शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

शिवसेनेने जनादेशाचा केला अपमान - भाजप आमदारांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:14 IST

महायुती असताना शिवसेनेचा अट्टाहास राज्यातील स्थितीला कारणीभूत असल्याचा सूर

जळगाव : राष्ट्रपती राजवट लागू होणे हा एक प्रक्रियेचा भाग आहे. पुढे आता चर्चा होऊन भाजप पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करू शकतो असा दावा जिल्ह्यातील भाजप आमदार व जिल्हाध्यक्षांनी केला आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असताना केवळ शिवसेनेच्या अट्टाहासामुळे राज्यात सध्याची स्थिती उद््भवली असल्याचे सांगत शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला असल्याचा आरोपही भाजपतर्फे करण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्र पक्षांची महायुती झाली. यात जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला व भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र शिवसेनेच्या अट्टाहासामुळे महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही, अशा प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवित सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेवर पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेची नाचक्की झाल्याचेही भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीला केवळ शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.राष्ट्रपती राजवट लागू होणे हा प्रकियेचा भाग आहे. यात केव्हाही सरकार स्थापन होऊ शकते. त्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असून ज्याच्याकडे १४५ आमदार असतील त्यांचे सरकार स्थापन होईल. भाजपही पुन्हा दावा करू शकते.- आमदार सुरेश भोळे, भाजप जिल्हा महानराध्यक्ष.राज्यातील जनतेचा जनादेश महायुतीच्या बाजूने असताना शिवसेनेने या जनादेशाचा अपमान केला आहे. राज्यातील स्थितीला केवळ शिवसेनाच जबाबदार आहे.- आमदार मंगेश चव्हाण.विधानसभा निवडणुकीसाठी महायुती झाली व त्याबाजूने कौल मिळालेला असताना शिवसेनेने अट्टाहास करायला नको होता. ज्यांच्या शब्दावर शिवसेनेने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला त्यांचे अखेर पत्रही मिळू शकले नाही. आता पुन्हा चर्चा होऊन भाजप सत्ता स्थापन करू शकते.- डॉ. संजीव पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) भाजप.

टॅग्स :Jalgaonजळगाव