शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘संतूर आणि बासरी, अर्थात शिव-हरि’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:25 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्यसंगीत आणि रजत पट’ या सदरात लेखिका डॉ.उषा शर्मा यांनी संतूर आणि बासरी वादक अनुक्रमे पंडित शिवप्रसाद शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या सांगितलेल्या आठवणी...

फिलर कुठला प्रसारित होत आहे यावरून ड्युटीवर कोण उद्घोषक आहे याची जाणीव श्रोत्यांना असणारा तो काळ! आणि त्यावेळी माझा आवडता फिलर म्हणजे सिंह यांनी मेंडोलीनवर वाजवलेली धून आणि ‘कॉल आॅफ द व्हॅली.’ १९६७ साली रिलीज झालेली ही रेकॉर्ड (आता अल्बम). काश्मीरचं हुबेहूब चित्र असणारं कव्हर-इथून-तिथपर्यंत पसरलेला शुभ्र हिमालय, हिरवळीवर सुखनैव विचरणारा मेंढ्यांचा कळप, काश्मिरी ललना... थोडक्यात ‘इंडियन शेफर्ड लाईफ इन कश्मीर’ हे शीर्षक सार्थ करणारं कव्हर... तर ही माझी पहिली (अप्रत्य) भेट. पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा आणि वृजभूषण काबरा यांच्याशी पहाडी रागातील धून प्रसारित करताना आपणही ‘शिकारा’मधून, चप्पूने पाणी कापत ‘यही है स्वर्ग’ची अनुभूती घेत आहोत हा भास ! शततंत्री वीणा काय की सुफियाना मौसिकीत वापरलं जाणारं वाद्य काय किशोरीताई, उस्ताद बडे गुलामअली खाँ किंवा पंडित जसराज यांच्या हातातील स्वरमंडल काय... सारं कसं मिळतं जुळतं !हरिजींची बासरी आणि वृजभूषण काबरा यांची गिटार हळूवार, त्याहीपेक्षा अलगद वाजणारं ते संतूर. जिथं जिथं निसर्ग आहे तिथं तिथं संतूरचे नाजूक स्वर (‘झनक झनक पायल’ या चित्रपटातील अनेक दृश्य संतूरच्या हळूवार स्पर्शानं भारलेली) आम्हाला तर संगीतकार जयदेव यांनी संतूरचे स्वर गायला शिकवले. (‘ये दिल और उनकी निगाहोंके साये’ या गीताची सुरुवात आठवा.) पंडित शर्माजी यांनी हे वाद्य जगासमोर आणलं. भजन सोपोरी, रूस्तम सोपोरी, वर्षा अग्रवाल, तरुण भट्टाचार्य आणि आपले गुरू आणि पिताश्री यांच्या समवेत जुगलबंदी पेश करणारा राहुल शर्मा या सर्वांनी संतूरवादनात चार चाँद लावले. शिवकुमार शर्मा यांच्याकडे नि:शुल्क धडे गिरवणाऱ्या शिष्यांनाही सलाम.पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा (जन्म १३ जानेवारी १९३८) यांना बाल्टिमोर आणि इतर देशांचं नागरिकत्व मिळालं असे म्हणतात. पण त्यांची पहचान म्हणजे भारताची शान ! उत्कृष्ट तबलावादक आणि गायक! पिताश्रींच्या इच्छेनुसार संतूर (शततार) या लोकवाद्यावर अधिक संशोधन केलं आणि वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईला पहिली संगीत सभा पेश केली.पद्मभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचाही जन्म (योगायोगाने) १९३८ चा. जन्म अलाहाबादचा, परंतु कार्यारंभ आकाशवाणी कटकला, संगीतकार आणि कलाकार म्हणून ! पंडित राजाराम, पंडित भोलानाथ प्रसन्न आणि अन्नपूर्णादेवी यांच्या सर्व अटी मान्य करून या सर्वांना सार्थ अभिमान वाटावा असं शिष्यत्व सिद्ध केलं. भुवनेश्वर आणि मुंबईला गुरुकुल स्थापित केलं. पंडित शिवकुमार शर्मा समान अनेक अनेक पाश्चिमात्य संगीतकारांसमवेत कला सादर केली.शिव-हरि या म्युझिकल डीयुओने भारतीय सिनेसृष्टीत श्रीगणेशा केला तो १९८१ या वर्षी ‘सिलसिला’ (यश चोप्रा फिल्म) या चित्रपटापासून.सर्व परिचित सर्व गीतं एकसे बढकर एक (मै और मेरी तनहाई, देखा एक ख्वाब, सरसे सरके आणि रंग बरसे हे होळीगीत चाँदनी (यशराज फिल्मस् १९८९) हा सिनेमा श्रीदेवीच्या अभिनयाने जितका पसंत केला गेला तितकाच शिव-हरिच्या संगीतानं. यातील अनेक दृश्य बर्फाळ प्रदेशात चित्रित आणि साहजिकच बासरी व संतूरचा सुंदर मिलाफ सातत्याने जाणवतो.शीर्षक गीत ‘मेरी चाँदनी, मेरे हाथों में नौ-नौ चूडियाँ’ इ.गाणी विसरायला होणार नाही. कारण आहे ‘मेलोडी’ तसंच ‘लम्हे’ (१९९१) या चित्रपटातील राजस्थानी लोकसंगीताचा प्रभाव असलेली गीतं (‘चूडियाँ खनक गयी’, किंवा ‘मीठे मीठे गीत मितवा’, ‘मेघा रे मेघा’ इ.) खूप पसंत केली गेली. ‘डर’ हा चित्रपट शाहरुख खानच्या क...क...किरणची आठवण करून देतो, तद्वत ‘जादू तेरी नज़र’ किंवा ‘तू मेरे सामने’ याही गीतांना युवा पिढीनं पसंत केलेला हा सिनेमा आम्हाला ‘शिव-हरि’ची यशस्वी कारकीर्द प्रस्तुत करतो.या जोडीनं ‘विजय’, ‘साहिबाँ’ (१९९३), ‘फासले’(१९८५) अशा अनेक चित्रपटांतून आपली कला सादर केली.पंडित हुसन्लाल-भगतराम, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीनं हिंदी सिनेसृष्टीला अत्यंत मधाळ-मधुर, सर्वांगसुंदर अशी आणि स्मरणीय गीतं दिली. तीच सुवर्ण परंपरा ‘शिव-हरि’ यांनी कायम ठेवली. बाबूजी (संगीतकार-गायक) सुधीर फडके यांनी आपल्या मुलाला श्रीधर फडके यांना एकच-मोलाचा मंत्र दिला की, गीताची चाल साधी-सुमधूर असावी, जेणेकरून आमजनताही ती गाऊ शकेल. ‘आवारा हूँ’ हे गीत याचं उत्तम उदाहरण.रशियन गातात, ब्रिटीशर्सही गातात... आहे की नाही जादू? तशीच एक अंगाईगीत रचना ‘नीला आसमाँ सो गया’ ही अलबेला या चित्रपटातील ‘लोरी’ची आठवण करून देते. हे शिव-हरि यांचं यश! लोकसंगीताचा जिथं प्रभाव तिथं ‘लोक’ चुंबकीय प्रभावानं आकर्षित होतात आणि अशीच गाणी शिव-हरि यांनी दिलीत. म्हणूनच ‘रंग बरसे’ हे होळीगीत रंगपंचमीला हमखास दिसतं, वाजतं आणि गायलं जातं.- डॉ.उषा शर्मा, जळगाव

टॅग्स :musicसंगीतJalgaonजळगाव