शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना

By ajay.patil | Updated: March 28, 2023 15:49 IST

डंपर, ट्रॅक्टरचालकांच्या वेगावर नियंत्रण येणार का ? : महिनाभरातील चौथी घटना

जळगाव - तालुक्यातील चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या धडकेत सर्व १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. डंपर व ट्रॅक्टरच्या धडकेत अपघात झाल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. या घटनेनंतर चिंचोली ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

चिंचोली येथील कैलास लटकन कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अनेक वर्षांपासून कैलास कोळी हे शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे २५ ते ३० बकऱ्या असून,  बुधवारी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी चिंचोली भागातील वनक्षेत्रात गेले होते. त्यानंतर दुपारी आपल्या बकऱ्या घेवून घरी येत असताना, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गालगत जामनेरहून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने ((एम.एच. १९ वाय ७७७३) रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना अक्षरश चिरडून टाकले. त्यात १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जमा झाले गाव

या घटनेची माहिती मिळताच चिंचोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डंपर चालकाला पकडून ठेवले. त्यानंतर काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबधित डंपर चालकाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलीसांकडे कोणतीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार डंपर हे जामनेर येथे  वाळू घेवून गेले होते. वाळू टाकल्यानंतर हे डंपर जळगावच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. घटना घडली तेव्हा डंपरमध्ये वाळू नव्हती.

महिनाभरातील चौथी घटना...

वाळूने भरलेल्या व वाळू वाहतूक करून खाली जाणाऱ्या डंपर व ट्रॅक्टरने वाहनधारक व मुक्याप्राण्यांना उडविल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. १ मार्च रोजी आव्हाणे रस्त्यावर वाळूच्या ट्रॅक्टरने दुचाकीने जाणाऱ्या माय-लेकांना उडविले होते. त्यानंतर ३ मार्च रोजीच कानळदा रस्त्यावर वाळूच्या खाली ट्रॅक्टरने बैलजोडीला उडविले होते. त्यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. तर २४ मार्च रोजी शहरातील टॉवर चौकात वाळूच्या डंपरने शिक्षिकांच्या चारचाकीला ठोकल्याने दोन शिक्षीका व शिक्षक जखमी झाले होते. आता पुन्हा चिंचोलीला १५ बकऱ्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने उडविल्याने १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनधिकृत वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाकडून तर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मात्र, त्यांच्या वेगावर देखील नियंत्रण आणण्यास प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, मुक्या प्राण्यांनाही जीव गमवावा लागत

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात