शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

By अमित महाबळ | Updated: June 18, 2023 12:52 IST

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही.

अमित महाबळ, जळगाव : जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनची चिन्हे नाहीत. ऊन तर अक्षरश: आग ओकत आहे. एकूण परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळ सत्रात भरविण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या सोमवारपासून यावर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही. तीव्र ऊन आणि घामामुळे सगळेच हैराण झाले आहेत. प्रतिकूल वातावरण लक्षात घेता शाळांचा वेळ बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात अडीच हजारपेक्षा अधिक शाळा आहेत. वेध शाळेच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे उन्हाचा त्रास अधिकच वाढत जाणार आहे.

आदेशात म्हटले आहे...

उन्हामुळे सोमवार (दि.१९) पासून शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जि. प. आणि खासगी प्राथमिक प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत तर ज्या माध्यमिक शाळा एक सत्रात भरतात त्यांची वेळ सकाळ सत्रात करण्यास माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित माध्यमिक शाळांना हा आदेश बंधनकारक आहे.

दोनच दिवसांत अनुभव, वर्गात बसणे असह्य

जि.प.च्या प्राथमिक शाळा सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५ या वेळेत भरतात. आताच्या आदेशामुळे त्यांना वेळ बदलावी लागणार आहे. गुरुवारी, दि.१५ जूनला शाळेत प्रवेशोत्सव होता. शुक्रवारी, शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शाळेत थांबावे लागले. परंतु, उन्हामुळे वर्गात थांबणे असह्य होत असल्याचा अनुभव सर्वांनाच आला. यानंतर शिक्षण विभागाचे शाळांची वेळ बदलण्याचे आदेश निघाले आहेत.

‘त्या’ शाळांनाही परवानगी द्या..

जिल्ह्यातील अनेक शाळा दोन सत्रात भरतात. त्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल, तर त्यांना देखील सकाळच्या सत्रातच शाळा भरविण्याची परवानगी शिक्षण विभागाने द्यावी. दुपारी १२ वाजेनंतर उष्णता आणि घाम यांचा अधिक त्रास होतो. विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण होत आहे. शाळा संपेपर्यंत ती घामेघूम झालेली असतात. सर्वच शाळांमध्ये पुरेसे पंखे नाहीत. याचा विचार शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातJalgaonजळगाव