना आहे. शहराचा जलशुद्धीकरण केंद्राचा प्रश्न व उर्वरित विकासकामे त्यांनी मार्गी लावून मतदारसंघाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.