शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीतील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी रोहित्राचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:34 IST

शिरसोली : अतिदाबामुळे शिरसोली येथील रोहित्र गेल्या चार दिवसांपासून न बसल्याने शिरसोलीतील काही भाग अंधारात होता. त्यानंतर वीज कंपनीने ...

शिरसोली : अतिदाबामुळे शिरसोली येथील रोहित्र गेल्या चार दिवसांपासून न बसल्याने शिरसोलीतील काही भाग अंधारात होता. त्यानंतर वीज कंपनीने या समस्येच्या कायमस्वरूपी निवारणासाठी नवे रोहित्र मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार शनिवारी तीन ठिकाणच्या जागांची पाहणीदेखील करण्यात आली.शिरसोली प्र.न.येथील चिंचपुरा, पाटीलवाडा, वाणी गल्ली या भागात विज पुरवठा करण्यासाठी पाचोरा रस्त्यावर स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले आहे. मात्र या रोहित्रावर अतिरिक्त दाब असल्याने या महिन्याभरात तीन वेळा रोहित्र जळाले आहे. गुरुवारी सकाळी हे रोहित्र निकामी झाल्यानंतर या भागातील नागरिक तब्बल तीन दिवस अंधारात होते. यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना होती. यासंदभार्तील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते.वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुलक्षणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, प्रणय सोनवणे यांनी या रोहित्रावरील भार कमी करण्यासाठी स्वतंत्र रोहित्र तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार आमदार निधीतून या कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. शनिवारी सकाळी वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं.सदस्यांनी तीन ठिकाणी रोहित्रासाठी जागांची पाहणी केली. त्यानुसार पाटीलवाडा, विठ्ठल मंदिर परिसर व अन्य एका ठिकाणी रोहित्राच्या जागेसाठी पाहणी करण्यात आली. या दरम्यान विठ्ठल मंदिर परिसरात नवीन रोहित्र बसविण्यासाठी सर्वसम्मती झाली.येत्या महिनाभरात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नवीन रोहित्र बसविण्यात येणार असल्याचे वीज कंपनीचे अभियंता सुलक्षणे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना सांगितले.विठ्ठल मंदिर परिसरात नवीन रोहित्र बसविल्यानंतर या भागातील टॉवर व पिठाच्या गिरणीचा लोड या नवीन रोहित्रावर टाकण्यात येणार आहे. तसेच चिंचपुरा व उर्वरित भागाचा लोड हा पाचोरा रस्त्यावरील रोहित्रावर कायम ठेवण्यात येणार आहे.आकडेधारकांविरूद्ध मोहिमया भागात आकडेधारकांची संख्या जास्त असल्याने त्याचा अतिरिक्त दाब निर्माण होऊन रोहित्र वारंवार निकामी होत असते. त्यामुळे आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांची होती. त्यानुसार वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकडेधारकांविरूद्ध मोहिम राबविली. मात्र आधीच वीज गायब असतांना ही मोहिम राबविणाºया वीज कंपनीच्या पथकाला नागरिकांच्या संतापाला समोरे जावे लागले.लोकप्रतिनिधींबद्दल नागरिकांचा रोषरोहित्राअभावी तब्बल तीन ते चार दिवस नागरिकांना अंधारात रहावे लागल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना होत्या. या दरम्यान ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील व प्रणय सोनवणे वगळता वीज नसलेल्या वॉडार्तील ग्रा.पं.सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी साधे ढुंकूनही न पाहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव