शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

शिक्षणाचा बट्टयाबोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:50 IST

विद्यार्थीच गुरूजींची वाट बघत शाळाबाहेर उभे असल्याचा प्रकार समोर आला

सागर दुबेजळगाव - शिक्षणाच्या माध्यमातून चांगले समाज घडविण्याचे कार्य शिक्षणाचे असते़ त्यामध्ये मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी गुरूजींची महत्वाची भुमिका असते़ अलीकडे मात्र जिल्हा परिषद शिक्षण शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे़ गुरूजी शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांची वाट बघत असता हे ऐकले होते मात्र, काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीनंतर विद्यार्थीच गुरूजींची वाट बघत शाळाबाहेर उभे असल्याचा प्रकार समोर आला होता़ त्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे़ग्रामीण भागातील सर्वाधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत़ मात्र, गेल्या काही काळापासून जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्यामध्ये घट होत आहे़ दुसरीकडे इंग्रजी शाळांची वाढत्या संख्यांमुळे जि़प़शाळांमधील विद्यार्थी त्या शाळांकडे वळू लागली आहे़ यातच जर शिक्षक शाळांमध्ये उशिरा येत असतील तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो़ काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्यानंतर शिक्षकच शाळेत येत नसल्याचा प्रकार समोर आणला होता़ हा प्रकार समोर येताच शिक्षण विभागाचे बिंग फुटले होते़ शिक्षण विभागाला खाडकण जाग येऊन लागलीच झोपलेल्या विस्तार अधिकाºयांना तसेच केंद्र प्रमुखांना कामाला लावले़ विस्तार अधिकाºयांनी पंधरा दिवसातून शाळांना एकदा तरी भेट देणे महत्वाचे आहे़ तर केंद्र प्रमुखांनी सुध्दा आठवड्यातून एकदा शाळांना भेटी देणे बंधनकारक आहे़ पण़़ जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना अचानक भेट दिल्यानंतर सर्वत्र अनागोंदी कारभार आढळून आला़ एका शाळेत तर सातवीच्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकावर लिहिलेले उत्तर सुध्दा वाचता येत नव्हते़ हा तर गंभीरच प्रकार समोर आला़ यावरून विद्यार्थ्यांना चांगले शिक्ष ण मिळते आहे की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ विशेष म्हणजे ़़़ शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्याचे काम सुरू आहे़ १८०० च्यावर प्राथमिक जि़प़शाळा आहेत़ त्यापैकी पंधराशेच्यावर शाळा डिजीटल आहेत़ परंतू, हजाराच्यावर शाळांमध्ये वीजच नसल्यामुळे शाळा फक्त नावालाच डिजीटल असल्याचा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे़ विस्तार अधिकाºयांन दिवसाला तीन शाळांना भेटी देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहे़ मात्र, या आदेशाचे कितपत पालन होते याच्यावर सर्वांचे लक्ष लागून असून जिल्हा परिषद शिक्षणात सुधारणा होईल का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे़

 

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव