शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

By अमित महाबळ | Updated: June 18, 2023 12:52 IST

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही.

अमित महाबळ, जळगाव : जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनची चिन्हे नाहीत. ऊन तर अक्षरश: आग ओकत आहे. एकूण परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळ सत्रात भरविण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या सोमवारपासून यावर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही. तीव्र ऊन आणि घामामुळे सगळेच हैराण झाले आहेत. प्रतिकूल वातावरण लक्षात घेता शाळांचा वेळ बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात अडीच हजारपेक्षा अधिक शाळा आहेत. वेध शाळेच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे उन्हाचा त्रास अधिकच वाढत जाणार आहे.

आदेशात म्हटले आहे...

उन्हामुळे सोमवार (दि.१९) पासून शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जि. प. आणि खासगी प्राथमिक प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत तर ज्या माध्यमिक शाळा एक सत्रात भरतात त्यांची वेळ सकाळ सत्रात करण्यास माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित माध्यमिक शाळांना हा आदेश बंधनकारक आहे.

दोनच दिवसांत अनुभव, वर्गात बसणे असह्य

जि.प.च्या प्राथमिक शाळा सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५ या वेळेत भरतात. आताच्या आदेशामुळे त्यांना वेळ बदलावी लागणार आहे. गुरुवारी, दि.१५ जूनला शाळेत प्रवेशोत्सव होता. शुक्रवारी, शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शाळेत थांबावे लागले. परंतु, उन्हामुळे वर्गात थांबणे असह्य होत असल्याचा अनुभव सर्वांनाच आला. यानंतर शिक्षण विभागाचे शाळांची वेळ बदलण्याचे आदेश निघाले आहेत.

‘त्या’ शाळांनाही परवानगी द्या..

जिल्ह्यातील अनेक शाळा दोन सत्रात भरतात. त्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल, तर त्यांना देखील सकाळच्या सत्रातच शाळा भरविण्याची परवानगी शिक्षण विभागाने द्यावी. दुपारी १२ वाजेनंतर उष्णता आणि घाम यांचा अधिक त्रास होतो. विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण होत आहे. शाळा संपेपर्यंत ती घामेघूम झालेली असतात. सर्वच शाळांमध्ये पुरेसे पंखे नाहीत. याचा विचार शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातJalgaonजळगाव