शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

केळी नुकसानीवर हंगामी तीन पिकांचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:04 IST

पीक पद्धतीत बदल काळाची गरज । खेडगावचे भगवान पाटील यांनी जाणले बदलाचे फायदे

खेडगाव, ता.भडगाव : जिल्हा केळीसाठी प्रसिध्द असला तरी बदलत्या हवामानामुळे (वादळ, गारा, अती तापमान व थंडी) व व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे हे पिक घेणे म्हणजे आर्थिक संकट ओढुन घेण्याइतपत धोकादायक बनले आहे. यामुळेच खेडगाव येथील भगवान हरसिंग हिरे या शेतकऱ्यांने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामापरत्वे घेतलेल्या तीन पिक पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. निदान भुईसपाट होण्याची रिस्क (धोका) निश्चत कमी होते.केळी बागायतीला रामरामभगवान पाटील यांचेकडे दहा बिगे सामायिक शेती आहे. गिरणाकाठावर विहीर व तेथुन पाईपलाईन आणली आहे. काळी कसदार जमीन आहे. पाणी मुबलक असल्याने चार-पाच हजार केळीखोड ते लावत. मात्र केळीवर येणारा करपा, केळी बागेतच पिकणे, दुष्काळात पाणीटंचाई अन् केळीमाल पक्व होऊनही कटाईसाठी व्यापाºयांची मनधरणी, शिवाय बोर्ड भावापेक्षा कमी भाव याला कंटाळुन त्यांनी केळी लावणेच सोडले.नफा-तोटा मेळ बसतो.केळी ऐवजी तीन बिघ्यात घेतलेल्या मुग, मका, बाजरी या तीन पिकात तिनही हंगामात मिळऊन त्यांना तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये उत्पन्न आले तर मशागत, खते, कापणी ,काढणी असा त्यांना त्रेचाळीस हजार दोनशे रुपये खर्च झाला. यानुसार ऐन दुष्काळी सालात त्यांना दोन लाख शहाण्णव हजार दोनशे इतका नफा झाला. शिवाय केळी बागायतदारांप्रमाणे उन्हाळ्यात तापमान वाढले, पाणी कमी पडले ही चिंता न सतावता उशाला हात घालताच शांत झोप लागते. हे मानसिक समाधान पैसा मोजुन मिळणार नाही. तीन हंगामात नैसर्गिक आपत्तीत एखादा वाया गेला तरी दुसºयात भर निघते. जुन २०१८ ते मे २०१९ या कालावधीत तीन पिक घेतल्यानंतर या खरिपात पुन्हा कपाशी लागवड करुन झाली.केळी हीच मानसिकता का ?शेतकरी केळीला का पसंती देतो? यामागे पारंपारिक पीक, एकदा लावले की वर्षभर ठीबकने पाणी सोडा, खते द्या, निंदणी , एखादी किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी याउपर वेगळे काही करायची आवश्यकता नाही. व्यापारी बांधावर येतो. (आता उलट व्यापाºयाची मिन्नतवारी सुरु झाली आहे) माणसे पाठवतो, कटाई करतो. एक ठोक व ऐन पावसाळ्यात पैसा हाती खेळतो. केळीबागायतदार ही प्रतिष्ठा (नव्हे मानसिकता).यामुळे एकदा केळीची चटक लागली की मग नुकसान 'नफा-तोटायाचे गणीत न जुळले तरी मृगजळाप्रमाणे शेतकरी या पिकामागे धावतच राहतो अन्दम तोडतो. याउलट हंगामी पिकात दरवेळेस मशागत, काढणी, कापणी असा मजुराशी संबध येतो व मजुरटंचाई मुळे शेतकरी हतबल होतो. हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास तोटा होतो. हंगाम संपल्यावर टप्प्याटप्याने पैसा येतो त्यामुळे पैसा हाती लागत नाही, ही मानसिकता बनलेली. बाजारसमित्यांमधे जाऊन माल विकावा लागतो.असे हे शेतक-यांचे यामागचे धोरण आहे.