शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

पहिल्याच पावसात रस्त्यांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:22 IST

बजरंग पुलाजवळ साचले पाणी, रस्ते खोदल्याने सर्वत्र चिखलच चिखल

जळगाव : मोठ्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरात पावसाचे आगमन झाले़ सकाळी झालेल्या पावसामुळे ठिक-ठिकाणी पाणी साचले होते तर कुठं डबकी तयार झाली होती़ त्यातच काव्यरत्नावली चौक परिसरात एका पाण्याच्या डबक्यात स्कूल बस अडकल्याचा प्रकारही सकाळी घडला़ दरम्यान, अमृतच्या कामानंतर अनेक भागात रस्त्यांची दुरूस्ती थातूर-मातूर पध्दतीने केल्यामुळे अनेक रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला होता. या रस्त्यांवरुन पायी चालणे देखील कठीण झाले होते.शहरासह जिल्ह्यात यंदा भीषण पाणी टंचाईची समस्या नागरिकांना भेडसावली़ काही तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्यामुळे पाण्यासाठी पाच ते दहा किमी पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली होती़ दरम्यान, यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता़ त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या़जुनच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पाऊस होईल, अशी आशा होती. मात्र, पहिला तर सोडाच दुसरा व तिसरा आठवडा पुर्ण होण्यावर असताना देखील पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंता पसरली होती़ अखेर अधून-मधून पावसाच्या हुलकावण्या दिल्यानंतर सोमवारी शहरासह अनेक भागांमध्ये पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावली़बच्चे कंपनींनी घेतला भिजण्याचा आंनदया पावसामुळे काही प्रमाणात का होईना मात्र शेतकरी बांधव सुखावले़ तोच शहरातील काही चिमुकल्यांनी शाळेला दांडी मारत रस्त्यांवर येऊन भिजण्याचा आनंद घेतला़ पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला असून दुपारी मात्र प्रचंड उका जाणवत होता़अमृत योजनेच्या कामामुळे जागोजागी चिखलच चिखल...काही महिन्यांपासून शहरात अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्यांचे कामे सुरू आहेत़ रस्त्यांच्याकडेला खड्डे करून जलवाहिन्या टाकल्या जात आहेत़ मात्र, जलवाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती केली गेली आहेत़ त्यामुळे सोमवारी सकाळीच झालेल्या पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर चिखल साचला. चिखल आणि पाणी साचल्यामुळे पायी चालणे सुध्दा कठीण झाले तर ठिकठिकाणी डबकी साचली गेली़ काव्यरत्नावली चौकात तर स्कूलबसच डबक्यामध्ये अडकल्याचा प्रकार घडला़ सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही़शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले होते आणि चिखलही झाला होता. मध्यवती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातर पाणी साचल्याने जायला जागा नव्हती. शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर साचलेले पाणी निघाल्याने वाहतूक सुरळीत झाली. अमृत योजनेच्या कामामुळे प्रचंड चिखल झाला.पुल, रस्त्यांवर साचले पाणीपहाटेपासूनच पावसाचे आगमन झाल्यानंतर एक ते दोन तास रिमझीम पाऊस सुरू होता़ त्यामुळे शहरातील मुख्य चौकांसह सखल भागाच्या रस्त्यांवर तलावाचे स्वरूप आलेले होते़ पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग पुल, त्यानंतर दाणाबाजार परिसर, जुने बी़मार्केट परिसरात रस्त्यांवर पाणी साचले होते़ त्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत होती. बजरंग पुलात देखील पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली़

टॅग्स :Jalgaonजळगाव