शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुसऱ्या पर्वात संयमाची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:35 IST

मास्क न वापरणे, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर शिक्षेचा बडगा, सुरक्षित बाजारासारखे उपक्रम लॉकडाऊनमध्ये दिशादर्शक , शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समन्वय साधण्याची सुवर्णसंधी

मिलिंद कुलकर्णीलॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. ‘जान है, तो जहान है’ असे म्हणणाºया पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या अनुभवानंतर ‘जान भी, जहान भी’ असा संदेश दिला आहे. २० एप्रिलनंतर रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी होऊन काही क्षेत्रातील व्यवहार सुरु करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता पाच दिवसांनी काय होईल, हे बघायला हवे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अनुभव सर्वव्यापी होता.वैयक्तिक पातळीवर लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दोन प्रसंग कायद्याच्या पातळीवर पोहोचले. नवापूरमध्ये एका तरुणाने मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी हटकले. कोरोना हवेतून पसरत नाही, म्हणून मी मास्क लावणार नाही, असे तर्कट त्याने लढवले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने पाच दिवस साधा कारावास आणि हजार रुपये दंड ठोठावला. बेजबाबदार वर्तन करणाºया नागरिकाला शिक्षा ठोठावण्याची राज्यातील ही पहिली कारवाई होती. अशीच शिक्षा नंदुरबारमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी फिरणाºया २० नागरिकांना न्यायालयाने ठोठावली आहे. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला.सार्वजनिक शिस्त, संयम हे गुण समाजातून हरवत चालले आहेत, त्याची ही दोन प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. लॉकडाऊन हा निर्णय आपल्यासारख्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात घेऊन खरे तर वागायला हवे. ‘नागरिक शास्त्र’ हा विषय आम्ही केवळ शाळेच्या अभ्यासक्रमात शिकतो, पण तो आचरणात आणला नसल्याने असे प्रसंग उद्भवत आहेत. भाजीबाजाराचा विषय तसाच आहे. कृषी उत्पादनांना वाहतूक आणि विक्रीसाठी कृषि विभाग परवानगी देतो, परंतु, भाजी आणि फळे घेऊन विक्रेते कोठेही बसून विकतात. सामाजिक अंतराचा प्राथमिक नियम धाब्यावर बसवून नागरिकदेखील तेथे गर्दी करतात. प्रशासनाने कारवाई किती वेळा करायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे रोटरी क्लबसारख्या संस्थांनी पुढाकार घेत जळगावात ‘सुरक्षित बाजारा’सारखे उपक्रम राबविले. एकून तीन ठिकाणी असे बाजार सुरु झाले आहेत. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे.लॉकडाऊन ही संधी मानून काही शेतकºयांनी ग्राहकाच्या दारात भाजी आणि फळे पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाज माध्यमांचा, डिजिटल तंत्रज्ञानाचा समर्थपणे वापर करीत शेतकरी आणि ग्राहक अशी साखळी तयार केली आहे. शेतकºयांची लूट होते, ही सार्वत्रिक तक्रार असताना अशा उपक्रमांमधूनच बाजारपेठा तयार झाल्या, तर दोन्ही घटकांचा लाभ होईल.लॉक डाऊनचे दुसरे पर्व सर्व भारतीयांसाठी संयम आणि स्वयंशिस्तीची कसोटी पाहणारा काळ राहील. आपल्या सुरक्षेसाठी तो पाळूया.२१ दिवसांचे पहिले संपले आणि १९ दिवसांचे लॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. पहिल्या पर्वात काही नागरिकांकडून नियमाची पायमल्ली झाली आणि त्याची शिक्षा यंत्रणेने दिली. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी संयम, स्वयंशिस्त हवी.महसूल, पोलीस, आरोग्य या तिन्हीयंत्रणामध्ये माणसेच आहेत. आपलेच भाऊबंद आहेत. त्यांना सहकार्य केल्यास या यंत्रणेला मूळ कामाकडे अधिक लक्ष केंद्रित करता येईल. अकारण रस्त्यांवर येणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे या गोष्टी टाळणे हे आपल्या हितासाठी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या यंत्रणेतील व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊनही मनोबल कायम आहे, हे अभिमानास्पद आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव