शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

समतेची बिजे वारकरी संप्रदायाने रुजवलीत -प्रा. संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:58 IST

महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी चोपडा येथे आयोजीत व्याख्यानात व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ यावर व्याख्यानकठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू दिला नाही

चोपडा : महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय येथील ‘प्राध्यापक प्रबोधिनी’तर्फे स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मार्ट हॉल येथे ८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ या विषयावर बोलतांना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, मनुवादी व विषमतावादी व्यवस्थे विरुद्ध बंड करून समताधिष्ठित वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे नामदेव व ज्ञानेश्वर यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. तसेच उत्तर काळात संत तुकोबाराय यांना सुद्धा रात्रंदिन युद्धाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. कठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू न देता कीर्तनाच्या रंगी नाचून ज्ञानदीप जगी लावलेत. संत म्हणजे केवळ पोशाखाचे व कर्मकांडाचे स्तोम माजवणे नसून रंजल्या गांजल्याची सेवा करून माणसात देवत्व पाहणे होय. संतांचे कार्य हे चमत्काराच्या स्वरूपात न स्वीकारता तर्काच्या पातळीवर ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या नुसार स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते संजीव सोनवणे, उपप्राचार्य एम.बी. हांडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.