शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:17 IST

२० हजारापैकी १८ हजार ४३६ मुली उत्तीर्ण

जळगाव : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावी परीेक्षेत मुलांपेक्षा सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील मुलीच हुशार ठरल्या आहे. जळगाव जिल्ह्यातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९१ व मुलांचे प्रमाण ८७.४५ टक्के आहे. जिल्ह्यात २० हजार ११३ पैकी १८ हजार ४३६ मुली उत्तीर्ण झाल्या तर २९ हजार ४४३ पैकी २४ हजार ६५३ मुले उत्तीर्र्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८९.७१ आहे.पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आज दुपारी एकला आॅनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.नाशिक विभागातून सुमारे १ लाख ५७ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.जिल्ह्यातून ४२ हजार विद्यार्थीजळगाव जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ पैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.जिल्ह्यातील ३२०८ विद्यार्थी मेरीटमध्येजिल्ह्यातील ३ हजार २०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या २ हजार १७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कला शाखेचे २३० विद्यार्थी देखील मेरीटमध्ये आले आहे. पहिल्या श्रेणीमध्ये १८ हजार ३१६ तर व्दितीय श्रेणीत १९ हजार ६३९ विद्यार्थी पास उत्तीर्ण झाले.पास श्रेणीत अवघे ९७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बारावी परीक्षेचा निकाल मिळताच विद्यार्थ्यांचा जल्लोषबारावीच्या परीक्षेत केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा देखील आपले वर्चस्व राखले आहे. या महाविद्यालयाचा निकाल ९७.२४ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा आयुष दिनेश येवले हा विद्यार्थी ९६़६१ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे़ तर वैष्णवी राहुल तोतले ९५़६९ टक्के मिळवून द्वितीय तर निकिता सोपान पाटील ९५़५३ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत़ गुरूवारी निकाल जाहीर होणार असल्याचे कळताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकवगार्ची देखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता निकाल आॅनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी घरीच मोबाईल, लॅपटॉपवर आॅनलाईन निकाल पाहिला़ अनेक विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर आपला आनंदोत्सव साजरा केला तर काहींनी निकाल सांगण्याकरिता अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करून निकालाची बातमी दिली. तर पाल्याला चांगले गुण मिळाल्याने पालकांनी सुध्दा त्यास पेढा भरवून आनंदोत्सव साजरा कला़विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.निकालास अडचणीदुपारी १ वाजता निकाल जाहीर झाला़ परंतु, तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना बारावीचा निकाल हा उशिरा बघायला मिळाला़ काही वेळेच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी आपला निकाला पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला़

टॅग्स :Jalgaonजळगाव