शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पर्वात संयमाची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:35 IST

मास्क न वापरणे, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर शिक्षेचा बडगा, सुरक्षित बाजारासारखे उपक्रम लॉकडाऊनमध्ये दिशादर्शक , शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समन्वय साधण्याची सुवर्णसंधी

मिलिंद कुलकर्णीलॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. ‘जान है, तो जहान है’ असे म्हणणाºया पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या अनुभवानंतर ‘जान भी, जहान भी’ असा संदेश दिला आहे. २० एप्रिलनंतर रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी होऊन काही क्षेत्रातील व्यवहार सुरु करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता पाच दिवसांनी काय होईल, हे बघायला हवे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अनुभव सर्वव्यापी होता.वैयक्तिक पातळीवर लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दोन प्रसंग कायद्याच्या पातळीवर पोहोचले. नवापूरमध्ये एका तरुणाने मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी हटकले. कोरोना हवेतून पसरत नाही, म्हणून मी मास्क लावणार नाही, असे तर्कट त्याने लढवले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने पाच दिवस साधा कारावास आणि हजार रुपये दंड ठोठावला. बेजबाबदार वर्तन करणाºया नागरिकाला शिक्षा ठोठावण्याची राज्यातील ही पहिली कारवाई होती. अशीच शिक्षा नंदुरबारमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी फिरणाºया २० नागरिकांना न्यायालयाने ठोठावली आहे. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला.सार्वजनिक शिस्त, संयम हे गुण समाजातून हरवत चालले आहेत, त्याची ही दोन प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. लॉकडाऊन हा निर्णय आपल्यासारख्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात घेऊन खरे तर वागायला हवे. ‘नागरिक शास्त्र’ हा विषय आम्ही केवळ शाळेच्या अभ्यासक्रमात शिकतो, पण तो आचरणात आणला नसल्याने असे प्रसंग उद्भवत आहेत. भाजीबाजाराचा विषय तसाच आहे. कृषी उत्पादनांना वाहतूक आणि विक्रीसाठी कृषि विभाग परवानगी देतो, परंतु, भाजी आणि फळे घेऊन विक्रेते कोठेही बसून विकतात. सामाजिक अंतराचा प्राथमिक नियम धाब्यावर बसवून नागरिकदेखील तेथे गर्दी करतात. प्रशासनाने कारवाई किती वेळा करायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे रोटरी क्लबसारख्या संस्थांनी पुढाकार घेत जळगावात ‘सुरक्षित बाजारा’सारखे उपक्रम राबविले. एकून तीन ठिकाणी असे बाजार सुरु झाले आहेत. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे.लॉकडाऊन ही संधी मानून काही शेतकºयांनी ग्राहकाच्या दारात भाजी आणि फळे पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाज माध्यमांचा, डिजिटल तंत्रज्ञानाचा समर्थपणे वापर करीत शेतकरी आणि ग्राहक अशी साखळी तयार केली आहे. शेतकºयांची लूट होते, ही सार्वत्रिक तक्रार असताना अशा उपक्रमांमधूनच बाजारपेठा तयार झाल्या, तर दोन्ही घटकांचा लाभ होईल.लॉक डाऊनचे दुसरे पर्व सर्व भारतीयांसाठी संयम आणि स्वयंशिस्तीची कसोटी पाहणारा काळ राहील. आपल्या सुरक्षेसाठी तो पाळूया.२१ दिवसांचे पहिले संपले आणि १९ दिवसांचे लॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. पहिल्या पर्वात काही नागरिकांकडून नियमाची पायमल्ली झाली आणि त्याची शिक्षा यंत्रणेने दिली. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी संयम, स्वयंशिस्त हवी.महसूल, पोलीस, आरोग्य या तिन्हीयंत्रणामध्ये माणसेच आहेत. आपलेच भाऊबंद आहेत. त्यांना सहकार्य केल्यास या यंत्रणेला मूळ कामाकडे अधिक लक्ष केंद्रित करता येईल. अकारण रस्त्यांवर येणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे या गोष्टी टाळणे हे आपल्या हितासाठी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या यंत्रणेतील व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊनही मनोबल कायम आहे, हे अभिमानास्पद आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव