शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सेवाव्रती मीरा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:09 IST

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा पुरस्कार यंदा वैयक्तिक गटात मूळच्या जळगावच्या व गेली २० वर्षे आसाममध्ये सेवा कार्य करणाºया मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना जळगाव येथे ४ मार्च रोजी दिला जाणार आहे. त्यांच्या निस्पृह सेवा कार्याचा, त्यांचे समकालिन डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण यांनी घेतलेला हा आढावा.जळगाव येथील विवेकानंद ...

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा पुरस्कार यंदा वैयक्तिक गटात मूळच्या जळगावच्या व गेली २० वर्षे आसाममध्ये सेवा कार्य करणाºया मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना जळगाव येथे ४ मार्च रोजी दिला जाणार आहे. त्यांच्या निस्पृह सेवा कार्याचा, त्यांचे समकालिन डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण यांनी घेतलेला हा आढावा.जळगाव येथील विवेकानंद केंद्राच्या कार्याची सुरुवात १९९२ साली झाली. केंद्राच्या पहिल्या युवा प्रेरणा शिबिरात मीरा कुलकर्णी शिबिरार्थी म्हणून उपस्थित होती. शिबिरातील वागणे, सहभाग आणि एकंदरीत देशभक्ती व देशप्रेम याबद्दलचा चर्चासत्रातील सहभाग, मतप्रदर्शन आणि आपण भारत मातेसाठी काही केले पाहिजे या तळमळीने तिची आम्हास एक वेगळी ओळख झाली. तिच्या या शिबिरापासूून ती विवेकानंद केंद्राची सक्रिय कार्यकर्ती झाली.त्या वेळी जळगाव येथे बालसंस्कार, वाचन संस्कार वर्ग, ओंकार ध्यान, भजनसंध्या, शालेय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, युवा प्रेरणा शिबिर, योग, प्राणायाम वर्ग, भारतीय संस्कृती परीक्षा, समता नगर वाचनवर्ग इत्यादी कार्यक्रम वर्षभर चालत. हे सर्व उपक्रम मीरा व इतर युवा कार्यकर्त्यांमुळे यशस्वी होऊ शकले. अशा या कार्यक्रमांनी मीरा ही केंद्राच्या कार्यात सक्रिय झाली. रवी कुलकर्णी व मीरा हे जळगाव येथे जनता सहकारी बँकेच्या ओंकारेश्वर शाखेच्या इमारतीत अनेक वर्षे योगासन वर्ग घेत असत.मीरा ही मू.जे. महाविद्यालयाची व विशेषत: प्राचार्य अनिल राव सरांची वाणिज्य शाखेची आवडती व हुशार विद्यार्थिनी. मीरा उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात एम.कॉम.ला द्वितीय आली आणि तिने आयसीडब्ल्यूएचा एक ग्रुपही पूर्ण केला. परंतु तिला आपल्याकडील गुणवत्तेने चांगल्या पगाराची नोकरी करण्याची इच्छा नव्हती. सातत्याने डॉ. अविनाश आचार्य व प्राचार्य राव सरांच्या बैठकीत हा विषय व्हायचा. मीरा केंद्राच्या कार्यात स्थिरावली. १९९७ साली विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे उपाध्यक्ष बालकृष्णन हे जळगावी आले. पिंपळदचा कार्यक्रम झाल्यानंतर जळगावला परत निघताना, मीराने ललितातार्इंना मिठी मारली आणि रडत म्हणाली, ‘मला जीवनव्रत्ती व्हायचे आहे, पूर्ण वेळ काम करायचे आहे. भारत मातेची सेवा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मला कन्याकुमारीला येथूनच जायचे आहे. तिचा देशसेवेचा हा निर्णय स्तुत्य होता. हा प्रसंग डॉ. अविनाश आचार्य दादांना सांगितला. ते दादा म्हणाले, तू काळजी करू नको. आपण तेथे तिची काही व्यवस्था करू. तत्काळ दादांनी तिला बँकेत आॅडिट आॅफिसर म्हणून नोकरी दिली. पण ती नोकरीच्या पाशात रमणारी मुलगी नव्हती. एक दिवस ती आॅडिटनिमित्त भुसावळला गेली. तेथून सरळ रेल्वेने तिने कन्याकुमारी गाठले. जीवनव्रती, पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केले. आज तिचे आसाम येथील प्रांत संघटक, चहाच्या मळ्यातील कामगारांच्या मुलांचे शिक्षण, केंद्राच्या शाळा, लोकसहभागातून कामे, राष्टÑीय पातळीवरील तिची जबाबदारी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्मृती इराणी यांनी दिल्लीहून बोलावून विशेष कार्यक्रमात सहभागी केले. तिचे हे काम आमच्यासाठी विशेषत: जळगावकरांसाठी भूषणावह आहे.-डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, परीक्षा नियंत्रक, एमआयटी विद्यापीठ, पुणे

टॅग्स :Jalgaonजळगाव