शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

By अमित महाबळ | Updated: June 18, 2023 12:52 IST

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही.

अमित महाबळ, जळगाव : जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनची चिन्हे नाहीत. ऊन तर अक्षरश: आग ओकत आहे. एकूण परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळ सत्रात भरविण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या सोमवारपासून यावर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही. तीव्र ऊन आणि घामामुळे सगळेच हैराण झाले आहेत. प्रतिकूल वातावरण लक्षात घेता शाळांचा वेळ बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात अडीच हजारपेक्षा अधिक शाळा आहेत. वेध शाळेच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे उन्हाचा त्रास अधिकच वाढत जाणार आहे.

आदेशात म्हटले आहे...

उन्हामुळे सोमवार (दि.१९) पासून शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जि. प. आणि खासगी प्राथमिक प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत तर ज्या माध्यमिक शाळा एक सत्रात भरतात त्यांची वेळ सकाळ सत्रात करण्यास माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित माध्यमिक शाळांना हा आदेश बंधनकारक आहे.

दोनच दिवसांत अनुभव, वर्गात बसणे असह्य

जि.प.च्या प्राथमिक शाळा सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५ या वेळेत भरतात. आताच्या आदेशामुळे त्यांना वेळ बदलावी लागणार आहे. गुरुवारी, दि.१५ जूनला शाळेत प्रवेशोत्सव होता. शुक्रवारी, शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शाळेत थांबावे लागले. परंतु, उन्हामुळे वर्गात थांबणे असह्य होत असल्याचा अनुभव सर्वांनाच आला. यानंतर शिक्षण विभागाचे शाळांची वेळ बदलण्याचे आदेश निघाले आहेत.

‘त्या’ शाळांनाही परवानगी द्या..

जिल्ह्यातील अनेक शाळा दोन सत्रात भरतात. त्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल, तर त्यांना देखील सकाळच्या सत्रातच शाळा भरविण्याची परवानगी शिक्षण विभागाने द्यावी. दुपारी १२ वाजेनंतर उष्णता आणि घाम यांचा अधिक त्रास होतो. विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण होत आहे. शाळा संपेपर्यंत ती घामेघूम झालेली असतात. सर्वच शाळांमध्ये पुरेसे पंखे नाहीत. याचा विचार शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातJalgaonजळगाव