शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:58 IST

जळगाव : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ७५ कोटींचा सफाईचा मक्ता देवूनही स्वच्छतेचा प्रश्न ...

जळगाव : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ७५ कोटींचा सफाईचा मक्ता देवूनही स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला नाही म्हणून बुधवारी शिवसेना महानगरच्यावतीने मनपावर धडक मोर्चा काढत मनपा आयुक्तांना गाजरं भेट दिली. तसेच लवकरात लवकर कचºयाचा प्रश्न मार्गी न लावल्यास शहरातील सर्व कचरा मनपा आवारात फेकण्याचा इशारा दिला आहे.शिवसेनेकडून दुपारी १२ वाजता जयकिसनवाडी भागातून महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेत हा मोर्चा पोहोचल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना गाजरे भेट दिली.मनपा प्रशासनाकडून ७५ कोटी रुपयांचा मक्ता देवून नागरिकांना स्वच्छतेच्या नावावर गाजरंच दिली असल्याने शिवसेनेकडूनही मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना गाजरांची भेट देण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख विलास भदाने, विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शहर संघटक दिनेश जगताप, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, ज्योती तायडे, जितेंद्र मुंदडा, प्रशांत नाईक, शंतनू नारखेडे, चिंतामण जैतकर, अंकुश कोळी, प्रकाश जैन-बेदमुथा यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.१५ नोव्हेंबरनंतर प्रश्न मार्गी लावूआतापर्यंत कचºयाचा समस्यांबाबत गंभीर दखल घेवून मक्तेदाराला वेळोवेळी नोटीस देवून, त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तरी पुन्हा त्यांना सूचना देवून १५ नोव्हेंबरनंतर शहरातील कचºयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.मक्तेदाराकडून या कामात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिले.सतरा मजलीच्या बाहेर येवून जरा शहरात चक्कर माराकचºयाचा समस्येबाबत सत्ताधाºयांपासून विरोधक व नागरिक देखील तक्रारी दाखल करत असताना मनपा प्रशासन झोपेतून उठताना दिसून येत नाही. प्रत्येक गल्ली-चौकात कचºयाचे ढीग जमा झाले असून, जरा सतरा मजलीच्या बाहेर येवून शहरात चक्कर मारा आणि समस्या पहा असा सल्ला मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी उपायुक्त व आरोग्य अधिकाºयांना दिला. स्वच्छतेच्या इतक्या तक्रारी असून देखील मक्तेदाराला १ कोटी ३६ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली. त्याचे इतके लाड कशासाठी असा सवालही पदाधिकाºयांनी केला.शाहू नगरातील रहिवाश्यांचाही मनपावर मोर्चाशाहुनगरात गटारींचे पाणी रस्त्यावर येत आहे. या भागात मनपाकडून साफसफाई केली जात नाही, वारंवार निवेदने देवून तक्रारी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शाहू नगरातील नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. तसेच समस्यांचा नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचला. या नागरिकांना देखील आयुक्तांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हाजी मुन्ना, नजमोद्दीन शेख, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बांगी याकुब, अफरोज बागवान, अंजली चव्हाण, पार्वताबाई देवरे यांच्यासह शाहुनगरच्या नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रत्येक प्रभागात वाईट अवस्था आहे, त्यामुळे डेंग्यू सारख्या आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव