शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

केळी नुकसानीवर हंगामी तीन पिकांचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:04 IST

पीक पद्धतीत बदल काळाची गरज । खेडगावचे भगवान पाटील यांनी जाणले बदलाचे फायदे

खेडगाव, ता.भडगाव : जिल्हा केळीसाठी प्रसिध्द असला तरी बदलत्या हवामानामुळे (वादळ, गारा, अती तापमान व थंडी) व व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे हे पिक घेणे म्हणजे आर्थिक संकट ओढुन घेण्याइतपत धोकादायक बनले आहे. यामुळेच खेडगाव येथील भगवान हरसिंग हिरे या शेतकऱ्यांने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामापरत्वे घेतलेल्या तीन पिक पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. निदान भुईसपाट होण्याची रिस्क (धोका) निश्चत कमी होते.केळी बागायतीला रामरामभगवान पाटील यांचेकडे दहा बिगे सामायिक शेती आहे. गिरणाकाठावर विहीर व तेथुन पाईपलाईन आणली आहे. काळी कसदार जमीन आहे. पाणी मुबलक असल्याने चार-पाच हजार केळीखोड ते लावत. मात्र केळीवर येणारा करपा, केळी बागेतच पिकणे, दुष्काळात पाणीटंचाई अन् केळीमाल पक्व होऊनही कटाईसाठी व्यापाºयांची मनधरणी, शिवाय बोर्ड भावापेक्षा कमी भाव याला कंटाळुन त्यांनी केळी लावणेच सोडले.नफा-तोटा मेळ बसतो.केळी ऐवजी तीन बिघ्यात घेतलेल्या मुग, मका, बाजरी या तीन पिकात तिनही हंगामात मिळऊन त्यांना तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये उत्पन्न आले तर मशागत, खते, कापणी ,काढणी असा त्यांना त्रेचाळीस हजार दोनशे रुपये खर्च झाला. यानुसार ऐन दुष्काळी सालात त्यांना दोन लाख शहाण्णव हजार दोनशे इतका नफा झाला. शिवाय केळी बागायतदारांप्रमाणे उन्हाळ्यात तापमान वाढले, पाणी कमी पडले ही चिंता न सतावता उशाला हात घालताच शांत झोप लागते. हे मानसिक समाधान पैसा मोजुन मिळणार नाही. तीन हंगामात नैसर्गिक आपत्तीत एखादा वाया गेला तरी दुसºयात भर निघते. जुन २०१८ ते मे २०१९ या कालावधीत तीन पिक घेतल्यानंतर या खरिपात पुन्हा कपाशी लागवड करुन झाली.केळी हीच मानसिकता का ?शेतकरी केळीला का पसंती देतो? यामागे पारंपारिक पीक, एकदा लावले की वर्षभर ठीबकने पाणी सोडा, खते द्या, निंदणी , एखादी किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी याउपर वेगळे काही करायची आवश्यकता नाही. व्यापारी बांधावर येतो. (आता उलट व्यापाºयाची मिन्नतवारी सुरु झाली आहे) माणसे पाठवतो, कटाई करतो. एक ठोक व ऐन पावसाळ्यात पैसा हाती खेळतो. केळीबागायतदार ही प्रतिष्ठा (नव्हे मानसिकता).यामुळे एकदा केळीची चटक लागली की मग नुकसान 'नफा-तोटायाचे गणीत न जुळले तरी मृगजळाप्रमाणे शेतकरी या पिकामागे धावतच राहतो अन्दम तोडतो. याउलट हंगामी पिकात दरवेळेस मशागत, काढणी, कापणी असा मजुराशी संबध येतो व मजुरटंचाई मुळे शेतकरी हतबल होतो. हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास तोटा होतो. हंगाम संपल्यावर टप्प्याटप्याने पैसा येतो त्यामुळे पैसा हाती लागत नाही, ही मानसिकता बनलेली. बाजारसमित्यांमधे जाऊन माल विकावा लागतो.असे हे शेतक-यांचे यामागचे धोरण आहे.