शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नोकराने पळविली मालकाची मुलगी, पालकांसोबत जाण्यास मुलीचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 23:15 IST

प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.

जळगाव : प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावातील सधन शेतकºयाकडे त्या गावाच्या शेजारीच असलेल्या गावाचा २८ वर्षाचा तरुण कामाला होता. शेतात केळीचे घड व पाने कापण्याचे तो काम करीत होता. त्यामुळे मालकाच्या घरापर्यंत त्याचे येणे-जाणे होते. त्या ओळखीतून मालकाच्या २० वर्षीय मुलीशीच त्याचे प्रेमप्रकरण निर्माण झाले. या दोघांचे प्रेम इतके बहरले की, त्यांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. ६ मार्च रोजी ते जळगाव बसस्थानकावरून थेट सुरत येथे पळून गेले. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली. मुलीच्या आईला मानसिक धक्कादरम्यान, पळून गेलेले हे प्रेमीयुगुल लग्न करुन गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. हरविल्याची नोंद असल्याने पोलिसांनी पालकाला बोलावून घेतले. इकडे मुलगी पळून गेल्यामुळे आईला मोठा धक्का बसला.तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वडील, भाऊ व अन्य नातेवाईक पोलीस स्टेशनला आले. तिची समजूत घातली, मात्र मुलीने पालकांसोबत येण्यास स्पष्ट शब्दात नकार देत पोलिसांनाही तसे लेखी लिहून दिले. याशिवाय पालकांपासून धोका असल्याचेही तिने लिहून दिले. त्यामुळे पालक अक्षरश: मुलीपुढे हातपाय जोडत होते, मात्र तरीही मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मनपरिवर्तनासाठी लहान भावाची तिची भेट घालून दिली.पण मुलगी आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.तरुणाचे दुसरे लग्नज्या मुलासोबत ही मुलगी पळून गेली, त्या मुलाचे हे दुसरे लग्न आहे. आधीच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. दरम्यान, पळून जाण्याच्या आधी या मुलीचे लग्न निश्चित झाले होते. साखरपुड्याचाही कार्यक्रम झालेला आहे. ११ मार्च रोजी लग्नाची तारीख होती. हा मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत ५५ हजार रुपये महिना पगारावर नोकरीला आहे. तरीही या मुलाला नाकारुन ही मुलगी शेतमजुरासोबत पळून गेली.