शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना

By ajay.patil | Updated: March 28, 2023 15:49 IST

डंपर, ट्रॅक्टरचालकांच्या वेगावर नियंत्रण येणार का ? : महिनाभरातील चौथी घटना

जळगाव - तालुक्यातील चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या धडकेत सर्व १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. डंपर व ट्रॅक्टरच्या धडकेत अपघात झाल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. या घटनेनंतर चिंचोली ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

चिंचोली येथील कैलास लटकन कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अनेक वर्षांपासून कैलास कोळी हे शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे २५ ते ३० बकऱ्या असून,  बुधवारी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी चिंचोली भागातील वनक्षेत्रात गेले होते. त्यानंतर दुपारी आपल्या बकऱ्या घेवून घरी येत असताना, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गालगत जामनेरहून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने ((एम.एच. १९ वाय ७७७३) रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना अक्षरश चिरडून टाकले. त्यात १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जमा झाले गाव

या घटनेची माहिती मिळताच चिंचोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डंपर चालकाला पकडून ठेवले. त्यानंतर काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबधित डंपर चालकाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलीसांकडे कोणतीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार डंपर हे जामनेर येथे  वाळू घेवून गेले होते. वाळू टाकल्यानंतर हे डंपर जळगावच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. घटना घडली तेव्हा डंपरमध्ये वाळू नव्हती.

महिनाभरातील चौथी घटना...

वाळूने भरलेल्या व वाळू वाहतूक करून खाली जाणाऱ्या डंपर व ट्रॅक्टरने वाहनधारक व मुक्याप्राण्यांना उडविल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. १ मार्च रोजी आव्हाणे रस्त्यावर वाळूच्या ट्रॅक्टरने दुचाकीने जाणाऱ्या माय-लेकांना उडविले होते. त्यानंतर ३ मार्च रोजीच कानळदा रस्त्यावर वाळूच्या खाली ट्रॅक्टरने बैलजोडीला उडविले होते. त्यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. तर २४ मार्च रोजी शहरातील टॉवर चौकात वाळूच्या डंपरने शिक्षिकांच्या चारचाकीला ठोकल्याने दोन शिक्षीका व शिक्षक जखमी झाले होते. आता पुन्हा चिंचोलीला १५ बकऱ्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने उडविल्याने १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनधिकृत वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाकडून तर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मात्र, त्यांच्या वेगावर देखील नियंत्रण आणण्यास प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, मुक्या प्राण्यांनाही जीव गमवावा लागत

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात