शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

केळी नुकसानीवर हंगामी तीन पिकांचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:04 IST

पीक पद्धतीत बदल काळाची गरज । खेडगावचे भगवान पाटील यांनी जाणले बदलाचे फायदे

खेडगाव, ता.भडगाव : जिल्हा केळीसाठी प्रसिध्द असला तरी बदलत्या हवामानामुळे (वादळ, गारा, अती तापमान व थंडी) व व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे हे पिक घेणे म्हणजे आर्थिक संकट ओढुन घेण्याइतपत धोकादायक बनले आहे. यामुळेच खेडगाव येथील भगवान हरसिंग हिरे या शेतकऱ्यांने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामापरत्वे घेतलेल्या तीन पिक पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. निदान भुईसपाट होण्याची रिस्क (धोका) निश्चत कमी होते.केळी बागायतीला रामरामभगवान पाटील यांचेकडे दहा बिगे सामायिक शेती आहे. गिरणाकाठावर विहीर व तेथुन पाईपलाईन आणली आहे. काळी कसदार जमीन आहे. पाणी मुबलक असल्याने चार-पाच हजार केळीखोड ते लावत. मात्र केळीवर येणारा करपा, केळी बागेतच पिकणे, दुष्काळात पाणीटंचाई अन् केळीमाल पक्व होऊनही कटाईसाठी व्यापाºयांची मनधरणी, शिवाय बोर्ड भावापेक्षा कमी भाव याला कंटाळुन त्यांनी केळी लावणेच सोडले.नफा-तोटा मेळ बसतो.केळी ऐवजी तीन बिघ्यात घेतलेल्या मुग, मका, बाजरी या तीन पिकात तिनही हंगामात मिळऊन त्यांना तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये उत्पन्न आले तर मशागत, खते, कापणी ,काढणी असा त्यांना त्रेचाळीस हजार दोनशे रुपये खर्च झाला. यानुसार ऐन दुष्काळी सालात त्यांना दोन लाख शहाण्णव हजार दोनशे इतका नफा झाला. शिवाय केळी बागायतदारांप्रमाणे उन्हाळ्यात तापमान वाढले, पाणी कमी पडले ही चिंता न सतावता उशाला हात घालताच शांत झोप लागते. हे मानसिक समाधान पैसा मोजुन मिळणार नाही. तीन हंगामात नैसर्गिक आपत्तीत एखादा वाया गेला तरी दुसºयात भर निघते. जुन २०१८ ते मे २०१९ या कालावधीत तीन पिक घेतल्यानंतर या खरिपात पुन्हा कपाशी लागवड करुन झाली.केळी हीच मानसिकता का ?शेतकरी केळीला का पसंती देतो? यामागे पारंपारिक पीक, एकदा लावले की वर्षभर ठीबकने पाणी सोडा, खते द्या, निंदणी , एखादी किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी याउपर वेगळे काही करायची आवश्यकता नाही. व्यापारी बांधावर येतो. (आता उलट व्यापाºयाची मिन्नतवारी सुरु झाली आहे) माणसे पाठवतो, कटाई करतो. एक ठोक व ऐन पावसाळ्यात पैसा हाती खेळतो. केळीबागायतदार ही प्रतिष्ठा (नव्हे मानसिकता).यामुळे एकदा केळीची चटक लागली की मग नुकसान 'नफा-तोटायाचे गणीत न जुळले तरी मृगजळाप्रमाणे शेतकरी या पिकामागे धावतच राहतो अन्दम तोडतो. याउलट हंगामी पिकात दरवेळेस मशागत, काढणी, कापणी असा मजुराशी संबध येतो व मजुरटंचाई मुळे शेतकरी हतबल होतो. हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास तोटा होतो. हंगाम संपल्यावर टप्प्याटप्याने पैसा येतो त्यामुळे पैसा हाती लागत नाही, ही मानसिकता बनलेली. बाजारसमित्यांमधे जाऊन माल विकावा लागतो.असे हे शेतक-यांचे यामागचे धोरण आहे.