शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात रस्त्यांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:22 IST

बजरंग पुलाजवळ साचले पाणी, रस्ते खोदल्याने सर्वत्र चिखलच चिखल

जळगाव : मोठ्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरात पावसाचे आगमन झाले़ सकाळी झालेल्या पावसामुळे ठिक-ठिकाणी पाणी साचले होते तर कुठं डबकी तयार झाली होती़ त्यातच काव्यरत्नावली चौक परिसरात एका पाण्याच्या डबक्यात स्कूल बस अडकल्याचा प्रकारही सकाळी घडला़ दरम्यान, अमृतच्या कामानंतर अनेक भागात रस्त्यांची दुरूस्ती थातूर-मातूर पध्दतीने केल्यामुळे अनेक रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला होता. या रस्त्यांवरुन पायी चालणे देखील कठीण झाले होते.शहरासह जिल्ह्यात यंदा भीषण पाणी टंचाईची समस्या नागरिकांना भेडसावली़ काही तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्यामुळे पाण्यासाठी पाच ते दहा किमी पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली होती़ दरम्यान, यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता़ त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या़जुनच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पाऊस होईल, अशी आशा होती. मात्र, पहिला तर सोडाच दुसरा व तिसरा आठवडा पुर्ण होण्यावर असताना देखील पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंता पसरली होती़ अखेर अधून-मधून पावसाच्या हुलकावण्या दिल्यानंतर सोमवारी शहरासह अनेक भागांमध्ये पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावली़बच्चे कंपनींनी घेतला भिजण्याचा आंनदया पावसामुळे काही प्रमाणात का होईना मात्र शेतकरी बांधव सुखावले़ तोच शहरातील काही चिमुकल्यांनी शाळेला दांडी मारत रस्त्यांवर येऊन भिजण्याचा आनंद घेतला़ पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला असून दुपारी मात्र प्रचंड उका जाणवत होता़अमृत योजनेच्या कामामुळे जागोजागी चिखलच चिखल...काही महिन्यांपासून शहरात अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्यांचे कामे सुरू आहेत़ रस्त्यांच्याकडेला खड्डे करून जलवाहिन्या टाकल्या जात आहेत़ मात्र, जलवाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती केली गेली आहेत़ त्यामुळे सोमवारी सकाळीच झालेल्या पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर चिखल साचला. चिखल आणि पाणी साचल्यामुळे पायी चालणे सुध्दा कठीण झाले तर ठिकठिकाणी डबकी साचली गेली़ काव्यरत्नावली चौकात तर स्कूलबसच डबक्यामध्ये अडकल्याचा प्रकार घडला़ सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही़शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले होते आणि चिखलही झाला होता. मध्यवती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातर पाणी साचल्याने जायला जागा नव्हती. शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर साचलेले पाणी निघाल्याने वाहतूक सुरळीत झाली. अमृत योजनेच्या कामामुळे प्रचंड चिखल झाला.पुल, रस्त्यांवर साचले पाणीपहाटेपासूनच पावसाचे आगमन झाल्यानंतर एक ते दोन तास रिमझीम पाऊस सुरू होता़ त्यामुळे शहरातील मुख्य चौकांसह सखल भागाच्या रस्त्यांवर तलावाचे स्वरूप आलेले होते़ पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग पुल, त्यानंतर दाणाबाजार परिसर, जुने बी़मार्केट परिसरात रस्त्यांवर पाणी साचले होते़ त्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत होती. बजरंग पुलात देखील पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली़

टॅग्स :Jalgaonजळगाव