शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना

By ajay.patil | Updated: March 28, 2023 15:49 IST

डंपर, ट्रॅक्टरचालकांच्या वेगावर नियंत्रण येणार का ? : महिनाभरातील चौथी घटना

जळगाव - तालुक्यातील चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या धडकेत सर्व १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. डंपर व ट्रॅक्टरच्या धडकेत अपघात झाल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. या घटनेनंतर चिंचोली ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

चिंचोली येथील कैलास लटकन कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अनेक वर्षांपासून कैलास कोळी हे शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे २५ ते ३० बकऱ्या असून,  बुधवारी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी चिंचोली भागातील वनक्षेत्रात गेले होते. त्यानंतर दुपारी आपल्या बकऱ्या घेवून घरी येत असताना, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गालगत जामनेरहून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने ((एम.एच. १९ वाय ७७७३) रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना अक्षरश चिरडून टाकले. त्यात १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जमा झाले गाव

या घटनेची माहिती मिळताच चिंचोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डंपर चालकाला पकडून ठेवले. त्यानंतर काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबधित डंपर चालकाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलीसांकडे कोणतीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार डंपर हे जामनेर येथे  वाळू घेवून गेले होते. वाळू टाकल्यानंतर हे डंपर जळगावच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. घटना घडली तेव्हा डंपरमध्ये वाळू नव्हती.

महिनाभरातील चौथी घटना...

वाळूने भरलेल्या व वाळू वाहतूक करून खाली जाणाऱ्या डंपर व ट्रॅक्टरने वाहनधारक व मुक्याप्राण्यांना उडविल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. १ मार्च रोजी आव्हाणे रस्त्यावर वाळूच्या ट्रॅक्टरने दुचाकीने जाणाऱ्या माय-लेकांना उडविले होते. त्यानंतर ३ मार्च रोजीच कानळदा रस्त्यावर वाळूच्या खाली ट्रॅक्टरने बैलजोडीला उडविले होते. त्यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. तर २४ मार्च रोजी शहरातील टॉवर चौकात वाळूच्या डंपरने शिक्षिकांच्या चारचाकीला ठोकल्याने दोन शिक्षीका व शिक्षक जखमी झाले होते. आता पुन्हा चिंचोलीला १५ बकऱ्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने उडविल्याने १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनधिकृत वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाकडून तर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मात्र, त्यांच्या वेगावर देखील नियंत्रण आणण्यास प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, मुक्या प्राण्यांनाही जीव गमवावा लागत

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात