शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

१६५ कॉलनीमधील अमृत योजनेच्या कामांचे स्क्रुटीनीचे काम झाले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील वाढीव भागातील राहून गेलेल्या १६५ कॉलन्यांमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील वाढीव भागातील राहून गेलेल्या १६५ कॉलन्यांमधील कामाच्या प्रस्तावावरील स्क्रुटीनीचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात केला नव्हता या भागांचाही समावेश करण्याचा सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या कॉलन्यांच्या कामासाठी ४२ कोटींचा डीपीआर तयार करून फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत या कामाच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती.

शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, या योजनेचे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. ही मुदत आता संपल्याने पुन्हा वाढीव भागासाठी महापालिकेकडे मक्तेदाराकडून मुदतवाढीसाठी प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढीव कामाची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी राहणार असून, यासाठी शासनाकडून पूर्ण योजनेला अजून मुदतवाढ मिळू शकते अशी माहिती मनपा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा

महापालिकेने अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी १६५ कॉलन्यांचा नव्याने डीपीआर तयार केला असला तरी अंतिम मंजुरीसाठी या प्रस्तावाला मोठी प्रदक्षिणा घालावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात डीपीआरला महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मजिप्राकडून स्क्रुटीनीचे सर्व काम पूर्ण झाले असून, आता तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतरही निविदा प्रक्रिया राबवायची की सध्या सुरू असलेल्या मक्तेदाराकडून हे काम करवून घ्यायचे याबाबतीत देखील निर्णय मनपा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

या भागांचा समावेश

शहरातील अनेक वाढीव भागातील कॉलन्यांचा समावेश अमृत योजनेच्या डीपीआरमध्ये करण्यात आला नव्हता. यामध्ये वाघनगर परिसर, रामानंद नगरातील वाढीव भाग, खोटे नगर परिसरातील विस्तारित भाग, चंदू अण्णा नगरातील विस्तारित भाग, पवार पार्क, निमखेडी शिवारातील विस्तारित भाग, अयोध्या नगर विस्तारित भाग, केसी पार्कच्या पुढील महादेव नगर, खेडी परिसर, राजाराम नगर, सत्यम पार्क परिसरातील वाढीव भाग, ममुराबादकडील वाढीव भागाचा समावेश आहे. दरम्यान, या भागातील कामांना एप्रिल-मे महिन्यांत सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे ‘अमृत’च्या कामावर झाला परिणाम

अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामावर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी मार्च ते जून २०२० दरम्यान या दोन्ही योजनांचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. तसेच लॉकडाऊन उघडल्यानंतरदेखील कामाची गती मंदावली होती. नोव्हेंबर महिन्यानंतर कामांना वेग आला होता; मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम झालेला दिसून येत असून, अनेक ठिकाणी काम सध्या बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. भुयारी गटार योजनेच्या कामाची मुदत सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे.