शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:27 IST

२० हजारापैकी १८ हजार ४३६ मुली उत्तीर्ण : विज्ञान ९६, वाणिज्य ९३ तर कला शाखेचा निकाल ८१ टक्के

जळगाव : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावी परीेक्षेत मुलांपेक्षा सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील मुलीच हुशार ठरल्या आहे. जळगाव जिल्ह्यातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९१ व मुलांचे प्रमाण ८७.४५ टक्के आहे. जिल्ह्यात २० हजार ११३ पैकी १८ हजार ४३६ मुली उत्तीर्ण झाल्या तर २९ हजार ४४३ पैकी २४ हजार ६५३ मुले उत्तीर्र्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८९.७१ आहे.पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आज दुपारी एकला आॅनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.नाशिक विभागातून सुमारे १ लाख ५७ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.जिल्ह्यातून ४२ हजार विद्यार्थीजळगाव जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ पैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.जिल्ह्यातील ३२०८ विद्यार्थी मेरीटमध्येजिल्ह्यातील ३ हजार २०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या २ हजार १७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कला शाखेचे २३० विद्यार्थी देखील मेरीटमध्ये आले आहे. पहिल्या श्रेणीमध्ये १८ हजार ३१६ तर व्दितीय श्रेणीत १९ हजार ६३९ विद्यार्थी पास उत्तीर्ण झाले. पास श्रेणीत अवघे ९७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बारावी परीक्षेचा निकाल मिळताच विद्यार्थ्यांचा जल्लोषबारावीच्या परीक्षेत केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा देखील आपले वर्चस्व राखले आहे. या महाविद्यालयाचा निकाल ९७.२४ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा आयुष दिनेश येवले हा विद्यार्थी ९६़६१ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे़ तर वैष्णवी राहुल तोतले ९५़६९ टक्के मिळवून द्वितीय तर निकिता सोपान पाटील ९५़५३ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत़ गुरूवारी निकाल जाहीर होणार असल्याचे कळताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकवगार्ची देखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता निकाल आॅनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी घरीच मोबाईल, लॅपटॉपवर आॅनलाईन निकाल पाहिला़ अनेक विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर आपला आनंदोत्सव साजरा केला तर काहींनी निकाल सांगण्याकरिता अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करून निकालाची बातमी दिली. तर पाल्याला चांगले गुण मिळाल्याने पालकांनी सुध्दा त्यास पेढा भरवून आनंदोत्सव साजरा कला़विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.अजिबात ताण न घेता केला नियमित अभ्यास आणि स्वत:च्या नोट्समुळे यश - आयुष४सातत्यपूर्ण अभ्यास, गुरूजनांचे मार्गदर्शन आणि स्वत:च काढलेल्या नोट्स यामुळे यश मिळाले असल्याचे जळगाव शहरात अव्वल आलेल्या आयुष येवले याने सांगितले. जळगाव शहरातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु.जे.) चा विद्यार्थी असलेल्या आयुष याला बारावी वाणिज्य शाखेत ९६ टक्के गुण मिळाले आहेत. त्याला अकाऊंटमध्ये ९८, गणितात १०० आणि अर्थशास्त्रात ९९ गुण आहेत. त्याच्या या यशाबद्दल बोलताना आयुष म्हणाला की, अजिबात तणाव न घेता नियमितपणे अभ्यास केला. परिक्षेच्या काळात सात ते आठ तास आणि त्या आधी दररोज ४ तास अभ्यास केला. त्यामुळे हे यश मिळाले. वर्षभर अभ्यास केल्यावर शॉर्ट नोट्स बनवत असेल. परीक्षेच्या काळात त्याचा जास्त फायदा झाला. त्याशिवाय कॉलेज आणि क्लासेसमध्ये मार्गदर्शन मिळतच होते.’४तो पुढे म्हणाला की, परीक्षा झाल्यावर अपेक्षा होती की ९५ टक्केपेक्षा जास्त मार्कस् मिळतील. त्या अपेक्षेनुसार गुण मिळाले याचा आनंद आहे. भविष्यात सीए व्हायचे आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सीए फांऊडेशनचे आॅनलाईन क्लासेस देखील सुरू आहेत.’ 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव