शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

अठरा महिन्यांपैकी सात महिने उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:03 IST

दुर्लक्ष : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे धिम्या गतीने काम; वेळेत काम पूर्ण होणे अवघड

जळगाव : जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात १८ पैकी सात महिने उलटले आहेत. सद्यस्थितीला पुलाची पाया भरणीदेखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अकरा महिन्यांत हे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न संतप्त जळगावकरांतर्फे उपस्थित केला जात आहे.रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जीर्ण झालेला शिवाजीनगर पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. रेल्वेतर्फे रेल्वेच्या हद्दीतीलच काम करण्यात येणार असून उर्वरित काम बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेऊन २५ फेब्रुवारीला पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेऊन ८ एप्रिलला पुलावरील सर्व गर्डर काढले होते. गर्डर काढल्यानंतर पुढील कामासाठी रेल्वेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुलाचे काम सोपविले आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे.धीम्या गतीच्या कामामुळे नागरिकांचा संतापरेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेतल्यानंतर शिवाजीनगर वासियांनी पर्यायी रस्ता म्हणून तहसिल कार्यालयाजवळ गेट उभारण्याची मागणी केली होती. यासाठी तत्कालीन खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, डीआरएम, जिल्हाधिकारी यासह मनपा आयुक्तांकडे निवेदन दिले होते. तसेच यासाठी शिवाजीनगरवासियांना रेल रोको आंदोलनदेखील करावे लागले होते.महावितरणतर्फे अद्याप निविदाच नाही... शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी येथील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणतर्फे आचार संहितेनंतर निविदा काढण्यात येणार होत्या. मात्र, आचारसंहिता संपून आठवडा उलटल्यानंतरही महावितरणतर्फे अद्याप निविदा काढण्यात आलेली नसल्याने या कामाला पुन्हा विलंब होणार आहे. येत्या दोन दिवसात निविदा निघणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव