शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

शिक्षणाचा बट्टयाबोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:50 IST

विद्यार्थीच गुरूजींची वाट बघत शाळाबाहेर उभे असल्याचा प्रकार समोर आला

सागर दुबेजळगाव - शिक्षणाच्या माध्यमातून चांगले समाज घडविण्याचे कार्य शिक्षणाचे असते़ त्यामध्ये मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी गुरूजींची महत्वाची भुमिका असते़ अलीकडे मात्र जिल्हा परिषद शिक्षण शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे़ गुरूजी शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांची वाट बघत असता हे ऐकले होते मात्र, काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीनंतर विद्यार्थीच गुरूजींची वाट बघत शाळाबाहेर उभे असल्याचा प्रकार समोर आला होता़ त्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे़ग्रामीण भागातील सर्वाधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत़ मात्र, गेल्या काही काळापासून जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्यामध्ये घट होत आहे़ दुसरीकडे इंग्रजी शाळांची वाढत्या संख्यांमुळे जि़प़शाळांमधील विद्यार्थी त्या शाळांकडे वळू लागली आहे़ यातच जर शिक्षक शाळांमध्ये उशिरा येत असतील तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो़ काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्यानंतर शिक्षकच शाळेत येत नसल्याचा प्रकार समोर आणला होता़ हा प्रकार समोर येताच शिक्षण विभागाचे बिंग फुटले होते़ शिक्षण विभागाला खाडकण जाग येऊन लागलीच झोपलेल्या विस्तार अधिकाºयांना तसेच केंद्र प्रमुखांना कामाला लावले़ विस्तार अधिकाºयांनी पंधरा दिवसातून शाळांना एकदा तरी भेट देणे महत्वाचे आहे़ तर केंद्र प्रमुखांनी सुध्दा आठवड्यातून एकदा शाळांना भेटी देणे बंधनकारक आहे़ पण़़ जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना अचानक भेट दिल्यानंतर सर्वत्र अनागोंदी कारभार आढळून आला़ एका शाळेत तर सातवीच्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकावर लिहिलेले उत्तर सुध्दा वाचता येत नव्हते़ हा तर गंभीरच प्रकार समोर आला़ यावरून विद्यार्थ्यांना चांगले शिक्ष ण मिळते आहे की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ विशेष म्हणजे ़़़ शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्याचे काम सुरू आहे़ १८०० च्यावर प्राथमिक जि़प़शाळा आहेत़ त्यापैकी पंधराशेच्यावर शाळा डिजीटल आहेत़ परंतू, हजाराच्यावर शाळांमध्ये वीजच नसल्यामुळे शाळा फक्त नावालाच डिजीटल असल्याचा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे़ विस्तार अधिकाºयांन दिवसाला तीन शाळांना भेटी देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहे़ मात्र, या आदेशाचे कितपत पालन होते याच्यावर सर्वांचे लक्ष लागून असून जिल्हा परिषद शिक्षणात सुधारणा होईल का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे़

 

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव