शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संभाजी राजेंनी एकतर उडी घेवू नये, अन् घेतली तर माघार घेवू नये - बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:39 IST

Bachchu Kadu : बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जळगाव : एखाद्या निवडणुकीत किंवा इतर राजकीय गोष्टींमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी एकतर उडी घेतलीच नको पाहिजे, आणि जर उडी घेतली असेल तर माघार घेवूच नये’ असा सल्ला राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. संभाजीराजे हे एक तर राजे आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याबाबत आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलणे उचीत नाही. मात्र, आता छत्रपतींनी निवडणुकीत उडी टाकली, आणि माघारदेखील घेतली आहे. त्यामुळे आता त्यांची पुढील भूमिका काय राहिल? हे देखील तेच सांगू शकतात असे ही त्यांनी सांगितले.

बोरा यांनी केले राज्यमंत्र्यांचे पाय धुवून स्वागतबच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नीलेश बोरा यांच्या चौघुले प्लॉट भागातील निवासस्थानी मंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी बोरा यांनी बच्चू कडू यांचे पाय धुवून स्वागत केले. त्यानंतर बोरा यांच्या कुंटूंबियांनी बच्चू कडू यांचे औक्षण केले. कार्यकर्त्याने केलेल्या अनोख्या स्वागताने ते भारावले होते. मात्र, अशाप्रकारे पाय धुवून स्वागत करणे हे वेदनादायी आहे. पण, नीलेशने ऐकले नाही, असेही ते म्हणाले.

ईडीचे संकट टाळण्यासाठी राणांना हनुमान चालीसाराज्यातील इतर मंत्र्यांप्रमाणेच नवनित राणांना ईडीची नोटीस आली होती. मात्र, त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. राणा यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम दिला. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हटली तर ईडीचे संकट टळेल, असा कार्यक्रम केंद्र शासनाकडूनच राणा यांना देण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. हा कार्यक्रम झाल्यानंतर ईडी गायब झाल्याचे सांगत बच्चू कडू यांनी भाजप व राणा यांना टोला लगावला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती