शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

वय होते अवघे साडेनऊ वर्षे, गाठली होती अयोध्या...! सर्वात कमी वयाची कारसेविका म्हणून नोंद

By अमित महाबळ | Updated: January 21, 2024 19:58 IST

६ डिसेंबरच्या कारसेवेनंतर सायंकाळी अयोध्यावासियांनी दीपोत्सव केला.

अमित महाबळ/ जळगाव : ते दिवसच वेगळे होते. ‘रामलल्लांना स्वत:चे स्थान मिळाले पाहिजे’, असे स्वप्न असायचे. त्यासाठी १९९२ च्या डिसेंबरमध्ये झालेल्या कारसेवेसाठी जळगावातून अनेकजण अयोध्येला गेले होते. त्यांच्यात सर्वात कमी वयाची कारसेविका म्हणून गीतांजली ठाकरे यांची नोंद आहे. त्यांचे वय साडेनऊ वर्षे होते.

गीतांजली ठाकरे यांनी सांगितले, की त्यांच्यासोबत वडील प्रल्हाद व आई मीराबाई, दीपक व ज्योती घाणेकर, भाईजी मुंदडा, गोविंद व बसंती सोनी होते. वाराणसीपासून पुढच्या प्रवासासाठी गाड्या बदलल्या. फैजाबादला जाताना आमच्या बसला रस्त्यात आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुसरी बस मिळून फैजाबादला पोहोचायला ५ रोजी, सायंकाळचे ७ वाजले होते. शरयूच्या किनारी मंडप उभारून त्यात कारसेवकांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबरला कारसेवेसाठी जायचे होते.

तो दिवस उजाडला...

तो दिवस उजाडला. लालकृष्ण आडवाणींचे भाषण सुरू होते. मुरली मनोहर जोशी हे शांततेचे आवाहन कारसेवकांना करत होते. अचानक कारसेवकांनी त्या ठिकाणाकडे धाव घेतली आणि काही मिनिटांतच आडवाणींचे शब्द ऐकू आले, ‘आपले काम कारसेवकांनीच केले’. त्यानंतर पळापळ सुरू झाली. आई आणि माझी ताटातूट झाली. वडील एका कारसेवकाला घेऊन तात्पुरत्या उभारलेल्या दवाखान्यात गेले होते. मी भांबावले, आजूबाजूला गर्दीत ओळखीचे कोणीच दिसत नव्हते, २ किमी चालत गेल्यावर जळगावचे मुकुंद मेटकर भेटले. त्यांनी मला खांद्यावर बसवून त्यांचा मंडप गाठला. तेथून आमच्या मंडपात आलो. या ठिकाणी आईची भेट झाली. तोपर्यंत मी हरवले आहे याची माहिती वडिलांनी नव्हती. सुखरूप असल्याचे पाहून आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ती वीट आमच्याकडेही होती...

६ डिसेंबरच्या कारसेवेनंतर सायंकाळी अयोध्यावासियांनी दीपोत्सव केला. कारसेवकांसाठी दुकानांची दारे खुली केली. कारसेवेच्या ठिकाणी प्रभू श्रीराम लिहिलेल्या अनेक विटा आढळून आल्या होत्या. त्यातील एक आम्हीही सोबत घेतली. जळगाव-अयोध्या प्रवासाला दीड दिवस लागला परत येताना वाटेत ठिकठिकाणी थांबावे लागले. गाड्या बदलाव्या लागल्या. पोलिस अटक करण्याची शक्यता असल्याने सोबत घेतलेली वीट रस्त्यातील एका हनुमान मंदिरात ठेवावी लागल्याचे गीतांजली ठाकरे यांनी सांगितले.

घरावर तुळशीपत्र ठेवले...  

रेल्वे प्रवासात ज्योती घाणेकर यांनी तुम्ही संपूर्ण कुटूंब का येत आहात, असे विचारले. त्यावर वडिलांनी घरावर तुळशीपत्र ठेवून चाललो आहोत, असे आईला सांगितले होते. मला त्यावेळी त्याचा अर्थ कळला नव्हता. मी आईला म्हटलं, माफ कर पण बाबा म्हटले तशी तुळशीची पानं तोडून घराच्या छतावर ठेवायला विसरले आहे. माझे हे बोलणे ऐकून त्यावेळी आईने कवेत घेतले होते, असेही गीतांजली ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याJalgaonजळगाव