शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कचऱ्याच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:58 IST

जळगाव : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ७५ कोटींचा सफाईचा मक्ता देवूनही स्वच्छतेचा प्रश्न ...

जळगाव : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ७५ कोटींचा सफाईचा मक्ता देवूनही स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला नाही म्हणून बुधवारी शिवसेना महानगरच्यावतीने मनपावर धडक मोर्चा काढत मनपा आयुक्तांना गाजरं भेट दिली. तसेच लवकरात लवकर कचºयाचा प्रश्न मार्गी न लावल्यास शहरातील सर्व कचरा मनपा आवारात फेकण्याचा इशारा दिला आहे.शिवसेनेकडून दुपारी १२ वाजता जयकिसनवाडी भागातून महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेत हा मोर्चा पोहोचल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना गाजरे भेट दिली.मनपा प्रशासनाकडून ७५ कोटी रुपयांचा मक्ता देवून नागरिकांना स्वच्छतेच्या नावावर गाजरंच दिली असल्याने शिवसेनेकडूनही मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना गाजरांची भेट देण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख विलास भदाने, विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शहर संघटक दिनेश जगताप, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, ज्योती तायडे, जितेंद्र मुंदडा, प्रशांत नाईक, शंतनू नारखेडे, चिंतामण जैतकर, अंकुश कोळी, प्रकाश जैन-बेदमुथा यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.१५ नोव्हेंबरनंतर प्रश्न मार्गी लावूआतापर्यंत कचºयाचा समस्यांबाबत गंभीर दखल घेवून मक्तेदाराला वेळोवेळी नोटीस देवून, त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तरी पुन्हा त्यांना सूचना देवून १५ नोव्हेंबरनंतर शहरातील कचºयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.मक्तेदाराकडून या कामात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिले.सतरा मजलीच्या बाहेर येवून जरा शहरात चक्कर माराकचºयाचा समस्येबाबत सत्ताधाºयांपासून विरोधक व नागरिक देखील तक्रारी दाखल करत असताना मनपा प्रशासन झोपेतून उठताना दिसून येत नाही. प्रत्येक गल्ली-चौकात कचºयाचे ढीग जमा झाले असून, जरा सतरा मजलीच्या बाहेर येवून शहरात चक्कर मारा आणि समस्या पहा असा सल्ला मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी उपायुक्त व आरोग्य अधिकाºयांना दिला. स्वच्छतेच्या इतक्या तक्रारी असून देखील मक्तेदाराला १ कोटी ३६ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली. त्याचे इतके लाड कशासाठी असा सवालही पदाधिकाºयांनी केला.शाहू नगरातील रहिवाश्यांचाही मनपावर मोर्चाशाहुनगरात गटारींचे पाणी रस्त्यावर येत आहे. या भागात मनपाकडून साफसफाई केली जात नाही, वारंवार निवेदने देवून तक्रारी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शाहू नगरातील नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. तसेच समस्यांचा नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचला. या नागरिकांना देखील आयुक्तांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हाजी मुन्ना, नजमोद्दीन शेख, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बांगी याकुब, अफरोज बागवान, अंजली चव्हाण, पार्वताबाई देवरे यांच्यासह शाहुनगरच्या नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रत्येक प्रभागात वाईट अवस्था आहे, त्यामुळे डेंग्यू सारख्या आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव