शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

भाजपविरोधात शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 13:08 IST

दुय्यम वागणूक मिळाल्याने शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांमध्ये भाजपविषयी कायम नाराजीची भावना, काँग्रेस-राष्टÑवादी मजबूत असलेल्या ठिकाणी सेनेची कोंडी ; मेगाभरतीच्या सदस्यांची होऊ लागली घुसमट

मिलिंद कुलकर्णीयुती असूनही खान्देशात भाजपने शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक दिल्याची तीव्र भावना शिवसैनिकांमध्ये आहे. महाशिवआघाडीच्या निमित्ताने आता सेना प्रभावशाली भूमिकेत येणार असल्याने पूर्वीच्या या मित्रपक्षांमध्ये तीव्र संघर्ष भविष्यकाळात होऊ शकतो. सेनेच्या मदतीला आता काँग्रेस आणि राष्टÑवादी असल्याने भाजप एकटा पडू शकतो. अर्थात भाजपचे नेते मुरब्बी आणि वाकबगार असल्याने ते ही परिस्थिती कशी हाताळतात, यावर पुढील सत्ताकारण अवलंबून राहणार आहे. अर्थात दोन्ही कॉंग्रेसशी काही मतदारसंघात सेनेचे खटके उडणे स्वाभाविक आहे.राज्याचे सत्तासमीकरण बदलू लागल्याने त्याचा परिणाम प्रादेशिक पातळीवर निश्चित जाणवणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची अनेक वर्षांची युती असली तरी अंतर्विरोध खूप मोठा होता. काँग्रेस-राष्टÑवादीपेक्षा सेनेला शत्रू मानून भाजपने काही वेळा कोंडी केल्याची उदाहरणे आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत हे दोन्ही पक्ष परस्परांविरुध्द लढत असत. मात्र सत्ता स्थापन करताना एकत्र येत असत. पण या निवडणुकीत तसे घडले नाही. काँग्रेसच्या सदस्यांची मदत घेऊन भाजपने सेनेला सत्तेत वाटा देण्यास नकार दिला. जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघात भाजपने सेनेच्या इतर लोकप्रतिनिधींना पॅनलमध्ये घेतले, पण उपनेते गुलाबराव पाटील यांना सोयीस्करपणे वगळले, ही सापत्न वागणूक पाटील विसरले असतील, असे कसे म्हणता येईल. पाचोऱ्यातील शिवसैनिकांना गेल्या दिवाळीत पोलीस कोठडीत पाठविण्याची कार्यवाही भाजपच्या सूचनेवरुन झाल्याची भावना अजूनही सैनिकांच्या मनात घर करुन आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत ऐनवेळी सेनेचे मातब्बर नगरसेवक भाजपने फोडून पालिकेची सत्ता हस्तगत केली, याचा सल सैनिकांना बोचत आहे.आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या सहा उमेदवारांच्या विरोधात भाजपने बंडखोर उभे केले होते. गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधानांच्या सभेपूर्वी व्यक्त केलेली नाराजी चर्चेचा विषय ठरली होती. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गिरीश महाजन यांना लेखी पत्र देऊन बंडखोरांवर कारवाईची मागणी केली होती, पण त्या पत्राची दखल देखील महाजन आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली नव्हती, याचा राग सेनेत आहेच.त्यामुळे भाजपविषयी नरमाईची भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी आता आक्रमक झाल्यास आश्चर्य वाटायला नको.जिल्हा परिषद, जळगाव महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभांमध्ये बदललेल्या सत्तासमीकरणाचे पडसाद उमटले. भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या अडचणीत त्यामुळे वाढ होणार आहे.धुळे आणि नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथे महाशिवआघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र येतात काय हे बघायला हवे. अर्थात धुळ्यात सेनेचे बळ कमी असले तरी नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी यांच्यामुळे सेना मजबूत झाली आहे. आता रघुवंशी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्यांशी कसा समन्वय राखतात, हे पहाणे औत्सुक्याचे राहणार आहे. तिथे राष्टÑवादीचे अस्तित्व नगण्य आहे.मात्र भाजपविरुध्द सगळे असा सामना झाला तर कसोटी भाजपची राहणार आहे, हे मात्र निश्चित आहे.मोदीलाटेच्या प्रभावामुळे २०१४ मध्ये दोन्ही काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये आले. काही लोकप्रतिनिधी बनले. मात्र त्यांना भाजपमध्ये सन्मानाची वागणूक फारशी मिळाली नाही. परकेपण कायम राहिले. असंतोष असला तरी तो जाहीरपणे उघड होत नव्हता. आता दिल्लीत भाजप असला तरी मुंबईत नसला तर या नेत्यांना मोठा फरक पडेल. अशावेळी ‘घरवापसी’चे वेध लागू शकतात. सत्तेसाठीच हे सारे घडले असल्याने पुनरावृत्ती झाली तरी त्याचे ना नेत्यांना ना मतदारांना वेगळे वाटणार नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव