शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यामुळे रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी झुंबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST

जळगाव : हॉल तिकिटांच्या गोंधळामुळे २५ व २५ सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची परीक्षा शासनाने अचानक रद्द केल्यामुळे, याचा ...

जळगाव : हॉल तिकिटांच्या गोंधळामुळे २५ व २५ सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची परीक्षा शासनाने अचानक रद्द केल्यामुळे, याचा परिक्षेसाठी अर्ज केेलेल्या विद्यार्थांना चांगलाच फटका बसला आहे. अचानक रद्द करण्यात आलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थांना याचा मानसिक त्रास तर झालाच, पण दुसरीकडे ऐनवेळी तिकीटे रद्द केल्यामुळे आर्थिक फटकाही बसला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गंत गट क आणि ड प्रवर्गातील रिक्त जागांसाठी राज्य शासनातर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील विद्यार्थांनी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या विद्यार्थांची २५ व २६ सप्टेंबर असे दोन दिवस `न्यासा` या संस्थेमार्फत परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र,ऐनवेळी या संस्थेने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविल्याने, शासनाला ही परीक्षा रद्द करावी लागली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द झाल्याचे जाहिर केल्यानंतर, काही वेळातच परिक्षार्थींच्या मोबाईलवरही मेसेज आले. त्यामुळे परिक्षेच्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत असलेले विद्यार्थी लगेच माघारी फिरले. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील क प्रवर्गातील विद्यार्थांची २५ रोजी परिक्षा असल्याने, अनेक विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळीच संबंधित परिक्षा केंद्राच्या गावांना रवाना झाले होते. तर काही जाण्याच्या तयारीत होते. मात्र, परीक्षा रद्द झाल्याचे समजताच, या विद्यार्थांनी विविध गावांची रेल्वेची काढलेली तिकीटे रद्द करण्यासाठी जळगाव स्टेशनवर एकच गर्दी केली होती.

इन्फो :

परीक्षा रद्दनंतर रद्द तिकिटांच्या भुर्दंडांचाही मनस्ताप

आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थांनी अर्ज केले होते. यात क प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थांची नाशिकला परिक्षा होती. शनिवारी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान परीक्षा असल्यामुळे, अनेक विद्यार्थी जळगावहून सायंकाळच्या अमृतसर एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस व महानगरी एक्सप्रेस या पहाटेच्या गाड्यांचे तिकीट बुकींग केले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे, या विद्यार्थांनी काढलेले तिकीटे रद्द केली. मात्र, रेल्वेच्या नियमानुसार चार्ट तयार झाल्यानंतर, तिकीट रद्द केल्यावर परतावा देण्यात येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थांना तिकीटांचा कुठलाही परतावा मिळाला नाही. तर काही विद्यार्थांनी तात्काळ तिकीटे रद्द केल्यामुळे त्यांना तिकीटाच्या रक्कमेचा निम्मा परतावा मिळाला. एकंदरीत विद्यार्थांना रद्द केलेल्या तिकिटांचा हजारोंच्या घरात फटका बसल्याने, मनस्ताप होत असल्याचे विद्यार्थांनी सांगितले.

इन्फो :

आरोग्य विभागाची नाशिकला परीक्षा असल्यामुळे, ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी सायंकाळीच रेल्वेने नाशिकला रवाना झालो होतो. मात्र, रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याचे समजल्यावर धक्काच बसला. त्यामुळे पुन्हा माघारी फिरावे लागल्याने, मानसिक त्रास सहन करावा लागला.

विजय पाटील, परिक्षार्थी

शासनाने परीक्षा रद्द करायचीच होती, तर किमान दोन दिवस आधी कळविणे गरजेचे होते. परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थांना कळविण्यात येत असल्यामुळे, गोंधळ उडतोच. तसेच या प्रकाराचा मानसिक त्रास तर होतोच, शिवाय रेल्वेच्या रद्द केलेल्या तिकिटामागे ५० टक्के रक्कम कापण्यात आली. यामुळे आर्थिक भुर्दंडही बसला आहे.

योगेश शिंदे, परिक्षार्थी