शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

केळी नुकसानीवर हंगामी तीन पिकांचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:04 IST

पीक पद्धतीत बदल काळाची गरज । खेडगावचे भगवान पाटील यांनी जाणले बदलाचे फायदे

खेडगाव, ता.भडगाव : जिल्हा केळीसाठी प्रसिध्द असला तरी बदलत्या हवामानामुळे (वादळ, गारा, अती तापमान व थंडी) व व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे हे पिक घेणे म्हणजे आर्थिक संकट ओढुन घेण्याइतपत धोकादायक बनले आहे. यामुळेच खेडगाव येथील भगवान हरसिंग हिरे या शेतकऱ्यांने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामापरत्वे घेतलेल्या तीन पिक पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. निदान भुईसपाट होण्याची रिस्क (धोका) निश्चत कमी होते.केळी बागायतीला रामरामभगवान पाटील यांचेकडे दहा बिगे सामायिक शेती आहे. गिरणाकाठावर विहीर व तेथुन पाईपलाईन आणली आहे. काळी कसदार जमीन आहे. पाणी मुबलक असल्याने चार-पाच हजार केळीखोड ते लावत. मात्र केळीवर येणारा करपा, केळी बागेतच पिकणे, दुष्काळात पाणीटंचाई अन् केळीमाल पक्व होऊनही कटाईसाठी व्यापाºयांची मनधरणी, शिवाय बोर्ड भावापेक्षा कमी भाव याला कंटाळुन त्यांनी केळी लावणेच सोडले.नफा-तोटा मेळ बसतो.केळी ऐवजी तीन बिघ्यात घेतलेल्या मुग, मका, बाजरी या तीन पिकात तिनही हंगामात मिळऊन त्यांना तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये उत्पन्न आले तर मशागत, खते, कापणी ,काढणी असा त्यांना त्रेचाळीस हजार दोनशे रुपये खर्च झाला. यानुसार ऐन दुष्काळी सालात त्यांना दोन लाख शहाण्णव हजार दोनशे इतका नफा झाला. शिवाय केळी बागायतदारांप्रमाणे उन्हाळ्यात तापमान वाढले, पाणी कमी पडले ही चिंता न सतावता उशाला हात घालताच शांत झोप लागते. हे मानसिक समाधान पैसा मोजुन मिळणार नाही. तीन हंगामात नैसर्गिक आपत्तीत एखादा वाया गेला तरी दुसºयात भर निघते. जुन २०१८ ते मे २०१९ या कालावधीत तीन पिक घेतल्यानंतर या खरिपात पुन्हा कपाशी लागवड करुन झाली.केळी हीच मानसिकता का ?शेतकरी केळीला का पसंती देतो? यामागे पारंपारिक पीक, एकदा लावले की वर्षभर ठीबकने पाणी सोडा, खते द्या, निंदणी , एखादी किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी याउपर वेगळे काही करायची आवश्यकता नाही. व्यापारी बांधावर येतो. (आता उलट व्यापाºयाची मिन्नतवारी सुरु झाली आहे) माणसे पाठवतो, कटाई करतो. एक ठोक व ऐन पावसाळ्यात पैसा हाती खेळतो. केळीबागायतदार ही प्रतिष्ठा (नव्हे मानसिकता).यामुळे एकदा केळीची चटक लागली की मग नुकसान 'नफा-तोटायाचे गणीत न जुळले तरी मृगजळाप्रमाणे शेतकरी या पिकामागे धावतच राहतो अन्दम तोडतो. याउलट हंगामी पिकात दरवेळेस मशागत, काढणी, कापणी असा मजुराशी संबध येतो व मजुरटंचाई मुळे शेतकरी हतबल होतो. हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास तोटा होतो. हंगाम संपल्यावर टप्प्याटप्याने पैसा येतो त्यामुळे पैसा हाती लागत नाही, ही मानसिकता बनलेली. बाजारसमित्यांमधे जाऊन माल विकावा लागतो.असे हे शेतक-यांचे यामागचे धोरण आहे.