शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

समतेची बिजे वारकरी संप्रदायाने रुजवलीत -प्रा. संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:56 AM

महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी चोपडा येथे आयोजीत व्याख्यानात व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ यावर व्याख्यानकठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू दिला नाही

चोपडा : महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय येथील ‘प्राध्यापक प्रबोधिनी’तर्फे स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मार्ट हॉल येथे ८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ या विषयावर बोलतांना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, मनुवादी व विषमतावादी व्यवस्थे विरुद्ध बंड करून समताधिष्ठित वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे नामदेव व ज्ञानेश्वर यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. तसेच उत्तर काळात संत तुकोबाराय यांना सुद्धा रात्रंदिन युद्धाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. कठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू न देता कीर्तनाच्या रंगी नाचून ज्ञानदीप जगी लावलेत. संत म्हणजे केवळ पोशाखाचे व कर्मकांडाचे स्तोम माजवणे नसून रंजल्या गांजल्याची सेवा करून माणसात देवत्व पाहणे होय. संतांचे कार्य हे चमत्काराच्या स्वरूपात न स्वीकारता तर्काच्या पातळीवर ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या नुसार स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते संजीव सोनवणे, उपप्राचार्य एम.बी. हांडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.