शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अमळनेरचे सखाराम महाराज संस्थान

By admin | Updated: June 27, 2017 13:21 IST

खानदेशातून आपल्या वज्र सामथ्र्याने काम करणा:या या संत परंपरेची खूप दीर्घकालीन प्रशस्ती आहे. श्री सखाराम महाराजांची शिष्यपरंपरा 1757 सालापासून सुरू होते.

 खान्देशातील वारकरी संप्रदायाचा ध्वज मोठय़ा डौलाने अमळनेरच्या सखाराम महाराजांच्या खांद्यावर तळपताना दिसतो. सखाराम महाराजांमुळे अमळनेर ही भक्तीपंढरीची पेठ बनली आहे. अमळनेरपासून तीन मैल अंतरावर असलेल्या चिखली नदीच्या काठी पिंपळी गावात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 1757 साली सखारामचा जन्म झाला. पिता रामभट व माता सीताबाई. बालपणीच मातृ-पितृछत्र हरपले. सावत्र आई नानूबाईसोबत सखाराम चुलतभाऊ रंगनाथकडे रहाण्यास गेले. गंगाबाईंशी विवाहबद्ध झाले. एरंडोलच्या रघुनाथ स्वामी महाराजांनी हाक मारली. त्यांनी अडावद गावी निवास करणा:या श्रीनिवास महाराजांकडे जायची सूचना केली. श्रीनिवास महाराजांनी गुरूपदेश केला.

अमळनेरजवळील अंबर्षी टेकडीवर तपाचरणात सिद्धयोगी महादेव बुवांनीही सखाराम महाराजांना अध्यात्म विद्येत साह्य केले. सखाराम महाराजांच्या वंशवेलीवर पुष्प आले. पण त्यांचे लक्ष श्री विठ्ठलाच्या समचरणी लीन होते. प्रतिवर्षी पंढरपूरला वारीसाठी निघताना स्वहस्ते आपली कुटी जाळण्याचे सखाराम महाराजांचे साहस पाहू जाता संत कबिरांची ‘जो घर जालै आपना चलै हमारे साथ’ ही उक्ती आठवते. मुलगा वारला. प}ी निवर्तली. सखाराम आता आशापाशापासून सर्वार्थाने मुक्त झाले.
सखाराम महाराजांची शिष्य परंपरा समृद्ध आहे. ते स्वत: मुल्हेर गादीचे शिष्य होते. सखाराम महाराजांनी खानदेशात एक देदीप्यमान वलय उभारले. भक्तीच्या क्षेत्रात अभिनव भावजागरण केले. सखाराम महाराजांचे शिष्योत्तम श्री गोविंद महाराज मालेगावच्या राजेबहादुरांचे अमळनेर येथील खास कारभारी म्हणून काम पहात असत. 1851 साली बाळकृष्ण महाराजांच्या गळ्यात गुरुपदाची माळ घालून गोविंद महाराज ईश्वरचरणी लीन झाले.
श्री बाळकृष्ण महाराजांचे मूळ गाव मलकापूर. देशस्थ ऋग्वेदी ब्राrाण शाखेतील खानझोडे, देशपांडे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. धरणगावच्या सीतारामबुवांनी सुचवल्यावरून आर्थिक घडी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. 1875 साली प्रल्हाद महाराजांजवळ आपला अमूल्य भक्तिवारसा सोपवून बाळकृष्ण महाराजांनी जीवनलीला संपवली.
भूमपरांडे गावचे माध्यंदिन शाखेचे शुक्ल यजुव्रेदी ब्राrाण गोपाळ यास सखाराम महाराजांची बहीण बहिणाबाईंची मुलगी भीमा दिली होती. यांचे पुत्र प्रल्हाद महाराज होत. प्रल्हाद महाराजांनी सखाराम महाराजांच्या समाधीजवळ गोविंद महाराजांची समाधी बांधली. बाळकृष्ण महाराजांच्या समाधीच्या बांधकामास आरंभ केला. पंढरपूरला सखाराम महाराज मठ बांधण्यास आरंभ करण्यात आला. 
पूज्य सखाराम महाराजांच्या समकालीन संत मंडळात अमळनेरचे महादेवसिद्ध आणि लक्ष्मीकांत, सखाराम शिष्योत्तम टिकंभटजी डांगरकर, गोविंदा लोंढारी, धरणगावचे गणेशोपासक योगविद्यासंपन्न कोमटी महाराज, धरणीधर स्वामी, कमळाकर, चोपडय़ाचे गोविंदबुवा, दुसखेडय़ाचे बाळानंद, जळगावचे केशर गिरी, नगरदेवळ्याचे लाडशाखीय किसनजी, शेंदुर्णीचे कडोजी बाबा, जामनेरचे गोविंद महाराज आणि महाराजांचे सुपुत्र तोताराम महाराज अशी नावे येतात. ही  संत परंपरा अजूनही यात्रेकरूंची वाट बघत आहे. या संत परंपरेचे वैशिष्टय़ असे की, ही परंपरा जनताभिमुख आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन काठांचे नेमके अनुसंधान जोडून देणारी आहे. यासंदर्भात विठ्ठलभक्ती आणि जीवनातले सार सर्वस्व कळण्याची कळ साधते. साने गुरुजींसारख्या आणि देशाभिमुखता याचा परिचय होतो. खानदेशातून आपल्या वज्र सामथ्र्याने काम करणा:या या संत परंपरेची खूप दीर्घकालीन प्रशस्ती आहे. श्री सखाराम महाराजांची शिष्यपरंपरा 1757 सालापासून सुरू होते.