शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा 'दे धक्का'

By admin | Updated: October 20, 2014 10:09 IST

तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे.

 

धरणगाव : तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे. दोन गुलाबरावांच्या अस्तित्वाच्या या लढाईत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रभुत्व असताना २00९ च्या निवडणुकीत जळगाव निवासी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा विजय झाला होता. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गुलाबराव पाटील यांचा झालेला पराभव शिवसैनिकांना जबर धक्का देऊन गेला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिकांनी चंग बांधला होता. तर पराभव पत्करून घरी न बसता गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघाशी नाळ जोडत त्यांच्या सुखदु:खात हिरिरीने भाग घेऊन सर्वांना आपलेसे केले होते. नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतेक ग्रामपंचायती या पाच वर्षात शिवसेनेच्या ताब्यात होत्या. फक्त आमदारकी मिळावी यासाठी शिवसेनेने 'अब की बार, भाऊ आमदार' हे मिशन राबविले व ते यशस्वीही झाले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यात व शहरात सुरुवातीला सर्वांना विश्‍वासात घेऊन कामे केली. मात्र धरणगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत देवकारांनी ज्ञानेश्‍वर महाजन यांच्याविरोधात घेतलेला निर्णय व त्यांच्या विरुद्ध दाखल केलेले अपात्रता प्रकरण याचाही फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसते. माळी समाजाने महाजन यांच्यावर झालेला अन्याय मतदान रूपाने व्यक्त केल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टी शिवसेनेला बळकटी देणार्‍या ठरल्या व देवकरांना त्याचा फटका बसला. त्यात धरणगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम न झाल्याने नाराजीचा सूर होता. भाजपाचे उमेदवार म्हणून जि.प.चे माजी शिक्षण सभापती पी.सी. पाटील यांनी फक्त १५ दिवसात मिळविलेली मतेही कौतुकास्पद आहेत. त्यांना ४४ हजार मते मिळून ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यांना माजी मंत्री देवकर यांच्यापेक्षा फक्त ८ हजार ६४२ मते कमी पडली. त्यांनी आता घेतलेली आघाडी भविष्यात त्यांना फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डी.जी. पाटील व मनसेचे उमेदवार मुकुंदा रोटे यांच्यावर अनामत जप्त होण्याची नामुष्की आली. काँग्रेसने डी.जी. पाटील यांच्या प्रचारार्थ एकही सभा दिली नाही. त्यांना वार्‍यावर सोडले होते. तर मनसेचे उमेदवार यांनी साधी प्रचारपत्रिकाही करण्याची तसदी घेतली नाही. या मतदारसंघाने पूर्वी दोनदा व आता असे तीनदा आमदारकीची संधी दिली आहे. त्यामुळे साहजिकच विकासकामांची अपेक्षा गुलाबराव पाटील यांच्याकडून मतदारांना आहे. शहराचा जलशुद्धीकरण केंद्राचा प्रश्न व उर्वरित विकासकामे त्यांनी मार्गी लावून मतदारसंघाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.