शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

सेना-राष्ट्रवादीची आघाडी होईल न होईल पण स्वबळाची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगामी काळात सेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार किंवा नाही हे भविष्यात समजेल मात्र आपणही स्वबळाची तयारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आगामी काळात सेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार किंवा नाही हे भविष्यात समजेल मात्र आपणही स्वबळाची तयारी ठेवावी असा सुचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यालयातील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील आणि इंदिरा पाटील यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशावेळी दिला. राष्ट्रवादी कार्यालयात स्वबळाचा इशारा देणाऱ्या भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या ओबीसी आरक्षण परिषदेतवेळी मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तोंडभरून स्तुती केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी सकाळी छगन भुजबळ यांनी भेट दिली. त्या सोहळ्यात चोपड्याचे कैलास पाटील आणि इंदिरा पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. कैलास पाटील हे गेल्या काही वर्षांपासून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. मात्र, ही नाराजी काही काळाची नव्हती. गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांचा हा सूर होता. त्यांना सहजतेने राष्ट्रवादीत आणले गेले. हा शिवसेनेला एक धक्का मानला जात आहे. यावेळी भुजबळ यांनी भविष्यात कदाचित स्वबळावर लढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी आतापासूनच तयारी करून ठेवलेली बरी, असा सुचक इशारा यावेळी दिला.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात छगन भुजबळ यांनी आपले कॅबिनेटमधील सहकारी गुलाबराव पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांचा ओबीसींच्या प्रश्नावर कसा पाठिंबा असतो, याचे दाखले देखील दिले. त्याचसोबत भाजपवर टीका केली. जर तुम्ही येथे काम केले तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स विभाग येईल. त्याला जर घाबरत असाल तर थेट भाजपात जा.. तेथे अगदी क्लीन व्हाल, असे वक्तव्यही केले.

सकाळी अजिंठा विश्राम गृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र सदनात काहीही चुकीचे नाही. पण, मी आता त्या निर्मिकावरच सर्व काही सोपवले आहे. नियतीच काय ते बघून घेईल. कुणाच्याबद्दल मनात राग नाही.’

कपिल पाटील यांनी जीव वाचवला

छगन भुजबळ यांनी आमदार कपिल पाटील यांनी जीव वाचवला असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘तुरुंगात असताना तब्येत खालावली होती. त्याची माहिती आमदार कपिल पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच त्यावर विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर शरद पवार यांनीही राज्य सरकारला पत्र लिहिले. मग औषधोपचार वेळेत मिळाले.’