शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

गाळेप्रश्नावर शिवसेना विरुद्ध शिवसेना..., राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या निर्णयावर महासभेची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 10:31 IST

महापालिकेची २४ रोजी तहकूब झालेली महासभा गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

जळगाव : सप्टेंबर २०१९ मध्ये मुदत संपलेल्या गाळेधारकांबाबत घेतलेल्या शासन निर्णयाला राज्य शासनाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मनपातील सत्ताधारी शिवसेनेकडूनच नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेबाबत निर्णय घेत असताना, महापालिकेचाच विचार करण्यात आलेला नसल्याचे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले आहे. राज्यात शिवसेनेची व मनपातही सेनेची सत्ता आहे. राज्य शासनाच्या निर्णयावर थेट नाराजी व्यक्त करून, गाळेप्रश्नावर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महापालिकेची २४ रोजी तहकूब झालेली महासभा गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. महासभेच्या आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा होत असताना, महापालिकेच्या उत्पन्नाबाबत चर्चा झाली. त्यात मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शासन निर्णयाला राज्य शासनाने स्थगिती दिल्याच्या निर्णयावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली.

...तर शासनाच्या दयेवरच मनपाला अवलंबून राहावे लागेल? - नितीन लढ्ढा

१. राज्य शासनाने गाळेधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय घेताना, सर्वांसाठी एकसमान निर्णय घेऊन टाकला आहे. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार असल्याचे मत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले. हा निर्णय घेताना व्यावसायिक व अव्यावसायिक मार्केट अशी विभागणी करणे गरजेचे होते, असेही लढ्ढा म्हणाले.

२. गाळेधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, तसेच सर्वच नगरसेवक गाळेधारकांच्या बाजूने आहेत. मात्र, राज्य शासन किंवा राज्यातील विरोधी पक्षनेत्यांना विधानसभेत चर्चा करत असताना महापालिकेचाही विचार करणे गरजेचे होते. भाडेपट्ट्यात जर ८ टक्क्यांऐवजी १ किंवा ३ टक्क्यांपर्यंत घट केली तर महापालिकेला शासनाच्या दयेवरच अवलंबून राहावे लागेल, अशा शब्दांत लढ्ढा यांनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

...तर शासन निर्णयाविरुद्ध न्यायालयात जावे लागेल - कैलास सोनवणे१. राज्य शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून, यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे मत भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी व्यक्त केले. तसेच काही जणांच्या हितासाठी ६ लाख नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले गेले नसल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.

२. या निर्णयाविरोधात सत्ताधाऱ्यांनी किंवा मनपाने न्यायालयात जावे, असा सल्लाही कैलास सोनवणे यांनी दिला आहे. शासनाच्या निर्णयाबाबत शिवसेनेचे नगरसेवक प्रा. सचिन पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने अद्याप स्थगिती दिली असून, कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मनपाची बाजू मांडून गाळेधारकांना विशेषकरून अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांवर अन्याय होणार नाही व मनपाचेही नुकसान होणार नाही, याबाबत शासनाच्या लक्षात आणून देण्याबाबतही महासभेत चर्चा झाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव