शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

त्या १८ हजार शेतकऱ्यांचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण ५ लाख १४ हजार ९४४ लाभार्थी आहेत. त्यातील २६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण ५ लाख १४ हजार ९४४ लाभार्थी आहेत. त्यातील २६ हजार ५११ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. तर १८ हजार शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन अजूनही शोधत आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये देण्याची पंतप्रधान किसान योजना लागू केली. त्यात आठ अ च्या दाखल्यांवरून जिल्ह्यातील ५ लाख १४ हजार ९४४ शेतकरी पात्र ठरले. त्यातील १८ हजार शेतकरी असे आहेत. त्यांचा ठावठिकाणा जिल्हा प्रशासनाला देखील लागलेला नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचे अनुदान मिळू शकलेले नाही. गावात जमीन असली तरी गावातील लोकांनी त्या शेतकऱ्यांची माहिती न देणे, तसेच बहुतेकजण अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झालेले आहेत. त्यांची कागदपत्रे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत.तोपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच काही ठिकाणी ग्रामस्थ या स्थलांतरितांची माहिती देण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे या १८ हजार जणांची माहिती प्रशासनाला मिळू शकलेली नाही. ही माहिती प्रशासनालाच अपडेट करावी लागणार आहे. या योजनेचा आता नववा हप्ता देण्यात आला आहे.

लाभ न मिळण्याची कारणे काय ?

- आधार क्रमांक चुकीचा कळवणे

- आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणे बँक खात्यात नाव नसणे

- बँक खाते निष्क्रिय असणे

- शेतकऱ्यांचे स्वत:चे बँक खाते नसणे

अपात्र लाभार्थ्यांकडून झाली पाच कोटींची वसुली

या योजनेत जिल्हाभरातील २० हजार ७६८ शेतकरी अपात्र ठरले होते. त्यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला १६ कोटी ७२ लाख रुपये वसूल करायचे होते; मात्र आतापर्यंत त्या अपात्र लाभार्थ्यांकडून ५ कोटी ४७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी पाच कोटी ३० लाख रुपये शासनाला वर्ग देखील करण्यात आले आहेत.

दहा टक्के तपासणी सक्तीची

जिल्ह्यात या योजनेचा सध्या नववा हप्ता देण्यात आला आहे. त्यात आठव्या हप्ता दिला गेल्यानंतर दहा टक्के पात्र लाभार्थ्यांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली. या योजनेचे बहुतांश काम सध्या कृषी विभागाकडूनच सुरू आहे. त्यात ज्यांना रक्कम दिली गेली आहे ते लाभार्थी या योजनेच्या निकषात बसतात का, याची तपासणी केली जात आहे. आठवा हप्ता दिला गेल्यानंतर ४४ हजार ५६० शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली.