शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

 कोळी समाजाच्या महिलांकडून साडी-चोळी, बांगड्यांचा शासनाला आहेर देण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2023 18:17 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे.

भूषण श्रीखंडे 

जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी इंदुबाई बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे शासनाला साडी, चोळी, बांगड्यांचा आहेर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे साहित्य जप्त केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी, दि. २५ रोजी, इंदुबाई बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन व साडी-चोळी, बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आंदोलनकर्त्यांना साडी-चोळी व बांगड्यांचा आहेर देता येणार नाही, असे सांगितले. केवळ निवेदन द्यावे, अशी विनंती केली; तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिलांना समजावत तुम्ही केवळ निवेदन द्यावे, आणलेल्या वस्तू गरीब महिलेला द्या, अशी विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार सुरेश भोळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हाधिकारी व आमदार यांनी तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, बबलू सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव