शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सलून व्यवसाय २५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:55 IST

लॉकडाऊननंतर सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी तो २५ टक्क्यांपर्यंत येवून ठेपला आहे.

ठळक मुद्देन्याय द्यावा : नाभिक समाजाचे शासनाला साकडेनाभिक समाजाच्या वतीने निवेदन

यावल : लॉकडाऊननंतर सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी तो २५ टक्क्यांपर्यंत येवून ठेपला आहे. यामुळे नाभिक समाज बांधवांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत नाभिक समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली आहे.विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या कालखंडात नाभिक समाजातील १२ युवकांनी आत्महत्या केल्या. समाजाला मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागल्याने या घटना घडल्या. सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियावर नाभिक समाजाची बदनामी झाली. नाभिक समाजाचा व्यवसाय २५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. त्यांना उपासमारीची झळ सोसावी लागत आहे. या अनुषंगाने या समाजाला लॉकडाऊन कालखंडात प्रत्येक महिन्याची १० हजार रुपये नुकसान भरपाई प्रत्येकाला द्यावी. २६ मार्च १९७९ च्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या शिफारशीनुसार नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. आत्महत्याग्रस्त १२ तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. सलून व्यावसायिकांचा ५० लाख रुपयाचा विमा उतरवण्यात यावा. लॉकडाऊन कालखंडातील विजेचे बिल सलून व्यावसायिकांचे माफ करण्यात यावे, असे विविध मागण्यांचे निवेदन नाभिक समाजातर्फे देण्यात आले.या निवेदनावर जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष अनिल चौधरी, सुरेश चौधरी, राहुल सावखेडकर, उमाकांत चौधरी यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल