शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

जे पेराल तेच परत मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 9:00 PM

आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे डॉ.विश्वास पाटील यांचे प्रतिपादनआज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वार्थापोटी तो नाती जपतो.सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

चाळीसगाव, जि.जळगाव : आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.येथील ना.बं. वाचनालयात सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी गुंफले. संवेदनशीलता आणि आपण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रास्ताविक संचालक विश्वास देशपांडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रकाश कुलकर्णी यांनी करून दिला. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.आपला विषय स्पष्ट करताना प्रा. पाटील यांनी प्राचीन काळापासून तर आजपर्यंतच्या अनेक गोष्टींचे दाखले दिले. आयुष्यभर घाणीत राहणाऱ्या माणसाला अत्तराचा सुगंधी वासदेखील नकोसा वाटतो. संवेदनशीलता आणि आपले असेच नाते आहे. आज जग क्रेता आणि विक्रेता अशा दोन भागात विभागले गेले आहे. प्रत्येकजण जग ही जणू काही बाजारपेठ असल्यासारखे वागतो. पण मानवी जीवनातील नाती, नात्यातील प्रेम, विश्वास या गोष्टी विकत घेता येत नाहीत. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वार्थापोटी तो नाती जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीतआली तर आपल्याला देवाची आठवण येते. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथार्पोटी तो नाते जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वगार्चे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीत परिस्थिती आली तरच आपल्याला देवाची आठवण येते.आभार वाचनालयाचे संचालक राजेश ठोंबरे यांनी मानले. व्याख्यानमालेचे प्रायोजक भोजराज पुन्शी आणि सदरच्या व्याख्यानाचे प्रायोजक डॉ.सुभाष निकुंभ यांचेही त्यांनी आभार मानले. व्याख्यानमालेचे प्रमुख मनीष शहा व अन्य संचालक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChalisgaonचाळीसगाव