शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेंदुर्णी न.प.निवडणूक : निकालानंतर सुरु झाले आरोप प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:57 IST

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीनंतर भाजपाने मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले तर राष्ट्रवादीने ईव्हीएममुळे भाजपाचा विजय झाल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देभाजपा पदाधिकारी म्हणतात विश्वास सार्थ ठरवूराष्ट्रवादीचा ईव्हीएम मशिन घोटाळ्याचा आरोप

जळगाव : शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीनंतर भाजपाने मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले तर राष्ट्रवादीने ईव्हीएममुळे भाजपाचा विजय झाल्याचा आरोप केला आहे.मतदारांचा विश्वास सार्थ ठरवूशेंदुर्णीतील मतदारांनी भाजपावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू असे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले. गतकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकासाची ही पावती आहे. निकाल लागला प्रचंड मतांनी विजयी झाल्याचा आनंद आहे. निकाल लागला राजकारण संपले. आता समाजकारणातून गावाचा विकास करून नगरपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रयत्न राहिल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करून सांस्कृतिक वारसा परंपरा जतन करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारांचा आशिर्वाद मात्र ईव्हीएममुळे पराभवसर्व समाजातील मतदारांनी आम्हाला भरघोस मतदान करीत आशीर्वाद दिला. पराभव हा आमचा व उमेदवारांचा नसून हा ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून तांत्रिक पराभव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांनी सांगितले. आम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून त्याच्या विरोधात होतो. बॅलेट पेपर मतदान व्हावे अशी मागणी महाराष्ट्र दिन १ मे पासून करत होतो. परंतु आमची मागणी शेवटपर्यंत फेटाळण्यात आली. खरी लोकशाही संविधान रूपाने चालवायचे असेल तर बॅलेट पेपर नेच मतदान व्हावे अशी मागणी आजही कायम आहे. एकटी माझी लढाई नसून देशातील भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्षांचे एकत्र लढाई सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणतीही निवडणूक बॅलेट पेपरद्वारे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस