शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नापिकीकरण थांबवण्यासाठी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:12 AM

जळगाव : खान्देशातील शेतजमीन नापिकीकरण थांबवण्यात आणि ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणसंबंधी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज असल्याचे ...

जळगाव : खान्देशातील शेतजमीन नापिकीकरण थांबवण्यात आणि ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणसंबंधी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र प्रशाळेतील समन्वयक डॉ.एस.एन.पाटील यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ जिऑलॉजीस्ट ॲण्ड हैड्रोजिओलॉजीस्ट(जियो-फोरम) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळातून मुक्ततेसाठी भूविज्ञानाचे महत्त्व, या विषयावर राष्ट्रीयस्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय वाळवंट आणि दुष्काळ जागरुकता दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या वेबिनारचे उद्‌घाटन विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे निदेशक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, हवामान शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद मुजुमदार आणि जियो फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रा.बी.व्ही.पवार यांनी उद्‌घाटन करताना भूजल संवर्धन ही जनचळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले.

भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे

गुजरात येथील भूजल विद्यापीठातील भूशास्त्रज्ञ प्रा.महेश ठक्कर यांनी कच्छ वाळवंटात पाणी टंचाई कमी करण्यात भूशास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांनी मोलाची भूमिका बजावली, असे सांगितले. जियो-फोरमचे उपाध्यक्ष प्रा.अशोक तेजनकर यांनी राष्ट्रीय स्तरावरील वाळवंटीकरण रोखण्यासाठी व दुष्काळातून मुक्त होण्यासाठी भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. जियो-फोरमेच संस्थापक सचिव डॉ.पी.एस.कुलकर्णी आणि बेविनारचे उपसमन्वयक प्रा.एस.टी.इंगळे यांनी पर्यावरण संशोधनाबाबत विचार मांडले. डॉ.वि.मा.रोकडे यांनी आभार तर डॉ.एस.बी.अत्तरदे यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारमध्ये १०७ जणांनी सहभाग घेतला.