शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

जामठीत पाणी टंचाईने घेतले गंभीर स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:48 IST

बोदवड तालुक्यातील जामठी येथे पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक स्त्रोत आणि पाणी योजनांनीही टाकल्या माना.महिन्यातून एक किंवा दोन वेळाच पाणीपुरवठा

जामठी ता.बोदवड : येथे असलेले पाण्याचे स्त्रोत तसेच जेथून पाणी पुरवठा होतो अशा योजनांनीही टाकलेली मान यामुळे भर हिवाळ्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरुप धारण केले असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जामठी हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे असून गावातील तीन प्रभागांना पाण्याच्या वेगवेगळ्या तीन स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. गावातील प्रभाग क्रमांक एक मधील काही गल्ल्यांना पॉवर हाऊसिंग योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक एक हा सरपंचांचा प्रभाग असल्याने या प्रभागास दोन ते तीन दिवसांमधून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येतो म्हणून या प्रभागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत नाही असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्र तीन मधील नागरिकांना बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा कमी अधिक स्वरूपात होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बोअरवेलची मोटार दुरूस्तीअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रभाग क्र एक व तीन मधील काही गल्ल्यांना व संपूर्ण प्रभाग क्र. दोन मधील नागरिकांना ओडिए योजनेद्वारे मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून ओडिएचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यासह जामठी गावास महिना उलटून ही पाणीपुरवठा न झाल्याने गावावर तिव्र पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. प्रत्येक घरात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिक टॅन्करव्दारे पाणी विकत घेतांना दिसत आहे. पाणीटंचाईची तिव्रता कमी व्हावी या करिता ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्यावर्षी तीन व या वर्षी तीन कुपनलिकांची निर्मिती केली. मात्र काही ठिकाणी चुकीचे ठिकाण (स्पॉट ) निवडल्याने या कुपनलिकांना पुरेसे पाणी लागू शकले नाही. त्यामुळे काही कुपनलिका पाण्या अभावी बंद अवस्थेत आहे. परिणामी या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे.विशेषत: (प्लॉट परिसर) दरम्यान पर्यायी व्यवस्था असतांनाही नियोजनाच्या अभावामुळे गावास टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे, असे ग्रा.पं.च्या विरोधी सदस्यांकडून सांगण्यात आले....मग पाणीपट्टी कशी भरणार?जामठी गावास वीस ते पंचवीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच महिन्यातून दोन वेळा व वर्षातून फक्त चोवीस किंवा वीसच वेळा पाणीपुरवठा होतो. महिना - महिना उलटून ही पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी कशी भरावी असा संतप्त सवाल नागरिकाकडून ग्रामपंचायतीच्या वसुली कर्मचाºयांना विचारला जात आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई