शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

त्या १८ हजार शेतकऱ्यांचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण ५ लाख १४ हजार ९४४ लाभार्थी आहेत. त्यातील २६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण ५ लाख १४ हजार ९४४ लाभार्थी आहेत. त्यातील २६ हजार ५११ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. तर १८ हजार शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन अजूनही शोधत आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये देण्याची पंतप्रधान किसान योजना लागू केली. त्यात आठ अ च्या दाखल्यांवरून जिल्ह्यातील ५ लाख १४ हजार ९४४ शेतकरी पात्र ठरले. त्यातील १८ हजार शेतकरी असे आहेत. त्यांचा ठावठिकाणा जिल्हा प्रशासनाला देखील लागलेला नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचे अनुदान मिळू शकलेले नाही. गावात जमीन असली तरी गावातील लोकांनी त्या शेतकऱ्यांची माहिती न देणे, तसेच बहुतेकजण अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झालेले आहेत. त्यांची कागदपत्रे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत.तोपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच काही ठिकाणी ग्रामस्थ या स्थलांतरितांची माहिती देण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे या १८ हजार जणांची माहिती प्रशासनाला मिळू शकलेली नाही. ही माहिती प्रशासनालाच अपडेट करावी लागणार आहे. या योजनेचा आता नववा हप्ता देण्यात आला आहे.

लाभ न मिळण्याची कारणे काय ?

- आधार क्रमांक चुकीचा कळवणे

- आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणे बँक खात्यात नाव नसणे

- बँक खाते निष्क्रिय असणे

- शेतकऱ्यांचे स्वत:चे बँक खाते नसणे

अपात्र लाभार्थ्यांकडून झाली पाच कोटींची वसुली

या योजनेत जिल्हाभरातील २० हजार ७६८ शेतकरी अपात्र ठरले होते. त्यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला १६ कोटी ७२ लाख रुपये वसूल करायचे होते; मात्र आतापर्यंत त्या अपात्र लाभार्थ्यांकडून ५ कोटी ४७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी पाच कोटी ३० लाख रुपये शासनाला वर्ग देखील करण्यात आले आहेत.

दहा टक्के तपासणी सक्तीची

जिल्ह्यात या योजनेचा सध्या नववा हप्ता देण्यात आला आहे. त्यात आठव्या हप्ता दिला गेल्यानंतर दहा टक्के पात्र लाभार्थ्यांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली. या योजनेचे बहुतांश काम सध्या कृषी विभागाकडूनच सुरू आहे. त्यात ज्यांना रक्कम दिली गेली आहे ते लाभार्थी या योजनेच्या निकषात बसतात का, याची तपासणी केली जात आहे. आठवा हप्ता दिला गेल्यानंतर ४४ हजार ५६० शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली.