शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

दुसऱ्या पर्वात संयमाची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:35 IST

मास्क न वापरणे, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर शिक्षेचा बडगा, सुरक्षित बाजारासारखे उपक्रम लॉकडाऊनमध्ये दिशादर्शक , शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समन्वय साधण्याची सुवर्णसंधी

मिलिंद कुलकर्णीलॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. ‘जान है, तो जहान है’ असे म्हणणाºया पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या अनुभवानंतर ‘जान भी, जहान भी’ असा संदेश दिला आहे. २० एप्रिलनंतर रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी होऊन काही क्षेत्रातील व्यवहार सुरु करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता पाच दिवसांनी काय होईल, हे बघायला हवे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अनुभव सर्वव्यापी होता.वैयक्तिक पातळीवर लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दोन प्रसंग कायद्याच्या पातळीवर पोहोचले. नवापूरमध्ये एका तरुणाने मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी हटकले. कोरोना हवेतून पसरत नाही, म्हणून मी मास्क लावणार नाही, असे तर्कट त्याने लढवले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने पाच दिवस साधा कारावास आणि हजार रुपये दंड ठोठावला. बेजबाबदार वर्तन करणाºया नागरिकाला शिक्षा ठोठावण्याची राज्यातील ही पहिली कारवाई होती. अशीच शिक्षा नंदुरबारमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी फिरणाºया २० नागरिकांना न्यायालयाने ठोठावली आहे. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला.सार्वजनिक शिस्त, संयम हे गुण समाजातून हरवत चालले आहेत, त्याची ही दोन प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. लॉकडाऊन हा निर्णय आपल्यासारख्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात घेऊन खरे तर वागायला हवे. ‘नागरिक शास्त्र’ हा विषय आम्ही केवळ शाळेच्या अभ्यासक्रमात शिकतो, पण तो आचरणात आणला नसल्याने असे प्रसंग उद्भवत आहेत. भाजीबाजाराचा विषय तसाच आहे. कृषी उत्पादनांना वाहतूक आणि विक्रीसाठी कृषि विभाग परवानगी देतो, परंतु, भाजी आणि फळे घेऊन विक्रेते कोठेही बसून विकतात. सामाजिक अंतराचा प्राथमिक नियम धाब्यावर बसवून नागरिकदेखील तेथे गर्दी करतात. प्रशासनाने कारवाई किती वेळा करायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे रोटरी क्लबसारख्या संस्थांनी पुढाकार घेत जळगावात ‘सुरक्षित बाजारा’सारखे उपक्रम राबविले. एकून तीन ठिकाणी असे बाजार सुरु झाले आहेत. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे.लॉकडाऊन ही संधी मानून काही शेतकºयांनी ग्राहकाच्या दारात भाजी आणि फळे पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाज माध्यमांचा, डिजिटल तंत्रज्ञानाचा समर्थपणे वापर करीत शेतकरी आणि ग्राहक अशी साखळी तयार केली आहे. शेतकºयांची लूट होते, ही सार्वत्रिक तक्रार असताना अशा उपक्रमांमधूनच बाजारपेठा तयार झाल्या, तर दोन्ही घटकांचा लाभ होईल.लॉक डाऊनचे दुसरे पर्व सर्व भारतीयांसाठी संयम आणि स्वयंशिस्तीची कसोटी पाहणारा काळ राहील. आपल्या सुरक्षेसाठी तो पाळूया.२१ दिवसांचे पहिले संपले आणि १९ दिवसांचे लॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. पहिल्या पर्वात काही नागरिकांकडून नियमाची पायमल्ली झाली आणि त्याची शिक्षा यंत्रणेने दिली. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी संयम, स्वयंशिस्त हवी.महसूल, पोलीस, आरोग्य या तिन्हीयंत्रणामध्ये माणसेच आहेत. आपलेच भाऊबंद आहेत. त्यांना सहकार्य केल्यास या यंत्रणेला मूळ कामाकडे अधिक लक्ष केंद्रित करता येईल. अकारण रस्त्यांवर येणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे या गोष्टी टाळणे हे आपल्या हितासाठी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या यंत्रणेतील व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊनही मनोबल कायम आहे, हे अभिमानास्पद आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव