शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दोन दिवसात 2 हजार वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 18:43 IST

खरेदीदारांनी खिशात पैसे घेऊन रणरणत्या उन्हात गाडी मिळविण्यासाठी धडपड केली.

जळगाव : सवलतीच्या दरात मिळणा:या बीएस-3 इंजिन असलेल्या वाहनांची खरेदी करण्यासाठी  दुस:या दिवशी, शुक्रवारी गर्दीमध्ये आणखी भर पडून खरेदीदारांनी खिशात पैसे घेऊन रणरणत्या उन्हात  गाडी मिळविण्यासाठी धडपड केली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जास्त गाडय़ांची विक्री होऊन दोनच दिवसात तब्बल दोन हजारावर दुचाकींची विक्री झाली.   दरम्यान, बीएस-3 इंजिन असलेल्या अनेक कंपन्यांचे वाहने दुपारीच संपले. काही ठिकाणी गर्दीमुळे दुकानांचे शटर बंद करण्यात आले होते तर काही ठिकाणी रात्रीर्पयत गर्दी कायम होती. भारत स्टेज-3 (बीएस-3) इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्री व नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय दिला. त्यामुळे 1 एप्रिलपासून बीएस-4 इंजिन असलेलीच वाहने विक्री करता येणार असल्याने वाहन कंपन्यांनी सध्या उपलब्ध असलेली बीएस -3 वाहनांची विक्री करण्यासाठी 30 मार्चपासून त्यांच्यावर मोठी सवलत जाहीर केली.  कंपन्यांकडून सवलत जाहीर होताच पहिल्या दिवसापासूनच ही वाहने खरेदीसाठी झुंबड उडाली व दुस:या दिवशीही ती कायम होती.गुरुवारी रात्रीर्पयत गर्दी असताना शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा दुचाकींच्या दालनासमोर गर्दी होऊ  लागली होती. जो तो आपल्याला प्रथम वाहन मिळावे यासाठी धडपड करीत होता. पैसे घेऊन उन्हात प्रतीक्षाशहरातील दालनांमध्ये गर्दी वाढतच गेल्याने प्रत्येकाला प्रतीक्षा करावी लागत होती. येथे येणारे सर्वच जण सोबत हजारो रुपये घेऊन रणरणत्या उन्हातही गाडी मिळविण्यासाठी रेटारेटी करीत होते. विशेष म्हणजे आवडीची गाडी मिळावी ही सर्वांचीच अपेक्षा होती व त्यासाठी रांगाही लागल्या होत्या. मात्र मनासारख्या दुचाकी शिल्लक नव्हत्या तरी सवलतीचा लाभ घ्यायचा म्हणून एका दालनापासून दुस:या दालनाकडे खरेदीदार धाव घेत होते.  नोंदणीसाठी धडपड वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठीही वाहनधारकांची धडपड सुरु होती. त्यासाठी शोरुम्स चालकांकडे आग्रह केला जात होता. कोटय़वधीची उलाढालदोन दिवसात जळगाव शहर व जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वाहनांची विक्री झाली आहे. त्यातून कोटय़वधीची उलाढाल झाली आहे. काही ग्राहक वाहने खरेदीसाठी ग्रामीण भागातून आले होते. सोबत आवश्यकती कागदपत्रेही त्यांनी आणली होती. शहरातील बहुसंख्य शोरुम्सवर सकाळी आठ वाजेपासून प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अवघ्या काही तासात वाहने संपली.वाहनांची नोंदणी ऑनलाईन झाल्याने विक्रेते ही नोंदणी करतात. त्यामुळे कार्यालयात  गर्दी नव्हती की वाढीव कक्षहीनव्हते. विक्रेत्यांनी नोंदणी केलेला  डाटा आमच्या कार्यालयात येतो. त्यानंतरच वाहनांच्या नोंदणीची संख्या समजते. - विकास ब:हाटे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.