शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

समतेची बिजे वारकरी संप्रदायाने रुजवलीत -प्रा. संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:58 IST

महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी चोपडा येथे आयोजीत व्याख्यानात व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ यावर व्याख्यानकठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू दिला नाही

चोपडा : महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय येथील ‘प्राध्यापक प्रबोधिनी’तर्फे स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मार्ट हॉल येथे ८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ या विषयावर बोलतांना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, मनुवादी व विषमतावादी व्यवस्थे विरुद्ध बंड करून समताधिष्ठित वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे नामदेव व ज्ञानेश्वर यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. तसेच उत्तर काळात संत तुकोबाराय यांना सुद्धा रात्रंदिन युद्धाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. कठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू न देता कीर्तनाच्या रंगी नाचून ज्ञानदीप जगी लावलेत. संत म्हणजे केवळ पोशाखाचे व कर्मकांडाचे स्तोम माजवणे नसून रंजल्या गांजल्याची सेवा करून माणसात देवत्व पाहणे होय. संतांचे कार्य हे चमत्काराच्या स्वरूपात न स्वीकारता तर्काच्या पातळीवर ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या नुसार स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते संजीव सोनवणे, उपप्राचार्य एम.बी. हांडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.