शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

संभाजी राजेंनी एकतर उडी घेवू नये, अन् घेतली तर माघार घेवू नये - बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:39 IST

Bachchu Kadu : बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जळगाव : एखाद्या निवडणुकीत किंवा इतर राजकीय गोष्टींमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी एकतर उडी घेतलीच नको पाहिजे, आणि जर उडी घेतली असेल तर माघार घेवूच नये’ असा सल्ला राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. संभाजीराजे हे एक तर राजे आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याबाबत आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलणे उचीत नाही. मात्र, आता छत्रपतींनी निवडणुकीत उडी टाकली, आणि माघारदेखील घेतली आहे. त्यामुळे आता त्यांची पुढील भूमिका काय राहिल? हे देखील तेच सांगू शकतात असे ही त्यांनी सांगितले.

बोरा यांनी केले राज्यमंत्र्यांचे पाय धुवून स्वागतबच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नीलेश बोरा यांच्या चौघुले प्लॉट भागातील निवासस्थानी मंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी बोरा यांनी बच्चू कडू यांचे पाय धुवून स्वागत केले. त्यानंतर बोरा यांच्या कुंटूंबियांनी बच्चू कडू यांचे औक्षण केले. कार्यकर्त्याने केलेल्या अनोख्या स्वागताने ते भारावले होते. मात्र, अशाप्रकारे पाय धुवून स्वागत करणे हे वेदनादायी आहे. पण, नीलेशने ऐकले नाही, असेही ते म्हणाले.

ईडीचे संकट टाळण्यासाठी राणांना हनुमान चालीसाराज्यातील इतर मंत्र्यांप्रमाणेच नवनित राणांना ईडीची नोटीस आली होती. मात्र, त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. राणा यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम दिला. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हटली तर ईडीचे संकट टळेल, असा कार्यक्रम केंद्र शासनाकडूनच राणा यांना देण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. हा कार्यक्रम झाल्यानंतर ईडी गायब झाल्याचे सांगत बच्चू कडू यांनी भाजप व राणा यांना टोला लगावला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती