शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

जळगाव जिल्ह्यात आणखी ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:54 IST

४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

ठळक मुद्देटंचाईची तीव्रता वाढतेय ७१ विहिरींचे अधिग्रहण

जळगाव : जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हिवाळा सुरू असतानाही सध्या ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.यंदा जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्के पाऊस झाला असून गत १५ वर्षांतील गंभीर दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके यापूर्वीच गंभीर दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झाले आहेत. तर अन्य दोन तालुक्यांमधील काही मंडळ ही दुष्काळी घोषीत करण्यात आले होते. मात्र या दोन तालुक्यांसह सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने या दोन तालुक्यांचाही दुष्काळी जाहीर करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.७१ विहिरींचे अधिग्रहणडिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई भेडसावू लागली असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत ६९ गावांमध्ये ७१ विहिरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील १७ गावे असून त्यापाठोपाठ मुक्ताईनगर १६ गावे, जळगाव १, जामनेर १, धरणगाव ८, एरंडोल ५, भुसावळ ७, बोदवड १, चाळीसगाव ५, भडगाव २, पारोळा ५ तर चोपडा तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे.६ पाणी योजनांना मंजुरीपाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील जवखेडा, भडगाव तालुक्यात कजगाव, धोत्रे, बात्सर, पथराड व जामनेर तालुक्यातील पाळधी या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी पाळधीच्या पाणी योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. तर उर्वरीत तात्पुरत्या पाणी योजनांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.४४ गावांना टँकरने पाणीपुरवठामागील वर्षीच्या उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर या वर्षी पावसाळा सुरू झाला तरीही बंद होऊ शकले नव्हते. अमळनेर तालुक्यातील काही गावांना टँकर सुरूच ठेवावे लागले होते. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्याने सध्या हिवाळा सुरू असतानाही जिल्ह्यातील तब्बल ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात अमळनेर तालुक्यातच सर्वाधिक ३० गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याखेरीज जळगाव तालुक्यातील १, भुसावळ तालुक्यातील २, मुक्ताईनगर तालुक्यातील १, चाळीसगाव ८, तर पारोळा तालुक्यातील २ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव