शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

'सैराट झालं जी'... एकाच वर्षात जिल्ह्यातील ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:19 AM

जळगाव : प्रेम प्रकरण असो अथवा फूस लावून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून ९९६ मुली सैराट झाल्या असून त्यासोबत ६५८ पालकांनीही ...

जळगाव : प्रेम प्रकरण असो अथवा फूस लावून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून ९९६ मुली सैराट झाल्या असून त्यासोबत ६५८ पालकांनीही आपला मुलगा पळून गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यात विवाहित महिला व नवविवाहित तरुणींचाही समावेश आहे. असे असले तरी ७४५ मुली तर ३२३ मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २५१ मुलींचा शोध लागलेला नाही.

जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत ४ हजार ८२८ हरविलेल्या, पळविलेल्या महिला व मुलींची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो, त्यामुळे ही संख्यादेखील कमी नाही. बहुतांश प्रकरणात महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते.

दरम्यान, परत आलेल्या महिला व मुलींनी आपल्या घरी परत न जाता प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. अपवादात्मक परिस्थितीत महिला व मुली माघारी कुटुंबाकडे गेलेल्या आहेत. हरवलेल्या व पळविलेल्या एकूण महिला व मुलींची पाच वर्षातील संख्या ४ हजार २२८ इतकी असून त्यापैकी ३ हजार ५२२ महिला व मुली परत आलेल्या आहेत. १ हजार ३०६ महिला व मुली अद्यापही परत आलेल्या नसल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. दरम्यान, एप्रिल ते जुलै या कोरोनाच्या चार महिन्यात ११३ मुलींनी पलायन केले आहे.

कोणत्या महिन्यात किती मुली सैराट

जानेवारी -१०२

फेब्रुवारी -१०७

मार्च -८७

एप्रिल -१२

मे -१९

जून -३४

जुलै -६८

ऑगस्ट -११०

सप्टेंबर -१२२

ऑक्टोबर -१११

नोव्हेंबर -९७

डिसेंबर -१२७

कोणत्या वर्षात किती?

२०१८ : ८३१

२०१९ : ९८२

२०२० : ९९६

२५१ मुलींचा शोध लागेना

गेल्या वर्षी जिल्ह्यातून पलायन केलेल्या ९९६ पैकी ७४५ मुलींचा शोध लागला आहे तर २५१ मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. ज्या मुलींचा शोध लागला आहे, त्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या बहुतांश मुलींनी पालकासोबत जाण्यास नकार दिला आहे तर १८ वर्षाच्या खालील मुलीही काही बालनिरीक्षणगृहात तर काही मुली पालकांकडे गेल्या आहेत.

६५८ मुलेही बेपत्ता

जिल्ह्यातून मुलींसोबतच ६५८ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षाच्या आतील ६५ मुलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यापैकी ३२३ मुलांचा शोध लागलेला आहे. यातील बहुतांश मुले ही पालकांकडे गेली आहेत. मुलांच्या पालकांनी मुलींचा स्वीकार केला आहे. काही जणांना तर दोघांच्याही पालकांनी नाकारले, त्यामुळे त्यांनी जिल्हा सोडून इतरत्र संसार थाटला आहे.

कोट....

मुले, मुली यांचे पलायन हा चिंतेचा विषय आहे. आपला पाल्य काय करतो, याकडे पालकांनीच सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस आपले काम करतीलच. अनेक मुले, मुली शोधूनही आणल्या आहेत. मात्र काही बाबतीत कायद्याने हात बांधलेले असतात. सज्ञान नसलेले मुलं, मुली पालकांच्याच स्वाधीन केलेले आहेत. मुलामुलींचे विषय आपण स्वत:च गांभीर्याने घेऊन पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.

- डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक