शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

मित्राला बुडताना वाचवलं, पण स्वतःचा जीव गमावला; धुळे तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:23 IST

इन्साफ आजाद खान (२२) व त्याचा मित्र मयूर मोहन गांगुर्डे (२५, रा. अमळनेर) हे दोघेही धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बीफार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते.

डिगंबर महाले -

अमळनेर (जि. जळगाव) : येथील इन्साफ खान या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे यास वाचविताना स्वत:चा जीव गमावल्याची घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली.

इन्साफ आजाद खान (२२) व त्याचा मित्र मयूर मोहन गांगुर्डे (२५, रा. अमळनेर) हे दोघेही धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बीफार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मित्र मंगळवारी दुपारी अवधान शिवारातील धरणावर गेले होते. यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो बुडू लागला असताना इन्साफने त्याला वाचविण्यासाठी पुढे जात त्याला हात देत बाहेर काढले, मात्र त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. यावेळी इतरांनी धाव घेत त्यासही पाण्यातून बाहेर काढले; पण तो बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

इन्साफचा नुकताच झाला होता साखरपुडाकाही दिवसांपूर्वीच इन्साफचा साखरपुडा झाला होता. पुढे लग्न आणि संसार हे सारेच स्वप्न विरले. त्याच्या पश्चात  आई- वडील आणि भाऊ अरबाज असा परिवार आहे. वडील आजाद खान हे येथील मुंदडा बिल्डर्समध्ये जेसीबी ठेकेदार आहेत, तर भाऊ अरबाज हा इंजिनिअरिंग करीत आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे