शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

जामठीत पाणी टंचाईने घेतले गंभीर स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:48 IST

बोदवड तालुक्यातील जामठी येथे पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक स्त्रोत आणि पाणी योजनांनीही टाकल्या माना.महिन्यातून एक किंवा दोन वेळाच पाणीपुरवठा

जामठी ता.बोदवड : येथे असलेले पाण्याचे स्त्रोत तसेच जेथून पाणी पुरवठा होतो अशा योजनांनीही टाकलेली मान यामुळे भर हिवाळ्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरुप धारण केले असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जामठी हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे असून गावातील तीन प्रभागांना पाण्याच्या वेगवेगळ्या तीन स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. गावातील प्रभाग क्रमांक एक मधील काही गल्ल्यांना पॉवर हाऊसिंग योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक एक हा सरपंचांचा प्रभाग असल्याने या प्रभागास दोन ते तीन दिवसांमधून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येतो म्हणून या प्रभागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत नाही असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्र तीन मधील नागरिकांना बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा कमी अधिक स्वरूपात होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बोअरवेलची मोटार दुरूस्तीअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रभाग क्र एक व तीन मधील काही गल्ल्यांना व संपूर्ण प्रभाग क्र. दोन मधील नागरिकांना ओडिए योजनेद्वारे मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून ओडिएचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यासह जामठी गावास महिना उलटून ही पाणीपुरवठा न झाल्याने गावावर तिव्र पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. प्रत्येक घरात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिक टॅन्करव्दारे पाणी विकत घेतांना दिसत आहे. पाणीटंचाईची तिव्रता कमी व्हावी या करिता ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्यावर्षी तीन व या वर्षी तीन कुपनलिकांची निर्मिती केली. मात्र काही ठिकाणी चुकीचे ठिकाण (स्पॉट ) निवडल्याने या कुपनलिकांना पुरेसे पाणी लागू शकले नाही. त्यामुळे काही कुपनलिका पाण्या अभावी बंद अवस्थेत आहे. परिणामी या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे.विशेषत: (प्लॉट परिसर) दरम्यान पर्यायी व्यवस्था असतांनाही नियोजनाच्या अभावामुळे गावास टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे, असे ग्रा.पं.च्या विरोधी सदस्यांकडून सांगण्यात आले....मग पाणीपट्टी कशी भरणार?जामठी गावास वीस ते पंचवीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच महिन्यातून दोन वेळा व वर्षातून फक्त चोवीस किंवा वीसच वेळा पाणीपुरवठा होतो. महिना - महिना उलटून ही पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी कशी भरावी असा संतप्त सवाल नागरिकाकडून ग्रामपंचायतीच्या वसुली कर्मचाºयांना विचारला जात आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई