शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

साने गुरुजी,बहिणाबाई यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’साठी संमेलनात ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:10 IST

मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी ठराव करणार : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चुडामण बोरसेपूज्य साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेर : खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चाैधरी व साने गुरुजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासह विविध ठराव पारित करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी संध्याकाळी समारोप झाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधानसभेसह विधान परिषदेत ठराव करावा. या ठरावानुसार केंद्राकडे पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथून दृक-श्राव्य ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून संमेलनात थेट सहभागी झाले.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. रवींद्र शोभणे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी भाषा विकासमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील,  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अ.भा. साहित्य महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डाॅ.अविनाश जोशी उपस्थित होते. 

अमळनेरला पुस्तकांचे गाव           म्हणून दर्जा देणार….दीपक केसरकर यांनी अमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणून दर्जा देणार असल्याची घोषणा केली. यासंदर्भात मंत्री अनिल पाटील यांनी मागणी केली होती. साने गुरुजींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून राज्य शासनाकडून केंद्राकडे मागणी करू, यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणार, असेही केसरकर यांनी म्हणाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी विधिमंडळात होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 

राजकीय कादंबऱ्यांसाठीसाजेसा काळ….महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष ठेवता-ठेवता डोळ्यांवर ताण पडल्याने डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे संमेलनास येता आले नाही. लेखकांना दर्जेदार राजकीय कादंबऱ्या लिहिण्यासाठी आजच्याएवढा साजेशा काळ कधीही नसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

परंपरेचा धागा अमळनेरला जोडला….संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले की, साहित्य संमेलन माझ्यासाठी व्यक्ती म्हणून महत्त्वाचे आहे. स्थानिक आयोजक गेली चार ते पाच वर्षे वेगवेगळ्या संमेलनात हजेरी लावून व्यवस्थांचे निरीक्षण करायचे. अमळनेरला संमेलन झालेच पाहिजे हा त्यांचा निर्धार होता. गेल्यावर्षीचे संमेलन महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांच्या भूमीत झाले. याच विचारांच्या परंपरेचा धागा अमळनेरला जोडला गेला. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आदर्शांचे मिश्रण होते.

संमेलनात पारित झालेले ठराव

१) ग्रामीण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणामकारक योजना कराव्यात. २) मराठीसह सर्व भारतीय भाषांची आकाशवाणी दिल्ली येथून प्रसारित होणारी राष्ट्रीय वार्तापत्रे त्या-त्या राज्यांच्या राजधानीत पाठविण्यात आली. त्यामुळे त्या भाषांचे दिल्लीतील राष्ट्रीय स्थान संपुष्टात आले आहे. ही वार्तापत्रे पुन्हा दिल्लीहून प्रसारीत करण्यात यावीत.३) गुजराथी, मराठी शब्दकोशाची आवृत्ती सुधारून तयार करण्यासाठी  शासनाने अनुदान द्यावे.४) बृह्नमहाराष्ट्रातील मराठी शिक्षण संस्थांना आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एकरकमी अनुदान द्यावे.५) काळाच्या ओघात कान्हादेशाचे अपभ्रंश होऊन खान्देश असे नामकरण झाले,  ते पूर्ववत कान्हादेश असे करण्यात यावे.६) पूज्य साने गुरूजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी. ७) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी. ८) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे.९) जळगाव व धुळे जिल्ह्यासाठी महत्वाच्या पाडळसे धरणाचा केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करावा. तसा प्रस्ताव केंद्राकडे महाराष्ट्र शासनाने त्वरित  पाठवावा.

पुढच्या संमेलनाचे प्रस्ताव मागवले…

उषा तांबे यांनी पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत, असे सांगितले.

टॅग्स :Sane Gurujiसाने गुरुजीJalgaonजळगाव